इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

21 व 22 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री बंद ठेवावी-शिवकुमार केदारी

 21  व 22 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री बंद ठेवावी-शिवकुमार केदारी



परळी/प्रतिनिधी

दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून या अनुषंगाने संपूर्ण बीड जिल्हयामध्ये मद्य व मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या अद्वितीय कार्यक्रमासाठी मागील अनेक दिवसापासून संपूर्ण देशामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण आहे .  माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या कालावधीत देशभरामध्ये विविध भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आव्हान केलेले आहे. दिनांक 22 जानेवारीला तर दुसरी दिवाळी साजरी करण्याचे सुचित केलेले आहे व त्याच अनुषंगाने दिनांक 21 जानेवारी रोजी प्रभु श्रीरामांच्या भव्य दिव्य मिरवणुकीचे सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे . सध्या देशात , राज्यात सर्वत्र भक्तीमय व मंगलमय असे वातावरण निर्माण झालेले आहे . वरील दोन ही दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचे असून दि. 22 जानेवारी हा सूवर्ण ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.

सर्वांनाच प्रत्यक्ष अयोध्येत जाणे शक्य नाही सर्व लोक आपआपल्या घरी , गावात हा आनंदक्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतील . पुजा अर्चा , झगमगाट व उपवास करून प्रभु श्रीरामाचे चरणी आपली भक्ती अर्पण करतील व अशा मंगलमय वेळी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री सुरू रहाणे योग्य वाटणार नाही तसेच या दोन्ही गोष्टी सदर दोन दिवस बंद ठेवणे ही प्रभू श्रीरामा प्रती एक प्रकारची श्रद्धाच ठरेल. करिता वरील दोन्ही दिवशी राज्य शासना मार्फत राज्यात निदान जिल्ह्यात तरी मद्य विक्रीस व मांस विक्रीस निर्बंध घालण्यात यावेत असे आवाहन शिवकुमार केदारी यांनी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....