परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:मनसेच्या "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

 मनसेच्या "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवतीर्थ कार्यालयात तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी परळी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सचिन कागदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सचीन कागदे यांनी बोलताना सांगीतले की 'सर्वांनी गौतम बुद्धांनी दिलेली अहिंसेच्या शिकवणीचा अवलंब करून विश्वकल्याण करण्याचा प्रयत्न करावा' असे प्रतिपादन केले.


"बौद्ध धर्माचे संस्थापक, महान दार्शनिक, धर्मगुरू आणि समाज सुधारक महात्मा गौतम बुद्ध यांनी आपल्या विचारांनी संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग दाखवला. आपल्या थोर विचारांनी आणि उपदेशांनी जगाला नवा मार्ग दाखविणाऱ्या भगवान गौतम बुद्धांनी समाजात अभूतपूर्व परिवर्तन आणण्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या उपदेशांचा उपयोग आपल्या जीवनात केल्यामुळे अनेक लोक आपल्या आयुष्यात केवळ यशस्वीच झाले असे नव्हे तर त्यांच्या हृदयात समाजाप्रती प्रेम, आदर, सदभावाच्या भावनेचा विकास देखील झाला." अशा भावना मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी व्यक्त केल्या.


"भगवान गौतम बुद्धांनी तत्कालीन रूढी-परंपरांचे, अंधविश्वासाचे, खंडन करून एका सहज सोप्या मानवधर्माची स्थापना केली. ते म्हणतात, आपल्या जीवनात संयम, सत्य आणि अहिंसेचे पालन करून पवित्र आणि साधे जीवन व्यतीत करावयास हवे.  त्यांनी कर्म, भाव, आणि ज्ञानासमवेत ‘सम्यक’ साधनेवर भर दिला कारण कुठलीही ‘अतिशयोक्ती’ शांतता देऊ शकत नाही." असे प्रतिपादन मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी केले.


याप्रसंगी परळी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सचिन जी कागदे, मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी,मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण,माणिक लटींगे, अनंत सोळंके,  अदी मान्यवर उपस्थित होते.


--------------------------------------------

Advt.......







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!