प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-परळीत संत श्री रविदास जयंती उत्साहात साजरी जातीयभेद नष्ट करून‌ सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संत रविदासांनी दिली - रविंद्र परदेशी

  परळीत संत श्री रविदास जयंती उत्साहात साजरी 

जातीयभेद नष्ट करून‌ सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संत रविदासांनी दिली - रविंद्र परदेशी



परळी वैजनाथ - दि १६ ( प्रतिनिधी ) :- समाजा समाजामध्ये पसरलेले जातीभेदाचे विष नष्ट करून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संत श्री रविदासांनी दिली. त्याचा बोध घेऊन समाज कार्य केले तर खऱ्या अर्थाने संत श्री रविदास यांची जयंती केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी यांनी केले.

🔸MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

आज शिवाजीनगर या ठिकाणी संत श्री रविदासांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी रवींद्र परदेशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते संत श्री रविदासांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैजनाथ सोळंके, शिवसेनेचे राजाभैया पांडे, भोजाजी पालीवाल, सतिश जगताप, सचिन स्वामी, राष्ट्रवादीचे बालाजी चाटे, रामेश्वर महाराज कोकाटे, जालिंदर नाईकवाडे, महेंद्र रोडे आदी उपस्थित होते

. 🔸 आवर्जून वाचा:कोविड परिस्थितीमुळे स्थगित राहिलेले संत रविदास पुरस्कार यावर्षी घोषित करणार-धनंजय मुंडे

शिवाजीनगर भागात आज तागायत प्रत्येक स्तरातील सामाजिक उपक्रम राबवण्यात येऊन कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याची शिकवण दिली जाते आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाज प्रबोधन केले जाते याचा अनेकांना फायदा होतो यापुढेही असेच कार्यक्रम राबवण्यात येऊन ह्या भागात समाज प्रबोधनाचे काम तह्यात सुरूच ठेवण्यात येतील अशी ग्वाही देखील रवींद्र परदेशी यांनी दिली.

आवर्जून वाचा: धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बदलणार परळी वैजनाथ बसस्थानकाचे रुपडे.

सध्याच्या बदलत्या युगात खऱ्या अर्थाने बिघडलेली सामाजिक खऱ्या अर्थाने सुधारण्यासाठी संत श्री रविदासांचा संदेश समाजा समाजात पोहोचवणे‌ ही काळाची गरज आहे त्यादृष्टीने प्रत्येकाने समाजकार्यासाठी वाहून घ्यावे असे मौलिक विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

🔸MB NEWS ला Subscribe नक्की करा.

ह्याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ आणि महिला-पुरुष भाविक भक्तांनी घेतला.

कार्यक्रमास विजय अटकोरे, शिवराज सुरवसे, पवन वाघमारे, जगन परदेशी, सुभाष परदेशी, तुळजा परदेशी, राजन परदेशी, सुनिल परदेशी, धर्मेंद्र परदेशी, दिलीप कुरील यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या