दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

परळीत कुत्रे पिसाळले !

 परळीत कुत्रे पिसाळले: 23 जणांना घेतला चावा ; नागरीकांनी काळजी घ्यावी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या दोन तासांमध्ये सुमारे 23 जणांचा सहावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. आज गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान चावा घेतलेल्या नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच गर्दी केली होती.

       गुरुवार दिनांक 24 ऑक्चटोबर रोजी सांयकाळी 6.30 वाजल्याचे नंतर नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. समोर येईल त्याला आणि पुढे चालणाऱ्याला पाठीमागून चावा घेत अवघ्या दीड दोन तासांत 23 लोकांना जखमी केले चावा घेतलेल्या नागरिकांनी परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी धाव घेतली.  तेथे रुग्णांना इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आले. दरम्यान अवघ्या काही वेळामध्येच रुग्णालयामध्ये अक्षरशः कुत्रा चावलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती.

     पिसाळलेला कुत्रा परिसरामध्ये धुमाकूळ घालत असून 23 चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपालिकेने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.

टिप्पण्या

  1. 23 नाही 30 जणांना म्हणजे काल 29 चा आकडा होता आज सकाळी 5 ला एकजण फिरायला आलेला व्यक्तीस चावला

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....