दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षणाचा आणि सत्तेचा अधिकार दिला-सरपंच सौ कल्पना खर्डे




मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी


पालम (प्रतिनिधी)

अत्यंत अडचणींना, संकटांना तोंड देत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केवळ पुढाकारच घेतला नाही तर स्त्रीयांना सुशिक्षित करण्यासोबत त्यांना सत्तेचाही अधिकार मिळवून दिला असे मत मौजे तांबुळगावच्या सरपंच सौ.कल्पना बाबुराव खर्डे यांनी व्यक्त केले.

मौजे तांबुळगाव पालम  ग्रामपंचायत कार्यालय येथे आज बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच सौ. कल्पना खर्डे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक दिगंबर खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे, लक्ष्मण जोरवर, माजी सरपंच माणिकराव उंदरे पाटील, माऊली जोरवर, बाबुराव खर्डे, काशिनाथ आवळे, पांडुरंग निळे, व्यंकटी निळे, शिवाजी नरसिंगराव गडेकर, रामेश्वर खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्त्री शिक्षण ही काळाची तेव्हाही गरज होती आणि आजही आहे. परंतू प्रतिकुल परिस्थितीला लढा देवून स्त्री शिक्षणासाठी अनुकूल वातावरण सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणले. स्त्री शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्काची जाणिव झाली असून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर असताना दिसून येतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फु ले यांनाच असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी तांबुळगाव गावातील महिला, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....