परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक होणार बंद!

परळी शहरातील ओव्हर ब्रीज वरील वाहतूक रस्ता ७ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान राहणार बंद



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

      शहरातील ईटके कॉर्नर कडून येणारा ओव्हर ब्रीज वरील मुख्य वाहतूक रस्ता दि. ७ जुलै २०२५ पासून २७ जुलै २०२५ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

       प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत रस्त्याचे दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.  नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला होता. आता आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक  बंद होणार आहे.


उड्डाणपूल दुरुस्तीचे महत्त्व

हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून वापरात असून, काही ठिकाणी तांत्रिक दोष, गंज व थरांचे नुकसान झाले आहे. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पुलाचा कालावधी वाढवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. कामांनंतर पुलाची स्थिती अधिक सुरक्षित व स्थिर होणार असून, वाहनचालकांसाठीही तो निर्धोक होणार आहे.


टिप्पण्या

  1. दुचाकी साठी कमीत कमी दुसरा पर्यायी रस्ता करायला पाहिजे होता..

    उत्तर द्याहटवा
  2. पर्यायी रस्ता वापरल्याने उड्डाण पुलाच्या या टोकापासून त्या टोकाकडे (१ किमी पेक्षा कमी अंतर) जाण्यासाठी १० किमी लागतील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!