इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

ना.पंकजाताई मुंडेंनी अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील ऋषीतुल्य व सात्विक नेता हरवला !


ना.पंकजाताई मुंडेंनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन

लातूर, प्रतिनिधी.......

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता हरवला असल्याचे शोकसंवेदना ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता आज हरवला आहे.शिवराज पाटील चाकूरकर हे  आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. देश पातळीपर्यंत अत्यंत सन्मानाने आणि स्वाभिमानाने सात्विक असं राजकारण त्यांनी केलं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशा शब्दात ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या