पोस्ट्स

महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातही डंका : 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

इमेज
  महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातही डंका : 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड परळी / प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील व ग्रामीण भागातील नावाजलेली संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 6 विद्यार्थिनींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेले 6 विद्यार्थिनी हे राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. ग्रामीण भागातील सर्वात जुनी व नावाजलेली शिक्षण संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून एस.एस.सी, एच.एस.सी बोर्ड परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यासह सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा,संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शालेय विद्यार्थिनी यांनी नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हा पातळीवर आपली छाप निर्माण केली. संपन्न झालेल्य...

हेमंत पाटील यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

इमेज
    हेमंत पाटील यांनी दिला खासदारकीचा राजीनामा   हिंगोली: प्रतिनिधी.....मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असून समाजाच्या भावना लक्षात घेत हिंगोलीचे खासदार  हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाना देत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठींबा आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या भावना समजून घेवून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बालाघाट हाफ मॅराथॉन स्पर्धेत कु. निकीता म्हात्रे व कु. अश्विनी जाधव यांना सुवर्ण पदक

इमेज
  बालाघाट हाफ मॅराथॉन स्पर्धेत कु. निकीता म्हात्रे व कु. अश्विनी जाधव यांना सुवर्ण पदक सिरसाळा (वार्ताहर):- योगा प्रतिष्ठान, तिरुमला ऑईल आणि कुटे ग्रुप बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बालाघाट हाफ मॅराथॉनचे आयोजन आज दी. २९ ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात आले होते. या मॅराथॉन स्पर्धा *२१ कि.मी. आणि १०  की. मि.* आशा दोन प्रकारात घेण्यात आल्या. २१ कि.मी. मॅराथॉन स्पर्धेत *कू. निकिता म्हात्रे* (बी ए द्वितीय वर्ष) आणि १०  कि.मी. मॅराथॉन स्पर्धेत *कू. आश्विन जाधव* (बी एस सी द्वितीय वर्ष) श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालय सिरसाळा च्या या दोन्ही *मुलींनी अनुक्रमे प्रथम क्रमांक* पटकावला. यांना योगा प्रतिष्ठान, तिरुमला ऑईल आणि कुटे ग्रुप बीड यांच्या तर्फे अनुक्रमे ११००० रूपये रोख आणि सायकल बक्षीस म्हणून देण्यात आले.  त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम , सचिव, योगेश  कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्याप...

सकल मराठा आरक्षण आंदोलनास ब्राह्मण महाशिखर परिषदेचा जाहीर पाठिंबा : अनिल बोर्डे

इमेज
सकल मराठा आरक्षण आंदोलनास ब्राह्मण महाशिखर परिषदेचा जाहीर पाठिंबा : अनिल बोर्डे गेवराई:- गेवराई शहरात शांततामय वातावरणात चालू असलेल्या सकल मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राह्मण महाशिखर परिषद चे तालुका संघटक यांनी पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राह्मण महा शिखर परिषद भारतचे अध्यक्ष सचिन वाडे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत दडके यांच्या सहमतीने व गेवराई शहरातील ब्राह्मण महा शिखर परिषद भारतचे कार्यकर्ते व व इतर सकल ब्राह्मण यांच्या मागणीनुसार गेवराई शहरातील सकल मराठा आरक्षण आंदोलनास प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा दिलेला आहे    सकल मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून शांततामय वातावरणात आंदोलन मोर्चेकरीत आहेत तरी शासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही तरी सकल मराठा समाजाचा प्रश्न शासनाने तात्काळ सोडविण्यात यावा तसेच उपोषणास बसलेल्या समाज बांधवास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे     या निवेदनावर ब्राह्मण महा शिखर परिषद भारत तालुका संघटक अनिल बोर्डे श्रीकृष्ण मुळे अशोक देऊळगावकर जगन्नाथराव जोशी विश्वास चपळगावकर चंद्रकांत बोर्डे भास्कर अंबादास जोशी एस ...

अंबाजोगाई तालुक्यातील घटना

इमेज
  मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना अंबाजोगाई - तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री ११.३० वाजताच्या घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

ना. धनंजय मुंडेंचे अभिनंदन व विशेष आभार

इमेज
  परळी वैजनाथ तालुक्यातील संगांयो, इंगांयो, श्रावण बाळ, निराधार लाभार्थी यांची दिवाळी होणार गोड : डॉ. संतोष मुंडे ना. धनंजय मुंडेंचे अभिनंदन व विशेष आभार लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा आता लाभार्थ्यांना 1000 नाही तर 1500 रुपये दरमहा मिळणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना अंतर्गत असलेल्या निराधारांची यंदा दिवाळी गोड होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली. एकूण 24436 लाभार्थ्यांचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्याचे अनुदान थकीत होते. त्यासाठी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. अखेर 26 ऑक्टोबर रोजी सर्व लाभार्थी यांना मिळणारी एकूण अनुदान रक्कम रु 10,85,79,600/एवढी बँकेत तहसील कार्यालयाने जमा केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला 1000/रु ऐवजी 1500/रु महिना प्रमाणे अनुदान मिळणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी पैसे ...

मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव

इमेज
  मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव अंबाजोगाई, प्रतिनिधी.....             गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता विविध ठिकाणच्या ग्रामपंचायती अधिकृतपणाने ठराव घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करून मराठा लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. Click - ■ *मराठा आरक्षणाला पाठिंबा: ब्राह्मण महिला उपसरपंचाने दिला राजीनामा*         मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकार...