इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन

 सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन



अंबाजोगाई : सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे आज गुरूवारी (दि.२२) सकाळी ८ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.

श्रीराम सपकाळ हे १९८२-८५ या कालावधीत अंबाजोगाईत पोलीस ठाणे प्रमुख होते. त्या काळात त्यांचे अंबाजोगाईशी कायमचे ऋणानुबंध जोडले गेले. अंबाजोगाईत त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यानंतर त्यांनी वसमत, नागपूर, जळगाव, अहमदनगर कर्तव्य बजावले. २००९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज गुरूवारी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार, पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि औरंगाबाद येथील कंत्राटदार प्रवीण चव्हाण यांचे ते सासरे होत. कै. श्रीराम सपकाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी टाकळी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

  1. श्री.सपकाळसाहेब मानवत येथे तेव्हापासून त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध होते.त्यानंतर त्यांनी बीड शहर पोलिस स्टेशन आणि अंबाजोगाई येथे काम केले. त्यांचा कार्यकाल अविस्मरणीय होते
    समाजातील सर्वस्तरात त्यांचे सोहार्दपूर्ण संबंध होते. सेवानिवृत्तीनंतर तत्यांचु अनेकवेळा भेट झाली. फोनद्वारे संपर्क होता. पोलिसवर्दीतील या सन्मित्रास आम्ही मुकलोय आहोत
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सपकिळसाहेब आपण सदैव‌स्मरणात रहाला
    ओम शांती
    अशोक देशमुख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या