इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव

 मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव



अंबाजोगाई, प्रतिनिधी.....
            गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता विविध ठिकाणच्या ग्रामपंचायती अधिकृतपणाने ठराव घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करून मराठा लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.


        मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यासाठी विविध स्तरातून अन्य समाज घटकांचाही पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे.


         मौजे राजेवाडी ता. अंबाजोगाई येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा अधिकृत ठराव घेतला.मराठा आरक्षणाला पाठिंबा  म्हणून पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा एकमताने ठराव करण्यात आला.गावच्या सरपंच रोहिणी विलास काचगुंडे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!