प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

  गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन -

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 

परळी दि. १ फेब्रुवारी....

 कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्कार २०२१-२२ साठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे अर्ज मागविण्यात येत आहे. विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी सदर पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

 मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेत स्थळावर तसेच कामगार कल्याण केंद्रात सदर पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या दुकान, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स,  उपहारगृहे, बँका आदी मध्ये काम करणारे कामगार/कर्मचारी यांना मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी कामगारांची विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. ५१ कामगारांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून रु. २५००० हजार,  स्मृतिचिन्ह,  आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या दहा वर्षानंतर कामगार भूषण पुरस्‍कारासाठी अर्ज करता येतो.  एका कामगाराची या  पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून रु. ५०००० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 मंडळाचा लीन नंबर (लेबर आयडेंटिटी  नंबर) असलेल्या कामगारांना www.public.mlwb.in या  संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी प्रिंट व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे.

 त्या आधारे अर्जदारास संबंधित केंद्राकडून अर्जाचा नमुना मोफत दिला जाईल.  सदर अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत हस्तपोच किंवा टपालाने सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील तीन वर्षात बंद पडलेल्या आस्थापनातील कामगारांना संबंधित केंद्रात ऑफलाइन पद्धतीने मंडळाच्या नियमानुसार अर्ज सादर करता येणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या