इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

  गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन -

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 

परळी दि. १ फेब्रुवारी....

 कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्कार २०२१-२२ साठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे अर्ज मागविण्यात येत आहे. विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी सदर पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

 मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेत स्थळावर तसेच कामगार कल्याण केंद्रात सदर पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या दुकान, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स,  उपहारगृहे, बँका आदी मध्ये काम करणारे कामगार/कर्मचारी यांना मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी कामगारांची विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. ५१ कामगारांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून रु. २५००० हजार,  स्मृतिचिन्ह,  आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या दहा वर्षानंतर कामगार भूषण पुरस्‍कारासाठी अर्ज करता येतो.  एका कामगाराची या  पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून रु. ५०००० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 मंडळाचा लीन नंबर (लेबर आयडेंटिटी  नंबर) असलेल्या कामगारांना www.public.mlwb.in या  संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी प्रिंट व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे.

 त्या आधारे अर्जदारास संबंधित केंद्राकडून अर्जाचा नमुना मोफत दिला जाईल.  सदर अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत हस्तपोच किंवा टपालाने सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील तीन वर्षात बंद पडलेल्या आस्थापनातील कामगारांना संबंधित केंद्रात ऑफलाइन पद्धतीने मंडळाच्या नियमानुसार अर्ज सादर करता येणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या