पोस्ट्स

इमेज
खळबळजनक घटना: कोयत्याने वार करून केला खून अन् आरोपी स्वतःच कोयत्यासह पोलीस ठाण्यात   माजलगाव, प्रतिनिधी....      शहरात अतिशय खळबळ उडवून देणारी घटना घडली असून एका युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने या युवकाचा कोयत्याने वार करून खून केला आणि आरोपी स्वतःच रक्ताने माखलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.        याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माजलगाव शहरातील एका युवकाचा आरोपीने कोयत्याने वार करून खून केला. या खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी आरोपी स्वतः खूनात वापरलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान कोणत्या गंभीर कारणासाठी अशा पद्धतीने खून करण्यात आला हे मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मयताचे बाबासाहेब आगे असे नाव असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
इमेज
  भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी दाखवले परळीत काळे झेंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     भाजपा नेते किरीट सोमय्या हे परळी शहरात आले होते. तब्बल तीन तास त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बोगसगिरी करून जन्म दाखला देणाऱ्या संबंधित सर्वावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. परळीतून ते परत जात असताना अचानकपणाने मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. त्यांनी थेट सोमैय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.       भाजपा नेते किरीट सोमैय्या हे जन्म दाखले देताना झालेल्या बोगसगिरीच्या विरुद्ध संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पुराव्यासह पोलीस ठाण्यात आले होते. परळीतील बोगस जन्मदाखले रद्द करून असे दाखले जारी करणाऱ्या तहसीलदार  नायब तहसीलदार व सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करा अशी त्यांनी मागणी केली. पोलीस ठाण्यातून ते परत जात असताना परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक व एक मिनार चौकात घोषणाबाजी करत काही मुस्लिम नागरिकांनी हातात काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.किरीट सोमैय्या यांचा ताफा...
इमेज
  महिला महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी   परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)     येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज दि . १४ एप्रिल  रोजी विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .                या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव  रवींद्र देशमुख उपस्थित होते तर कोषाध्यक्ष प्रा . प्रसाद देशमुख हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले . संस्थेच्या संचालिका सौ छायाताई देशमुख तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांचीही विशेष उपस्थिती होती .                 मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांनी प्रास्ताविक केले . त्यांत त्यांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  विविध क्षेत्रातील कार्याचा सार्थ आढावा घेतला .      प्रमुख व्याख्याते प्रा . प्रसाद दे...
इमेज
  डॉ.बाबासाहेबांनी  आम्हाला अहंकारी  होऊण्या पेक्षा  आत्मविश्वासी होण्याचे तंत्र  दिले - प्रा. माधव रोडे  बाबासाहेबांनी आम्हा धैर्यने संघर्ष करण्याची शिकवण दिली - प्रा. माधव रोडे सोनपेठ : - दिं. १४ एप्रिल २०२५ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंती महोत्सवात , मौजे. गवळी पिंपरी येथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. माधव रोडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दत्तात्रय पांचाळ होते. तर प्रमुख विशेष उपस्थिती सोनपेठचे पोलिस निरिक्षक एस एन बोलमवाड , गटविकास अधिकारी अजिंक्य सुर्यवंशी , प्रभाकर सिरसाट , माजी सरपंच गोपाळ भोसले , शिवाजी भोसले , नासेरभाई पठाण आदि होते. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ध्वजारोहण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले , हजारो वर्षापासुन भेदा भेद करून मानसांना माणुस म्हणुन त्यांना अस्थितीत्वहिन करून हक्क डावलणाऱ्या अशा लोकांसाठी बाबासाहेबांनी संघ...
इमेज
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत --प्राचार्य,डॉ विठ्ठल घुले परळी प्रतिनिधी... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले यांनी  यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.ए आर  चव्हाण व्याख्याते, प्राचार्य विठ्ठल घुले,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.पी एल कराड ,उप प्राचार्य प्रा डी के आंधळे व डॉ. व्हि बी गायकवाड, प्रा हरीश मुंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ बी.के शेप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात प्रकाश टाकला व प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ विठ्ठल घुले यांनी भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे मानवी समाजासाठी उपयुक्त आहेत असे सांगून डॉ बाबासाहेबांचे क...
इमेज
आ.धनंजय मुंडे यांनी केली वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांची पाहणी मंदिर व परिसरातील वास्तूंचे पुरातन महत्त्व जपून दर्जेदार पद्धतीने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना परळी वैद्यनाथ (दि. १४) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेल्या 286 कोटी रुपयांतून सुरू असलेल्या विविध कामांची माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या समवेत पाहणी केली.  मंदिर परिसरात भव्यदर्शन मंडपाचे काम सुरू असून आता चौथ्या मजल्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी ग्लास री-इन-फोर्सड काँक्रीट पद्धतीने काम पूर्ण करावे, दगडी पायऱ्यांचे काम तसेच परिसरातील अन्य वस्तूंच्या कामाच्या संदर्भात पुरातन महत्व जपून तसेच दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केले जावे अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना केल्या आहेत.  वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी २८६.६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून यातून आ...
इमेज
अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषीविषयक चिंतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचार, या युगंधराने नवा इतिहास रचला, विराट मानव समूहाला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त, बहुजनांच्या उत्थानासाठी सर्वव्यापी लढा, हा लढा चक्रीवादळासारखा रोरोवत असलेला दिसतो शिवाय केवळ सहा वर्षात   परदेशातल्या सर्वश्रेष्ठ नामवंत विद्यापीठातून एम.ए., एम.एस सी, आणि बार-ऍट लॉ या पदव्या उच्च श्रेणीत प्राप्त करण्याचा अपूर्व विक्रम,राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र,  तर्कशास्त्र,तत्त्वज्ञान, इतिहास व कायदा या विषयात प्राविण्य मिळवून त्यांनी एक प्रकांड पंडित असा जागतिक लौकिक मिळवला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष सर्वसाधारण जनतेला अपरिचित ती म्हणजे अर्थतज्ञ  म्हणून ची कामगिरी...!      डॉ. बाबासाहेब मुलत: अर्थतज्ञ कारण अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून डॉ.बाबासाहेबांच्या कार्याचा आरंभ होतो 1915 साली त्यांना एम. ए. ची पदवी मिळाली त्यासाठी त्यांनी जो प्रबंध लिहिला तो "Ancient indian commerce, 1915" या विषयावर होता त्यांना पीएच.डी प्रबंधाचा " नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिक अँड ऍनालि...