प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे !

 आगळंवेगळं: अक्षदा-पानाच्या विड्यासह मुळपत्रिका: सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे !


परळी वैजनाथ(प्रतिनिधी):- सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असुन विविध माध्यमातून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने सभेचे निमंत्रण देणारी 'मुळपत्रिका' सध्या मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होत आहे.

      सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा ऐतिहासिक होणार असुन इतिहासात नोंद होणा-या या सभेचे साक्षीदार होऊन या सभेस सहकुटुंब हजेरी लावावी असे आवाहन गावागावांत विविध माध्यमातून केले जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागिल अनेक वर्षांपासून समाज बांधव विविध मार्गाने अंदोलने संपूर्ण राज्यात करत आहे. आता कुठेतरी मनोज जरांगे यांनी राज्य सरकाराला धारेवर धरत आपल्या अंदोलनाचा लढा सराटी अंतरवाली या गावातून सुरु केला आहे. या अंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिली.हे अंदोलन राज्य पातळीवरील झाले. मनोज जरांगे पाटलांच्या राज्यव्यापी दौ-यातही प्रचंड प्रतिसाद बघायला मिळत आहे.




       मुळपत्रिकेला आपल्या समाजजीवनात अतिशय महत्त्व आहेत.अक्षदा,पानाचा विडा-सुपारीसह आगत्याचे निमंत्रण देण्यासाठी मुळपत्रिका दिली जाते. आता या महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुळपत्रिकेच्या माध्यमातून केले जात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने सभेचे निमंत्रण देणारी 'मुळपत्रिका' सध्या मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होतांना दिसत आहे.
-----------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या