इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-ग्रामीण भागात विभागवार लसीकरण न करता प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू - राजेश गिते

 ग्रामीण भागात विभागवार लसीकरण न करता  प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू   - राजेश गिते   



            परळी वैजनाथ..... तालुका ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.कोरोना मुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.मधल्या काळात काही गावांमध्ये अल्प प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी लोक लसीकरण केंद्र या ठिकाणी जात होती.प्रशसनाने नंतर लस तुटवडा असल्याचे कारण सांगून लसीकरण मोहीम बंद केली.आज च्या परिस्थिती गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन मोठ्या गावात जसे नागापूर, धर्मापुरी, सिरसाळा,आशा ठिकाणी बर्याच गावातील लोकांना बोलवुन लसीकरण मोहीम राबवित आहे ज्या मुळे एकाच ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो आहे.

प्रशास्नाने याची दखल घेऊन त्वरित बंद केलेली लसीकरण मोहीम गावोगावी पुन्हा सुरू करावी अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव  पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील लोकांना घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला आहे.

टिप्पण्या

  1. Yes ग्रामीण भागात ग्रामपंचायतीला लसीकरण देण्यात यावे हाच यावरील एकमेव उपाय आहे. आरोग्य विभागाचा लसीकरण मोहीम मी स्वतः डोळ्यांनी पाहून आलेलो आहे मला आजच्या तारखेचा शेड्युल मिळून सुद्धा ऑनलाइन तीन ते चार चार दिवस आम्ही मोबाईलवर बोटे ठेवून बसायचं इकडून तिकडून अपॉईंटमेंट बुक झाल्याचे नंतर आम्ही ज्या वेळेस लसीकरण केंद्रावर जातो तिथे गेल्यानंतर आमची नावे त्या लिस्टमध्ये नाही तो ऑफलाईन नोंदणी ज्यांनी केली त्यांनाच लस देण्यात येते मग ऑनलाइन आज कशाला लोकांची दिशाभूल करण्यासाठी का लसी चे घोटाळे करण्यासाठी.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या