प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा

 सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा


कर्तव्यावर असलेले जवान पांडुरंग वामन तावरे या पुरामध्ये वाहून गेले. यामध्ये ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तिस्ता नदीला मोठा पूर:सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे उभी असलेली सैन्य दलाची वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे (वय 36) हे बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह आढळून आला.





आतापर्यंत देशाच्या अनेक भागात सेवा: पांडुरंग वामन तावरे हे 2009 मध्ये लष्करात भरती झालेले होते. मागील 14 वर्षांपासून ते महार बटालियन (18) मध्ये नायक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी देशातील दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब विविध ठिकाणी देशाची सेवा केली. मागील 2 महिन्यांपूर्वी सिक्कीम मधील गंगटोक येथे कर्तव्यासाठी गेले होते. त्याठिकाणी मंगळवारी रात्री ते बंगाल बॅंकडुगी युनिटकडं निघाले होते.

काय घडले त्या रात्री: पांडुरंग वामन तावरे हे स्वतः एका वाहनाचे चालक होते. दरम्यान त्यांनी मंगळवारी रात्री 9.30 वाजता त्यांच्या पत्नी गोदावरी यांना मोबाईल वर संपर्क साधला आणि चर्चा केली. बुधवारी 1.30 ते 2.00 च्या सुमारास सिक्कीम येथील ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला. त्यात जवान वाहून गेल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. दोन दिवसांपासून जवानांचे प्रमुख सुभेदार मेजर यांच्या समवेत संपर्क होत आहे. परंतु, ज्याठिकाणी लष्कर छावणी होती, त्या ठिकाणी संपर्क होत नसल्याच्या सूचना बंगाल बॅंकडुगी युनिट येथून मिळाली असल्याचं जवान पांडुरंग तावरे यांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी सांगितलयं.

-----------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या