इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव

 मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव



अंबाजोगाई, प्रतिनिधी.....
            गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता विविध ठिकाणच्या ग्रामपंचायती अधिकृतपणाने ठराव घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करून मराठा लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.


        मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यासाठी विविध स्तरातून अन्य समाज घटकांचाही पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे.


         मौजे राजेवाडी ता. अंबाजोगाई येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा अधिकृत ठराव घेतला.मराठा आरक्षणाला पाठिंबा  म्हणून पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा एकमताने ठराव करण्यात आला.गावच्या सरपंच रोहिणी विलास काचगुंडे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या