इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आमरण उपोषणाची तारीख ठरली

 मनोज जरांगेची बीडमधून मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार



बीड : आंदोलक यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचंही जरांगे म्हणाले.


Click:● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा*


मनोज जरांगे काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली. मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुतवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. आपल्या पोरांनी काय न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकारनं झोपू नये, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा समाज शांततेत मैदानात आला आहे, विनाकारण त्याला डाग लावू नका, असं मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा केला. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. गिरीश महाजन यांनी तुम्ही काही बोलू नका छगन भुजबळ यांना समज दिली असल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण मिळाल्यानं कचका दाखवतो. भुजबळ यांच्यात किती दम आहे हे बघायचे आहे, असं जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही. मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या