23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट



मुंबई(प्रतिनिधी)

 भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केवळ बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातल्या हितचिंतक तथा अठरापगड जातीधर्माच्या सामान्य लोकांना कमालीचा आनंद वाटला. मात्र विधान परिषद हे आमच्या नेतृत्वासाठी मिळालेली संधी आनंदाची गोष्ट असली तरी  यापेक्षा मोठं होवुन संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करावं अशा प्रकारची भावना परळीतुन आलेले कडवे समर्थक नरसिंग सिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

       पंकजा मुंडे यांच्या वरळी स्थित निवासस्थानी तीन दिवसापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन भेटण्यास येणार्‍याच्या गर्दीत तुफान वाढ झाली.मागच्या पाच वर्षापासुन राजकिय प्रतिष्ठा मिळण्याची सामान्य लोक वाट पहात होते.पक्षानं विधान परिषद उमेदवारी पहिल्या क्रमांकात त्यांना दिली. कदाचित भविष्यात मोठी राजकिय जबाबदारी देखील त्यांच्यावर येवु शकते यात तिळमात्र शंका नाही. नरसिंग सिरसाट ज्यांना सावकार म्हणुन परळीत ओळखल्या जातं. पंकजाताईचे कडवे समर्थक असंही म्हणता येईल.नगर परिषद, बाजार समिती, अशा अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. तळमळीचा कार्यकर्ता, निष्ठेचा भोक्ता यातुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. संघटन आणि मित्र कसे जोडावेत?ही राजकिय कला त्यांच्याकडे आहे. आमच्या प्रतिनिधीसोबत त्यांची कार्यालयात भेट झाली. ते म्हणाले, आज आमचं स्वप्न साकार होतंय याचा मनस्वी आनंद आम्हा होतच आहे पण एवढीच आम्हासारख्याची भुक नव्हे. कारण पंकजाताई हे नेतृत्व अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन चालतं. स्वाभिमानाचं राजकारण करताना मोठ्या साहेबांचा वारसा चालवताना उपेक्षित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेची सेवा त्यांनी केली. लोक कल्याणाची दिशा त्यांच्या नेतृत्वात आहे. प्रामाणिक नेतृत्व आणि पारदर्शी राजकारण यातुन आमच्यासारख्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. लोकसभेत झालेला पराभव नैतिकदृष्ट्या आमचा विजयच म्हणावा लागेल.ज्यांनी गद्दारी केली, असे चेहरे उघडकीस आले.


Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !


     पण असं असलं तरी विधान परिषदेच्या माध्यमातुन सन्मान वाढला.तो मनस्वी आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला झाला.मात्र यापेक्षा अधिक जबाबदारी त्यांच्यावर येण्याची गरज वाटते.कारण सामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे नेतृत्व उपयुक्त असुन यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्याकडे यावी असं देखील त्यांनी म्हटलं.आपण तीर्थक्षेत्र अक्कलकोट, गाणगापुर आणि पंढरपुर,शिर्डी आदी देवस्थानाला ताईसाहेबांसाठी नवस बोलले असुन इच्छा पुर्ण झाल्याने आम्ही श्रद्धाही पुर्ण करणार असल्याचे पंकजाताई समर्थक तथा सारांश निधी अर्बनचे चेअरमन  सांगितले नरसिंग सिरसाट यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?