प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!

 जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच होणार ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!




            सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्रामपंचायतचे अर्ज भरण्यास सर्वांचं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, आता हीच अडचण जिल्हाधिकारी रधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाच्या कानावर घातली आहे, ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे, याला आयोग काही तासातच हिरवा कंदील दाखवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे, दरम्यान आयोगाकडून परवानगी मिळताच ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी  म्हटले आहे, यासंदर्भात एमबी न्युज  आवाज उठवत आहे,

 

संबंधित बातमी: click:-🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!*


🔸एमबी न्युज ने मांडला होता मुद्दा: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी


         राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याने उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत.अशी मागणी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे.


             शुक्रवार दि. 02 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ही बाब विचारात घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा अनेक इच्छुक उमेदवार हे नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात. 


Click:- 🛑 *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी* _एमबी न्युज ने मांडला होता वेबसाईटला येणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दा_


याबाबत आ.धनजय मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. तात्काळ याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

       दरम्यान या बाबतीत एमबी न्युज ने सविस्तर वृत्त प्रकाशित करुन नागरिकांना येणाऱ्या अडचणीचा मुद्दा पुढे आणला होता.याची दखल घेत आ.धनंजय मुंडे यांनी याबाबत आता आवाज उठवला आहे.यामुळे इच्छुक उमेदवारांना येणाऱ्या अडचणी दुर होतील अशी अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या