दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

ना.पंकजाताई मुंडेंनी अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील ऋषीतुल्य व सात्विक नेता हरवला !


ना.पंकजाताई मुंडेंनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन

लातूर, प्रतिनिधी.......

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता हरवला असल्याचे शोकसंवेदना ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता आज हरवला आहे.शिवराज पाटील चाकूरकर हे  आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. देश पातळीपर्यंत अत्यंत सन्मानाने आणि स्वाभिमानाने सात्विक असं राजकारण त्यांनी केलं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशा शब्दात ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....