इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षणाचा आणि सत्तेचा अधिकार दिला-सरपंच सौ कल्पना खर्डे




मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी


पालम (प्रतिनिधी)

अत्यंत अडचणींना, संकटांना तोंड देत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केवळ पुढाकारच घेतला नाही तर स्त्रीयांना सुशिक्षित करण्यासोबत त्यांना सत्तेचाही अधिकार मिळवून दिला असे मत मौजे तांबुळगावच्या सरपंच सौ.कल्पना बाबुराव खर्डे यांनी व्यक्त केले.

मौजे तांबुळगाव पालम  ग्रामपंचायत कार्यालय येथे आज बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच सौ. कल्पना खर्डे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक दिगंबर खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे, लक्ष्मण जोरवर, माजी सरपंच माणिकराव उंदरे पाटील, माऊली जोरवर, बाबुराव खर्डे, काशिनाथ आवळे, पांडुरंग निळे, व्यंकटी निळे, शिवाजी नरसिंगराव गडेकर, रामेश्वर खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्त्री शिक्षण ही काळाची तेव्हाही गरज होती आणि आजही आहे. परंतू प्रतिकुल परिस्थितीला लढा देवून स्त्री शिक्षणासाठी अनुकूल वातावरण सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणले. स्त्री शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्काची जाणिव झाली असून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर असताना दिसून येतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फु ले यांनाच असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी तांबुळगाव गावातील महिला, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....