पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
इमेज
  परळीच्या बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट;पाच जणांचे मोबाईल हातोहात पळवले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     परळीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.परळीतील चोऱ्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. परळीच्या बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट झाला असुन काल दिनांक.29 रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास घरणीकर रोडवरील बाजारात खरेदी करणाऱ्या पाच जणांचे मोबाईल हातोहात पळवले आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि. 29 रोजी सायंकाळी चार ते सात वाजण्याच्या सुमारास धरणीकर रोडवरील बाजारात बाजाराची खरेदी करत असताना फिर्यादी मनोज प्रल्हाद अग्रवाल रा. विद्यानगर परळी वैजनाथ यांचा मोबाईल गर्दीमध्ये अज्ञात चोरट्याने खिशातून काढून घेतला. त्याचबरोबर श्रीनिवास किशनराव कुलकर्णी रा. कावळ्याची वाडी यांचा मोबाईल तसेच अरुण प्रभू चव्हाण रा. वसंत नगर ,बंडू लक्ष्मण मुंडे रा. लिंबुटा, बापूराव विष्णू खोत पाटील रा. शंकर पार्वती नगर परळी वैजनाथ अशा पाच जणांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी खिशातून काढून नेला. या पाच मोबाईल...
इमेज
 * हेळंब सेवा सोसायटीवर पंकजाताई मुंडेंच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व* *जय मल्हार शेतकरी विकास पॅनलचे  सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन* परळी  । दिनांक २८।    तालुक्यातील हेळंब सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित  पॅनेलला पराभवाची धुळ चारत भाजप प्रणित पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.    हेळंब सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी आज निवडणूक झाली.  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव करत सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला.  या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - लक्ष्मण आंधळे, रामराव पवार, तुकाराम पाळवदे, यशवंत पाळवदे, प्रभू राठोड, काशीनाथ होळंबे, माधव होळंबे, व्यंकटी होळंबे, नानासाहेब होळंबे, सुरेखा आं...
इमेज
  थर्मलजवळील जिलेटिन स्फोट घटना ; सुरक्षा यंत्रणा सदैव सतर्क- थर्मलला काहीही धोका नाही ! नागरिकांनी घाबरून जाऊ नये- मोहन आव्हाड             परळी वैजनाथ, प्रतिनिधी... अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र व औष्णीक वीज निर्मिती केंद्रात येणार्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            मराठवाड्यातील एकमेव असलेले परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र कायम अतिसंवेदनशील राहिले आहे.या औष्णीक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी व इतर व्यक्तीपासुन धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. शुक्रवार दि.26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्या...
इमेज
  चक्क... पोलीस ठाण्यातूनच पकडलेल्या दोन आरोपींचा गुंगारा  पेठ बीड ठाण्यातून दोन आरोपींचा गुंगारा ! बीड- गुटखा तस्करी प्रकरणात एसपींच्या विशेष पथकाने पकडलेले दोन आरोपी पेठ बीड पोलीस ठाण्यातून फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रभर आरोपींचा शोध सुरू आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.या पथकाने शनिवारी बार्शी नाका भागात एक जीप पकडली.ज्यामध्ये 8 लाखाचा गुटखा सापडला.या प्रकरणात शेख मोहसीन आणि शेख इकबाल या दोघांना अटक केली. या आरोपींना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्यावेळी आरोपीनी मळमळ होत असल्याचा बहाणा करत पोलीस शिपाई संजयकुमार राठोड यांच्या तावडीतून हे दोघे फरार झाले.या आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रभर पोलीस पथके गस्त घालत होते. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
इमेज
  नीट परिक्षेचा निकाल 7 तारखेला ! नवी दिल्ली- मेडिकल एन्टरन्स परीक्षेच्या अर्थात नीट ची निकालाची तारीख जाहीर झाली आहे.7 सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असून त्यापूर्वी omr शिट्स आणि उत्तरपत्रिका मिळेल.त्यामुळे विद्यार्थ्यांनो तयारीत रहा अन अपडेट मिळवण्यासाठी News&Views शी कनेक्टेड रहा. नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे. देशातील एकूण १८, ७२, ३२९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी १०.६४ विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. देशात नीटसाठी पहिल्यांदाच १८ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. याचे निकाल 30 ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. neet.nta.nic.in या वेबसाईटवर जा...
इमेज
  पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ;तात्काळ पंचनामे करा- खा.डॉ.प्रीतम मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी..         मागील वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असून याची चौकशी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.         याबाबत खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यामध्ये मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची चौकशी करून पंचनामे करणे अत्यंतआवश्यकआहे.मागील वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन फुलोरा असताना ही दाणे भरण्याची प्रक्रिया थांबली आहे तसेच कापसामध्ये पण पातेगळ (पाने गळणे) होत आहे. त्याच बरोबर मुग, उडीद इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदील झाला...
इमेज
भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी घेतली  शपथ  नवी दिल्ली, दि. 27 : भारताचे 49 वे  सरन्यायाधीश  म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी  आज  शपथ  घेतली. राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी  सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी ( दि. 26 ऑगस्ट 2022) संपला. न्या.लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व 8 नोव्हेंबर 2022  रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!