इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षणाचा आणि सत्तेचा अधिकार दिला-सरपंच सौ कल्पना खर्डे




मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी


पालम (प्रतिनिधी)

अत्यंत अडचणींना, संकटांना तोंड देत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केवळ पुढाकारच घेतला नाही तर स्त्रीयांना सुशिक्षित करण्यासोबत त्यांना सत्तेचाही अधिकार मिळवून दिला असे मत मौजे तांबुळगावच्या सरपंच सौ.कल्पना बाबुराव खर्डे यांनी व्यक्त केले.

मौजे तांबुळगाव पालम  ग्रामपंचायत कार्यालय येथे आज बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच सौ. कल्पना खर्डे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक दिगंबर खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे, लक्ष्मण जोरवर, माजी सरपंच माणिकराव उंदरे पाटील, माऊली जोरवर, बाबुराव खर्डे, काशिनाथ आवळे, पांडुरंग निळे, व्यंकटी निळे, शिवाजी नरसिंगराव गडेकर, रामेश्वर खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्त्री शिक्षण ही काळाची तेव्हाही गरज होती आणि आजही आहे. परंतू प्रतिकुल परिस्थितीला लढा देवून स्त्री शिक्षणासाठी अनुकूल वातावरण सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणले. स्त्री शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्काची जाणिव झाली असून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर असताना दिसून येतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फु ले यांनाच असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी तांबुळगाव गावातील महिला, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या