दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

 संघटीत लढ्यानेच कामगारांचे प्रश्न सुटतील-अॅड. अजय बुरांडे

परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

परळी:  कामगारांच्या संघटित लढयानेच कामगारांचे प्रश्न सोडवू असे स्पष्ट मत अँड अजय बुरांडे यांनी 1 मे च्या परळी येथील मेळाव्यात व्यक्त केले.

        बीड जिल्हा सीटू च्या वतीने परळी येथील विठ्ठल मंदिरात कामगारांचा मेळावा आयोजीत केला होता. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्रा.बी.जी खाडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. प्रभाकर नागरगोजे काॅ. पी. एस. घाडगे, श्री रामराजे महाडीक व कॉ किरण सावजी उपस्थित होते.अँड बुरांडे यांनी आपल्या भाषणात पूढे सांगितले की, कामगारांनी आपल्या संघटित लढ्यानेच जगभर भांडवलदारांची  गुलामी ठोकरली व आठ तासाचा कामाचा दिवस ठरून घेतला. आपल्या संघटित लढ्यानेच कामगारांच्या हिताचे कायदे  करायला सरकारला भाग पाडले. परंतू आता  'मोदी' सरकार भांडवलदारांच्या हिताचे  कायदे करत आहे. लाखो कामगार, शेतकरी व शेतमजुरांनी दिल्लीत मोर्चा काढून सरकारच्या धोरणास विरोध केला आहे." नाशीक येथून  10 हजारपेक्षा जास्त शेतकर्यांनी पायी मोर्चा काढून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. लोकशाहीमध्ये  संघटित लढ्याला महत्त्व आहे. कामगारानी धार्मिक व जातियवादावर  आधारित आंदोलना पासून स्वत:ला दूर ठेवले पाहीजे व त्यास विरोध केला पाहिजे. मेळाव्यात काॅ. रामराजे महाडीक, कॉ. पी.एस घाडगे, काँ प्रभाकर नागरगोजे यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात कामगारानी जाती पातीच्या राजकारणात जागरूक राहून यास विरोध करावा व सामूहिक कामगार हिता साठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

       मेळव्याचे प्रास्ताविक बांधकाम कामगार संघटनेचे शेख जावेद यांनी तर कार्यक्रमाचे संचलन बांधकाम कामगार संघटनेचे प्रकाश वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, शालेय पोषन आहार कामगार, आशा, नगरपालिका कामगार व सेवानिवृत कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन आशा-संघनेच्या सुवर्णा रेवले यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिका यूनियनचे विकास केदारे, जगन्नाथ शहाणे, सीटूचे जालिंदर गिरी, बांधकाम कामगार संघनेचे शेख जावेद, प्रकाश वाघमारे आशा संघटनेच्या आशा लांडगे, अनिता चाचाटे यांनी मेहनत घेतली.


Advt.......






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....