प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

हैदराबाद मुक्तिसंग्रामावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे-डॉ सतिश कदम

 हैदराबाद मुक्तिसंग्रामावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे-डॉ सतिश कदम






  परळी प्रतिनिधी ----जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये इतिहास, समाजशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर एक दिवशी राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सतीश कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम संदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री सदाशिवराव मुंडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड ,बीजभाषक डॉ.सतीश कदम , पुणे येथील टिळक विद्यापीठातील इतिहास विभागाच्या डॉ. नलिनी वाघमारे, प्राचार्य, अरुण दळवे ,डॉ.विनोद जगतकर, सेमिनारचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के. शेप व प्राणीशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ विनोद गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यातील विविध पैलूवर थोडक्यात विचारमंथन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून इतिहास दर्पण व समाज दर्पण या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बीज भाषक म्हणून बोलताना डॉ. कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील विविध पैलूवर प्रकाश टाकला. तसेच हैदराबाद संस्थानातील नावीन्यपूर्ण घटनांची माहिती संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगलीच भर पडली. हैदराबाद संस्थानातील विविध घटकांवर संशोधन होणे गरजेचे आहे त्याशिवाय खरा इतिहास जनसामान्यापर्यंत येणार नाही असेही मत याप्रसंगी व्यक्त केले. तर डॉ.नलिनी वाघमारे यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लोकसाहित्य विशेष संदर्भ बिदर जिल्हा यावर सखोल विवेचन केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात लोकसाहित्य किती महत्त्वाचे होते हे आपल्या व्याख्यानातून संशोधकांना सांगण्याचा प्रयत्न याप्रसंगी केला. तर डॉ. विनोद जगतकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर मांडणी केली. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले होते असेही मत यास प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.राठोड यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हैदराबाद मुक्ती लढा हे महत्त्वपूर्ण पर्व होते असे सांगून निजाम राजवटीच्या काळात तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती कशी  होती याचे विवेचन या प्रसंगी केले. या सेमिनारच्या समारोप सत्रात खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याच्या संदर्भात हैदराबाद मुक्तिसंग्राम, ज्याला ऑपरेशन पोलो म्हणूनही ओळखले जाते, या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ , आनंत भालेराव ,बाबासाहेब परांजपे या  स्वातंत्र्य सैनिकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.भारत सरकारने हैदराबाद संस्थानाला जोडण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केली. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती असेही मत याप्रसंगी व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ.अर्चना चव्हाण व डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले तर आभार डॉ. विनोद गायकवाड यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने प्राध्यापक शिक्षकेत्तर  कर्मचारी व बाहेरून आलेले प्राध्यापक व संशोधक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.


---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या