दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

सविस्तर निवेदन केलं सादर....

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट : सौ.संध्या दीपक देशमुख व दीपक देशमुख यांना तत्काळ संरक्षण देण्याची मागणी

बीड (प्रतिनिधी) – परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती माजी नगरसेवक दीपक रंगनाथ देशमुख यांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक  देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन सौ. संध्या देशमुख व दीपक देशमुख यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. 

       निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या परळी शहरात निवडणूक काळात होत व आहे असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या २० डिसेंबर रोजी परळी शहरात पाच नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे.संभाव्य धोका टाळण्यासाठी सौ. संध्या दीपक देशमुख व दीपक रंगनाथ देशमुख यांना तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे, परळी शहर पोलीस स्टेशचे अधिकारी व कर्मचारी संबंधित प्रकरणात दखल घेत नाही. दोन वेळा या प्रकरणी ते पोलीस स्टेशनला जाऊन आले. तसेच संबंधित कथित फोन रेकॉर्डिंगची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....