इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन

 सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन



अंबाजोगाई : सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे आज गुरूवारी (दि.२२) सकाळी ८ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.

श्रीराम सपकाळ हे १९८२-८५ या कालावधीत अंबाजोगाईत पोलीस ठाणे प्रमुख होते. त्या काळात त्यांचे अंबाजोगाईशी कायमचे ऋणानुबंध जोडले गेले. अंबाजोगाईत त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यानंतर त्यांनी वसमत, नागपूर, जळगाव, अहमदनगर कर्तव्य बजावले. २००९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज गुरूवारी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार, पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि औरंगाबाद येथील कंत्राटदार प्रवीण चव्हाण यांचे ते सासरे होत. कै. श्रीराम सपकाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी टाकळी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

  1. श्री.सपकाळसाहेब मानवत येथे तेव्हापासून त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध होते.त्यानंतर त्यांनी बीड शहर पोलिस स्टेशन आणि अंबाजोगाई येथे काम केले. त्यांचा कार्यकाल अविस्मरणीय होते
    समाजातील सर्वस्तरात त्यांचे सोहार्दपूर्ण संबंध होते. सेवानिवृत्तीनंतर तत्यांचु अनेकवेळा भेट झाली. फोनद्वारे संपर्क होता. पोलिसवर्दीतील या सन्मित्रास आम्ही मुकलोय आहोत
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सपकिळसाहेब आपण सदैव‌स्मरणात रहाला
    ओम शांती
    अशोक देशमुख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!