पोस्ट्स

MB NEWS:बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे

इमेज
 ● परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होणार बाल संस्कार केंद्र: आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           आजकाल मोबाईल, कार्टून, गेम्स, व्हीडीओ या नव्या माध्यमांच्या वर्तुळात वाढणाऱ्या लहान मुलांना गोष्टींतून संस्कार देणे अनेकदा कठीण होते. पूर्वी आजी-आजोबांच्या गोष्टीतून जगण्याची दिशा आणि शिस्त मुलांमध्ये रुजविली जात असे. आता ही सहज बाबही मागे सरत आहे. हाच हेतू समोर  ठेवून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परळीत बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात येत आहे.आ.धनंजय मुंडे यांच्याहस्ते माहितीपत्रकाचे विमोचन  करण्यात आले.संस्कार केंद्र ही काळाची गरज असुन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.       पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन  करण्यात आले.यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त नंदकिशोर जाजू, प...

MB NEWS:प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्काराने सन्मानित

इमेज
  प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे  "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्काराने सन्मानित  जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था(धानोरा) ,अंबाजोगाई आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात दि.११मार्च २०२३ रोजी संमेलनाध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील,उदघाटक हभप प्रकाश महाराज बोधले,माजी मंत्री मा.पंडितराव दौंड,वसंतराव मोरे, राजेसाहेब देशमुख ,उद्धव बापू आपेगवकर,संकेत मुनोत,विद्याधर पांडे, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब,चंद्रकांत हजारे, विश्वांभर वराट,ॲड.अनंतराव जगतकर, आयोजक मनीषा पांडे, संभाजीराव सुळ, अनिरुद्ध येचाळे, बसवंत उबाळे, बा. सो. कांबळे,प्रा. संतराम कराड आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार त्यांनी आपले आद्यनाटय गुरू स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या स्मृतीस अर्पण केला आहे. कवी-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक-समीक्षक आणि संशोधक म्हणून प्रा.डॉ. सिध्दार्थ तायडे सर्वपरिचित आहेत. प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा कला क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी आहे.त्यांनी अनेक नाट्यकृतींचे दमदार सादरीकरण केले आहे. त्यांच्या लघुपटांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्री...

MB NEWS:पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ मतदारसंघात रस्त्यासाठी आणले ३२ कोटी

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी कौठळीच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला ! पद्मावती नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ  मतदारसंघात रस्त्यासाठी आणले ३२ कोटी परळी वैजनाथ ।दिनांक १२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडून मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद करून घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शासनाने वेगवेगळ्या   रस्त्यासाठी ३२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. कौठळी येथील पद्मावती नदीवरील पुल बांधकामासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी आणून त्यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. सरपंच व ग्रामस्थांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.      पंकजाताई मुंडे नेहमीच परळी मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असतात. पालकमंत्री असताना त्यांनी कधी मिळाला नाही एवढा कोटयवधीचा निधी आणून विकास कामं केली  आणि आता  केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत, शिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्यांनी विव...

MB NEWS:सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांना मातृशोक

इमेज
  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांना मातृशोक प्रयागबाई बळीराम शेळके यांचे  निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय - 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.  याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.  उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रयागबाई शेळके यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे रविवारी दुपारी 5 वाजता करण्यात येणार आहेत.

MB NEWS:बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ

इमेज
  संगणक शिक्षणासाठी कामगार पाल्यांना २ लाखाचे अर्थसहाय्य मंजूर  बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्स करणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य केले जाते. बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार व कामगार पाल्यांनी एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्से उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना कामगार कल्याण मंडळातर्फे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले. कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, एम.एस.सी-आयटी हा कोर्स पूर्ण करून व्यवसाय करता यावा तसेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी या योजनेंतर्गत अर्थसहाय्य करून प्रोत्साहन दिले जाते. यंदाच्या वर्षात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार पाल्यांना २ लाख २ हजार ९५० रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेली रक्कम लाभार्थींच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ---‐------‐---------------------------------------- कामगारांची मुले संगणक शिक्षणात पुढे यावी. संगणक शिक्षणातून आर्थिक ...

MB NEWS:यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर

इमेज
  यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर  परळी प्रतिनिधी ---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक व इतिहास विभाग प्रमुख  डॉ.  बाबासाहेब शेप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केद्र प्रमुख डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार प्रेरणादायी होते ते आजच्या युगात आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना विविध प्रकारच्या सुधारणा करून महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या कार्यामुळेच मुक्त विद्यापी...

MB NEWS:सकाळी 8 वाजता घडला अपघात; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

इमेज
  अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याच्या आईचा मृत्यू सकाळी 8 वाजता घडला अपघात; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिवसेंदिवस परळी शहरातील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील रहदारीच्या रस्त्याने सुसाट आणि अनियंत्रित मोटारसायकली पळवण्याचे सर्रास प्रकार होत असून, याचा फटका एका पोलीस कर्मचाऱ्यालाच रविवारी बसला. अतिप्रचंड वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या वयोवृद्ध आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सदरील घटना घडली. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय - 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.  याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.  उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना ...