इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

 संघटीत लढ्यानेच कामगारांचे प्रश्न सुटतील-अॅड. अजय बुरांडे

परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

परळी:  कामगारांच्या संघटित लढयानेच कामगारांचे प्रश्न सोडवू असे स्पष्ट मत अँड अजय बुरांडे यांनी 1 मे च्या परळी येथील मेळाव्यात व्यक्त केले.

        बीड जिल्हा सीटू च्या वतीने परळी येथील विठ्ठल मंदिरात कामगारांचा मेळावा आयोजीत केला होता. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्रा.बी.जी खाडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. प्रभाकर नागरगोजे काॅ. पी. एस. घाडगे, श्री रामराजे महाडीक व कॉ किरण सावजी उपस्थित होते.अँड बुरांडे यांनी आपल्या भाषणात पूढे सांगितले की, कामगारांनी आपल्या संघटित लढ्यानेच जगभर भांडवलदारांची  गुलामी ठोकरली व आठ तासाचा कामाचा दिवस ठरून घेतला. आपल्या संघटित लढ्यानेच कामगारांच्या हिताचे कायदे  करायला सरकारला भाग पाडले. परंतू आता  'मोदी' सरकार भांडवलदारांच्या हिताचे  कायदे करत आहे. लाखो कामगार, शेतकरी व शेतमजुरांनी दिल्लीत मोर्चा काढून सरकारच्या धोरणास विरोध केला आहे." नाशीक येथून  10 हजारपेक्षा जास्त शेतकर्यांनी पायी मोर्चा काढून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. लोकशाहीमध्ये  संघटित लढ्याला महत्त्व आहे. कामगारानी धार्मिक व जातियवादावर  आधारित आंदोलना पासून स्वत:ला दूर ठेवले पाहीजे व त्यास विरोध केला पाहिजे. मेळाव्यात काॅ. रामराजे महाडीक, कॉ. पी.एस घाडगे, काँ प्रभाकर नागरगोजे यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात कामगारानी जाती पातीच्या राजकारणात जागरूक राहून यास विरोध करावा व सामूहिक कामगार हिता साठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

       मेळव्याचे प्रास्ताविक बांधकाम कामगार संघटनेचे शेख जावेद यांनी तर कार्यक्रमाचे संचलन बांधकाम कामगार संघटनेचे प्रकाश वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, शालेय पोषन आहार कामगार, आशा, नगरपालिका कामगार व सेवानिवृत कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन आशा-संघनेच्या सुवर्णा रेवले यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिका यूनियनचे विकास केदारे, जगन्नाथ शहाणे, सीटूचे जालिंदर गिरी, बांधकाम कामगार संघनेचे शेख जावेद, प्रकाश वाघमारे आशा संघटनेच्या आशा लांडगे, अनिता चाचाटे यांनी मेहनत घेतली.


Advt.......






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या