मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक होणार बंद!

परळी शहरातील ओव्हर ब्रीज वरील वाहतूक रस्ता ७ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान राहणार बंद



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

      शहरातील ईटके कॉर्नर कडून येणारा ओव्हर ब्रीज वरील मुख्य वाहतूक रस्ता दि. ७ जुलै २०२५ पासून २७ जुलै २०२५ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

       प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत रस्त्याचे दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.  नागरिकांकडून ‘वाहतूक पूर्णपणे बंद करू नये’ अशी मागणी करण्यात येत होती. ही जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळात करण्याचा मार्ग निवडला होता. आता आषाढी एकादशीनंतर दुसर्‍या दिवसापासून उड्डाणपूल वाहतूक  बंद होणार आहे.


उड्डाणपूल दुरुस्तीचे महत्त्व

हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून वापरात असून, काही ठिकाणी तांत्रिक दोष, गंज व थरांचे नुकसान झाले आहे. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पुलाचा कालावधी वाढवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. कामांनंतर पुलाची स्थिती अधिक सुरक्षित व स्थिर होणार असून, वाहनचालकांसाठीही तो निर्धोक होणार आहे.


टिप्पण्या

  1. दुचाकी साठी कमीत कमी दुसरा पर्यायी रस्ता करायला पाहिजे होता..

    उत्तर द्याहटवा
  2. पर्यायी रस्ता वापरल्याने उड्डाण पुलाच्या या टोकापासून त्या टोकाकडे (१ किमी पेक्षा कमी अंतर) जाण्यासाठी १० किमी लागतील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....