पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी, चंदनउटी पूजेचा देखील समावेश,

इमेज
  विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 मधील पुजांची होणार नोंदणी, घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी, चंदनउटी पूजेचा देखील समावेश पंढरपूर (ता.19) - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि.25 मार्च रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.            याबाबत मंदिर समितीच्या दि. 03 मार्च रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.  यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्ट...
इमेज
बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू, परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध  बीड  जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं बीड जिल्ह्यातील वातावरण गरम आहे.जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे.       जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेत. 19 मार्च मध्य रात्री बारापासून ते 2 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असतील. परिस्थिती लक्षात घेऊन यात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील.  राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांचे न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने, उपोषण मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे. 
इमेज
  20 मार्च चिमणी दिन : योगेश्वरी ग्रीन आर्मीच्यावतीने एक घास चिऊसाठी उपक्रम पक्षांना चारा व पाणी घरावर ठेवून सत्कर्म करा - वनश्री मेजर एस पी कुलकर्णी अंबाजोगाई (वसुदेव शिंद)... आज जागतिक चिमणी दिवस. पृथ्वीतलावर मनुष्य, वनस्पती, प्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत. काही वर्षांपूर्वी हे सर्व गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सहकार्याने राहत होते. पण मानवाने निसर्गामध्ये ढवळाढवळ केली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. त्यामुळे पक्षांच्या घरांना उध्वस्त केले. त्यांना राहिला जागा नाही त्यामुळे त्यांचे स्थलांतर व विनाश होण्यास सुरुवात झाली. चिमणी हा पक्षी उपयुक्त आहे. पण त्याचीही विध्वंस मानवाने केला मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला. चिमणीचा चिवचिवाट याला कंटाळून चीनमध्ये एक वर्षी पूर्ण चिमण्या नष्ट करण्याचा उपक्रम राबवला. तेव्हा त्या देशातील बटाट्याची शेती धोक्यात आली. कारण बटाट्याच्या पिकावर येणारी अळी केवळ चिमणीच खाते त्यामुळे चिमणी वाढविण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले गेले. आज आपल्या देशात ही चिमण्या नष्ट होत आहेत. तेव्हा त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर वृक्ष ...

पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी निर्णय

इमेज
राज्यात लवकरच आर्थिक गुप्तचर शाखा; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा बीडच्या ज्ञानराधा पतसंस्थेबाबत मोठी घोषणा   मुंबई : राज्यात लवकरच आर्थिक गुप्तचर शाखा सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तर व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाट व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.या युनिटच्या माध्यमातून अशा योजना जाहिरातींची माहिती घेऊन ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेतील गैरव्यवहाराबाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी माहिती दिली. ‘राज्यात काही मल्टिस्टेट पतसंस्था ठेवीदारांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अशा पतसंस्था, बँका, चिटफंड कंपन्या यांना नियमांच्या चौकटीत आणून ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आ...

खळबळजनक.......

इमेज
  बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केज :- सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील ढाकेफळ येथील पूजा अनभुले यांचा बारा वर्षाचा मुलगा चि. अदित्य अनभुले हा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय अंबाजोगाई येथे इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. तो अंबाजोगाई येथे सारथी मुलांचे हॉस्टेलमध्ये राहतो. होळीच्या सणाला तो ढाकेफळ येथे घरी आला होता. त्या नंतर दि. १७ मार्च रोजी सकाळी ८:०० वा. च्या सुमारास तो शाळेत जाण्यासाठी गेला. हॉस्टेलला पोहचल्यावर त्याने फोन केला नाही, म्हणुन त्याच्या आईने दुपारी १२:०० वा. च्या सुमारास हॉस्टेलमध्ये रोमन मॅडम यांना फोन केला असता; त्यांनी आदित्य हॉस्टेलला आला नाही, असे सांगीतले. म्हणून त्या नंतर त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. म्हणून त्याची आई पुजा दत्तात्रय अनभुले यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. ७६/२०२५ भा. न्या. सं. १३७ (२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तप...

ग्रामदूत जलसाक्षरता प्रशिक्षण वर्ग....

इमेज
  गावातील पाणलोट विकासामध्ये ग्रामदूतांची भूमिका महत्त्वाची- किरणकुमार गित्ते   अंबाजोगाई (प्रतिनिधी)        मानवलोक अंबाजोगाई व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी परळी वैजनाथ, ग्राम सुराज्य फाऊंडेशन आणि जल साक्षरता केंद्र मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामदूत जलसाक्षरता प्रशिक्षण वर्ग चे उद्घाटक  किरण गित्ते (सचिव: नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम, आरोग्य ,उद्योग ,पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार),विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते  यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गित्त यांनी महाराष्ट्रातील पाणलोट चळवळ मधील सी एस आर चे योगदान आणि ग्रामीण पातळीवरील विकासामधील स्वयंसेवी संस्थांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी ग्राम दूध हा गावातील पाणलोट चा कणा आहे ग्रामदूतानी गावांमध्ये जाऊन आपल्या आपल्या गावातील पाणलोट क्षेत्र वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लालासाहेब आगळे यांनी गावातील पाणलोट चळवळ आणि गाव विकास कसा केला जातो तसेच प...
इमेज
  जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याने शिवप्रेमी भारावले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते सीमित न राहता प्रत्येक पिढीच्या मनामनांत प्रेरणादायी आदर्श बनले आहेत. त्यांचा शौर्य, धैर्य आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाचा वारसा जतन करण्यासाठी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन  शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी केले.  सोमवार, 17 मार्च रोजी संध्याकाळी 6:35 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा मैदान येथे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, माँसाहेब जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज व विश्वहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगव्या ध्वजारोहण भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्ताप्पा ईटके, रा.काँ. तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!