इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ;तात्काळ पंचनामे करा- खा.डॉ.प्रीतम मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
        मागील वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असून याची चौकशी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
        याबाबत खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यामध्ये मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची चौकशी करून पंचनामे करणे अत्यंतआवश्यकआहे.मागील वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन फुलोरा असताना ही दाणे भरण्याची प्रक्रिया थांबली आहे तसेच कापसामध्ये पण पातेगळ (पाने गळणे) होत आहे. त्याच बरोबर मुग, उडीद इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.अशा संकटसमयी याबाबत चौकशी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!