प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे

 बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून परळीतील 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे वाटप




कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे


 परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

         बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने (लालबावटा) नोंदी केलेल्या 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे (भांडे) मंडळाकडून बीड येथे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना सुरक्षा(पेटी) व गृहउपयोगी संच(भांडे) मोफत वाटप केली जातात. यापूर्वी पेट्या व गृहउपयोगी संच तालुक्याच्या ठिकाणी किवा कामगारांच्या राहत्या गांवात आणून दिले जात होते. परंतू कामगारांची फार लूट होत आहे म्हणून मंडळाने जिल्हा ठिकाणीच पेट्या व भांडे कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे असे अधिकाऱ्यांकडून बोलते जाते.

          गृहउपयोगी संच आणणे प्रत्येक कामगाराम अत्यंत त्रासदायक आहे.संच वाटप केंद्र बीडपासून आठ किलोमीटर दूर आहे व रिक्षा किमान 500 रु. घेतो. जिल्हयातील बांधकाम कामगारांना संच मिळण्यासाठी तालुक्याप्रमाणे वार ठरवून दिले आहेत परंतू जिल्ह‌यातील सर्व ठिकाणचे कामगार रोज येतात. आलेले कामगार कोणाचेच ऐकत नाहीत. वाटप कंत्राटदार हातबल आहे. कोणत्याही अधिका-याचा कसलाच प्रभाव नाही व कामगार ऐकतच नाहीत. संघटनेने परळीतून मोठे टेम्पो भरून 110 कामगार बीडला नेले होते, कामगार घरून सकाळी ८ वाजता निघाले व रात्री ११ वाजता परळीत आले. कामगारांना त्यांच्या जवळची भाकरी खाता आली नाही.कामगारांबरोबर प्रा. खाडे, शेख जावेद, शेख अजहर, शेख नवीद, प्रकाश वाघमारे, बाबा रोडे, प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी भरपूर मेहनत घेतली. एका कामगाराला स्वतंत्र भांडे आणण्यास अनाठायी खर्च होतो.


Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !


बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना मोफत भांडे वाटप आहे अशी जागृति निर्माण करावी तसेच सामाजीक कार्यकर्त्यांकडून लूट होणार नाही याचा प्रयत्न करावा. तसेच सुरक्षा संच व गृहउपयोगी संच किमान तालुक्याच्या ठिकाणी आणून द्यावेत ही बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या