इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज

 रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज    



  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात व मनात दूषित विचार येत नाही असे श्रीक्षेत्र कपिलधार येथील शिवाचार्य विरुपाक्ष महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले                                    वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने     येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक)     यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त दिनांक 18जुलै सोमवारी सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम  यांचे प्रवचन झाले .सर्व समाज बांधव व भाविकांची लक्षणीय उपस्थिती.रुद्राक्ष धारण इष्टलिंग पूजनाची तसेच कपाळी भस्म लावण्याचे महत्त्व काय असते ते सउदाहरण विवेचन केले .      

Click &watch     ■ *परळीतील बेलवाडीत आषाढ मास अनुष्ठान: वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तीमय* *_ |MB NEWS|Subscribe| like|Comments_*      

 संत शिरोमणी श्री मन्मथ माऊली यांनी म्हटल्याप्रमाणे भावी भस्म लिंग गळा! शोभे रुद्राक्षांच्या माळा !!  ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे ,कपाळावर भस्म  आहे,मुखी शिवनाम आहे,  फळ रुद्राक्ष धारण करणाऱ्याला मिळते तसेच रुद्राक्षाची जपमाळा प्रत्येकाची वेगळी असावी आज प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसतो त्याप्रमाणे सर्वांनी नामस्मरण केले तर ते दृश्य किती सुंदर व वैभवशाली असेल याची कल्पना सुखावह आहे.वीरशैव कुळात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचे भाग्य थोर आहे, त्यांनी आपले आचरण वरील प्रमाणे ठेवावे असे आवाहन गुरूवर्य यांनी केले. तदनंतर आरती होऊन सर्वांनी महाप्रसाद ग्रहण केला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....