दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत --प्राचार्य,डॉ विठ्ठल घुले

परळी प्रतिनिधी... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले यांनी  यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.ए आर  चव्हाण व्याख्याते, प्राचार्य विठ्ठल घुले,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.पी एल कराड ,उप प्राचार्य प्रा डी के आंधळे व डॉ. व्हि बी गायकवाड, प्रा हरीश मुंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ बी.के शेप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात प्रकाश टाकला व प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ विठ्ठल घुले यांनी भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे मानवी समाजासाठी उपयुक्त आहेत असे सांगून डॉ बाबासाहेबांचे कार्य अखंड महासागरासारखे आहे. त्यांच्या  प्रत्येक पैलूवर संशोधन करता येईल असे सांगून बाबासाहेबांचे विचार सर्वांनी अंगीकृत करावे असे मत प्रतिपादन केले. गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकरांनी गुरु मानून त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले असेही मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर डॉ आंबेडकरांनी विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडून आणण्याचे कार्य केले असेही सांगितले कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्या, डॉ ए आर  चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो गुर गुर केल्याशिवाय राहणार नाही असे मत सांगून शिका संघटित व्हा व संघर्ष करा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर जे चाटे तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर डी राठोड यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....