संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट



मुंबई(प्रतिनिधी)

 भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केवळ बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातल्या हितचिंतक तथा अठरापगड जातीधर्माच्या सामान्य लोकांना कमालीचा आनंद वाटला. मात्र विधान परिषद हे आमच्या नेतृत्वासाठी मिळालेली संधी आनंदाची गोष्ट असली तरी  यापेक्षा मोठं होवुन संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करावं अशा प्रकारची भावना परळीतुन आलेले कडवे समर्थक नरसिंग सिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

       पंकजा मुंडे यांच्या वरळी स्थित निवासस्थानी तीन दिवसापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन भेटण्यास येणार्‍याच्या गर्दीत तुफान वाढ झाली.मागच्या पाच वर्षापासुन राजकिय प्रतिष्ठा मिळण्याची सामान्य लोक वाट पहात होते.पक्षानं विधान परिषद उमेदवारी पहिल्या क्रमांकात त्यांना दिली. कदाचित भविष्यात मोठी राजकिय जबाबदारी देखील त्यांच्यावर येवु शकते यात तिळमात्र शंका नाही. नरसिंग सिरसाट ज्यांना सावकार म्हणुन परळीत ओळखल्या जातं. पंकजाताईचे कडवे समर्थक असंही म्हणता येईल.नगर परिषद, बाजार समिती, अशा अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. तळमळीचा कार्यकर्ता, निष्ठेचा भोक्ता यातुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. संघटन आणि मित्र कसे जोडावेत?ही राजकिय कला त्यांच्याकडे आहे. आमच्या प्रतिनिधीसोबत त्यांची कार्यालयात भेट झाली. ते म्हणाले, आज आमचं स्वप्न साकार होतंय याचा मनस्वी आनंद आम्हा होतच आहे पण एवढीच आम्हासारख्याची भुक नव्हे. कारण पंकजाताई हे नेतृत्व अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन चालतं. स्वाभिमानाचं राजकारण करताना मोठ्या साहेबांचा वारसा चालवताना उपेक्षित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेची सेवा त्यांनी केली. लोक कल्याणाची दिशा त्यांच्या नेतृत्वात आहे. प्रामाणिक नेतृत्व आणि पारदर्शी राजकारण यातुन आमच्यासारख्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. लोकसभेत झालेला पराभव नैतिकदृष्ट्या आमचा विजयच म्हणावा लागेल.ज्यांनी गद्दारी केली, असे चेहरे उघडकीस आले.


Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !


     पण असं असलं तरी विधान परिषदेच्या माध्यमातुन सन्मान वाढला.तो मनस्वी आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला झाला.मात्र यापेक्षा अधिक जबाबदारी त्यांच्यावर येण्याची गरज वाटते.कारण सामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे नेतृत्व उपयुक्त असुन यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्याकडे यावी असं देखील त्यांनी म्हटलं.आपण तीर्थक्षेत्र अक्कलकोट, गाणगापुर आणि पंढरपुर,शिर्डी आदी देवस्थानाला ताईसाहेबांसाठी नवस बोलले असुन इच्छा पुर्ण झाल्याने आम्ही श्रद्धाही पुर्ण करणार असल्याचे पंकजाताई समर्थक तथा सारांश निधी अर्बनचे चेअरमन  सांगितले नरसिंग सिरसाट यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....