इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज

 रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज    



  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात व मनात दूषित विचार येत नाही असे श्रीक्षेत्र कपिलधार येथील शिवाचार्य विरुपाक्ष महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले                                    वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने     येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक)     यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त दिनांक 18जुलै सोमवारी सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम  यांचे प्रवचन झाले .सर्व समाज बांधव व भाविकांची लक्षणीय उपस्थिती.रुद्राक्ष धारण इष्टलिंग पूजनाची तसेच कपाळी भस्म लावण्याचे महत्त्व काय असते ते सउदाहरण विवेचन केले .      

Click &watch     ■ *परळीतील बेलवाडीत आषाढ मास अनुष्ठान: वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तीमय* *_ |MB NEWS|Subscribe| like|Comments_*      

 संत शिरोमणी श्री मन्मथ माऊली यांनी म्हटल्याप्रमाणे भावी भस्म लिंग गळा! शोभे रुद्राक्षांच्या माळा !!  ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे ,कपाळावर भस्म  आहे,मुखी शिवनाम आहे,  फळ रुद्राक्ष धारण करणाऱ्याला मिळते तसेच रुद्राक्षाची जपमाळा प्रत्येकाची वेगळी असावी आज प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसतो त्याप्रमाणे सर्वांनी नामस्मरण केले तर ते दृश्य किती सुंदर व वैभवशाली असेल याची कल्पना सुखावह आहे.वीरशैव कुळात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचे भाग्य थोर आहे, त्यांनी आपले आचरण वरील प्रमाणे ठेवावे असे आवाहन गुरूवर्य यांनी केले. तदनंतर आरती होऊन सर्वांनी महाप्रसाद ग्रहण केला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!