पोस्ट्स

इमेज
  जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद      अजित पवार यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान विरोधीपक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. तसेच इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत अशी भूमिका जाहीर केली आहे.यानंतर राष्ट्रवाद पक्ष कोणाकडे आहे याबद्दल जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल...
इमेज
  धनंजय मुंडेंनी घेतली दुसर्‍यांदा मंत्रीपदाची शपथ बीड दि. 01 : उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडचे धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्री पद मिळाले आहे. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराजबाबा अत्राम यांनी तर पाहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनतर संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यांना कोणती खाते मिळणार हे रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. तर हे अजित पवार यांचे बंड असल्याचे उघड झाले असून याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ

इमेज
  राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ मुंबई - अजित पवार यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडत असतांनाच ते आपल्या सहकाऱ्यांसह शपथविधी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या एकूण नऊ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात माहितीनुसार अजित पवारांसह राष्ट्रवादीचे घडामोडी गतीमान झाल्यानंतर आता राष्ट्रवादीची फुट पडणार असल्याची जवळपास स्पष्ट झालेले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडून राज्यात सत्तांतर घेतले. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील फुट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे राजभवनाकडे निघाले असून त्यांच्यासह नऊ नेते शपथविधी घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे आदींचा समावेश असेल अशी माहिती समोर आली आहे. आजच मंत्रीपदाचा शपथविधी होणार अ...
इमेज
  वेगाने राजकीय घडामोडी: अजितदादा राजभवनात बीड : राज्यात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या असून आजच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे सांगितले जात असून बीड जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच आपल्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार उपस्थित असून 'बैठक संपल्यावर अजित पवार राजभवनात जाणार असल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात येणार असून मागच्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते मात्र यावेळी बीड तील एक नेता मंत्री म्हणून शपथ घेणे मानले जात आहे. त्यामुळे आता नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.

शालेय साहित्य वितरण

इमेज
  मनसेतर्फे कृषीमहर्षी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट येथे साजरी करण्यात आली. मनसेच्या "शिवतीर्थ" कार्यालयात स्व.वसंतराव नाईकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले    तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी लाहान मुलांना वसंतराव नाईक कोण आहेत त्यांना हरीत क्रांतीचे जनक म्हणून का संबोधले जाते या बदल समजावून सांगितल व सेवकराम जाधव सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छां देण्यात आल्या.    या...

आदर्श पायंडा- अनोखा वाढदिवस

इमेज
  वाचनालय सुरु करुन सोपान ताटे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा     परळी (प्रतिनिधी)     बुद्ध फुले आंबेडकर चळवळीतील अग्रेसर असणारे भिमनगर येथील सोपान ताटे यांचा वाढदिवस आज 1 जुलै रोजी प्रस्थापित पद्धतीला नाकारून कसलाही ताम धाम न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन करून संपन्न करण्यात आला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सोपान ताटे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.        भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमान्य सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कॉम्रेड पी. एस. घाडगे सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, भिमनगर वंदना संघाचे संचालक प्रा.विलास रोडे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते भारत ताटे, माजी नगरसेवक नितीन रोडे, काँग्रेस नेते गणपत आप्पा कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.      यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास युवक नेते भारत ताटे यांनी 5000 रुपयाची देणगी जाही...
इमेज
  दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने  सोमवारी परळीत गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने उद्या सोमवार दि.3 जुलै रोजी गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी संस्थानच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. येथील हालगे गार्डन, परळी वै. मध्ये असलेल्या प्रशस्त भव्य प्रांगणात सोमवारी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनानुसार हा उत्सव साजरा केला जाणार असून सकाळी 9 वा. गुरू पुजन व त्यानंतर धार्मीक कार्यक्रमांना प्रारंभ केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सत्संग, किर्तन, प्रवचन व भजनाचाही कार्यक्रम संपन्न होणार आहे.  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने या धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मीक सोहळयाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.