दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

 वैद्यनाथ कॉलेज मध्ये  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन




डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत - प्राचार्य डॉ. जगदीश जगतकर

परळी - वै.  प्रतिनिधी...

      जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ कॉलेज येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्राचार्य,डॉ. जगदीश जगतकर यांनी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांनी भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत होते असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे  प्राचार्य, डॉ. जगदीश जगतकर , उपप्राचार्य डी. के. आंधळे , उपप्राचार्य डॉ.  विनोद गायकवाड, उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे , यांची उपस्थिती होती.

        या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकताना मानवतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांनी चौत्यभूमी परिसर वातावरण सद्भावना जागृत करत माणुसकीचा दिवा तेवत ठेवण्याचे कार्य केले असे सांगून    जगात अस एकही शिक्षणक्षेत्र नाही त्यात डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांचे विचाराची शिकवण ही समता , बंधुत्व, न्याय आणि एकात्मतेचा या चार सुत्राने रक्ताचा थेंब न सांडता  माणुसकीसाठी वंचित व उपेक्षितांसाठी निर्भयपणे लढा देणारा विश्वरत्न महामानव बोधीसत्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्रोत म्हणून त्यांची ख्याती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात झाली आहे. त्यांच्या विचारांची आज आपल्याला गरज आहे असेही मत याप्रसंगी प्राचार्य डॉ.जगतकर यांनी व्यक्त केले. 

          यावेळी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी   पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख  प्रा. माधव रोडे ,एम सी व्ही सी विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. एम. एल . देशमुख यांनी अभिवांदनपर आपले विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. दिलीप गायकवाड, तर आभार प्रा.डॉ व्ही . बी. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ.आरती कानपुरणे, श्री नवनाथ घुले, श्री प्रभाकर मुंडे यांच्यासह  सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....