पोस्ट्स

सुरक्षारक्षक व पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल परत मिळाला

इमेज
वैद्यनाथ मंदिरात देवदर्शनास आलेल्या भाविकाचा मोबाईल एकाने चोरला पण लगेचच.... सुरक्षारक्षक व पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल परत मिळाला परळी वैजनाथ – प्रतिनिधी...      वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे तो पुन्हा त्यांना परत मिळाला. ही घटना मंदिर परिसरात घडली.         हडपसर, पुणे येथील संतोष साहेबराव गठाळ (वय ४९) हे रविवार १५ जून रोजी वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर गाभाऱ्यातून बाहेर पडताना त्यांच्या मागील खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल कोणीतरी चोरून नेला. याची तक्रार त्यांनी तात्काळ मंदिरातील पोलीस चौकीत दिली.त्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके आणि मंदिराचे सुरक्षा सेवेकरी यांनी तात्काळ  तपास सुरू केला. अन्नछत्र व मंदिराच्या पायऱ्यांजवळ तपास घेत असताना तेलंगणा राज्यातील सुधाकर नामक व्यक्तीकडे हरवलेला मोबाईल सापडला. त्याला चौकीत आणण्यात आले. पुढील चौकशीनंतर हरवलेला मोबाईल संतोष साहेबराव गठाळ ...

नातेवाईकांनी नाकारलं, परळीकरांनी सामाजिक भान जपलं !

इमेज
नातेवाईकांच्या जाणिवा 'मृत'  पण परळीकरांची माणुसकी 'जिवंत':बेवारस व्यक्तीवर  अंत्यसंस्कार ! नातेवाईकांनी नाकारलं, परळीकरांनी सामाजिक भान जपलं परळी वैजनाथ, दि. १५ जून:        नेहरू चौक (तळ) परिसरात मागील २० वर्षांपासून राहणाऱ्या बेवारस बालाजी सोळंके यांचे आज सकाळी निधन झाल्याचं निदर्शनास आलं. रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे यांनी तत्काळ परळी शहर पोलीस ठाणे व नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने मृत सोळंके यांची ओळख पटवली. त्यांच्या परभणी येथील सख्याबहीण संपर्कात आल्यावर, मागील २० वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचं सांगत त्यांनी अंत्यविधी करण्यास स्पष्ट नकार दिला. नात्याची जबाबदारी टाळण्यात आली, मात्र माणुसकीनं पाऊल उचलण्यात आलं. या स्थितीत निर्माण झालेला पेचप्रसंग पाहता, सामाजिक बांधिलकी जपत परळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे, सेवकराम जाधव व शिवाजी देशमुख यांनी पुढाकार घेतला. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने, सायंकाळी ५:३० वाजता परळीतील स्मशानभूमीत हिंद...

रातोरात चौकाचे निर्माण आणि नामफलकाचे अनावरण

इमेज
मोठी बातमी: परळीत रात्रीतून उभा राहिला 'स्वा.वि.दा. सावरकर चौक' परळी वैजनाथ — शहरात 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक' नावाने नव्याने एक चौक साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा चौक अधिकृतपणे नगर परिषद किंवा स्थानिक प्रशासनाने निर्माण केलेला नाही, तर सावरकरप्रेमींनी स्वतः पुढाकार घेऊन रातोरात हा चौक उभारला आहे. अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण परळी शहरात सावरकरप्रेमींची अनेक वर्षांपासून मागणी होती की, शहरातील एखाद्या प्रमुख चौकाला स्वा. वि. दा. सावरकर यांचे नाव द्यावे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे सावरकरप्रेमींमध्ये नाराजी होती. अखेर त्यांनी स्वतः पुढाकार घेत, शहरातील नाथरोडवरील महत्त्वाच्या रस्त्यावर हा चौक तयार केला. रातोरात चौकाचे निर्माण आणि नामफलकाचे अनावरण सावरकरप्रेमींनी शहरातील नाथरोड या एका प्रमुख रस्त्यावर  चौक तयार केला. विशेष म्हणजे, या चौकात रात्रीतूनच नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. भगवे झेंडे आणि पुष्पहाराने सजवलेला हा महत्त्वपूर्ण चौक आता शहरात निर्माण झाला आहे. व्हिडिओ झाला व्हायरल चौक नामकरण आणि नामफलकाच्य...
इमेज
  जालन्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाला ना. पंकजा मुंडे यांची भेट स्मारकाच्या बांधकामासाठी निधी देण्याची केली घोषणा जालना ।दिनांक १४। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शहरात उभारण्यात येत असलेल्या स्मारकाला राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. स्मारकाला निधी देण्याची घोषणा करतानाच याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी स्मारक समितीला दिली.   ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या २४ फुट उंचीच्या  देशातील सर्वात उंच ‘हिंदूधर्मरक्षिका महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची पाहणी केली.हिंदू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे देशातील सर्वात उंच अहिल्यादेवी स्मारक ठरणार आहे.स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला व इंदूर राजवाडा यांच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी २८ फूट उंच व ५६ फूट रुंद दगडी भिंत उभारली जाण...

२२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन"

इमेज
ना. पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल २२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन" म्हणून साजरा होणार मुंबई, । दिनांक १४ । राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने निर्गमित केला आहे.  यापूर्वीच देशी गायीस "राज्यमाता–गोमाता" म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजननक्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अ...

समृद्धी महामार्गावर समृद्ध करणारी जनभावना...!

इमेज
"मुंडे साहेबांमुळेच प्रगती झाली"... समृद्धी महामार्गावर हळवा क्षण; पंकजाताईंना आला भावनिक अनुभव! परळी वैजनाथ| प्रतिनिधी        वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी आयुष्यभर झगडणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती आजही जनमानसात किती खोलवर रुजलेल्या आहेत, याचा छोटासा पण अतिशय भावनिक करणारा अनुभव नुकताच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतला.        समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना, बाजुच्या लेनमधून धावणाऱ्या दुसर्‍या एका गाडीतून अचानक एका महिलेनं हातात कागद घेत तो पंकजाताईंना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या कागदावर लिहिलं होतं – "आम्ही मुंडे साहेबांमुळेच इंजिनिअर झालो... प्रगती झाली. Thank you!" हा प्रसंग पाहून क्षणभर पंकजाताईंनाही भावनिक आठवणींनी ओथंबून टाकलं. “मेसेज मुंडे साहेबांसाठी होता. समृद्धी मार्गाच्या वेगासही तो क्षणभर थांबवून गेला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंकजाताईंनी या हृदयस्पर्शी प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत तो अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे...
इमेज
लग्न लागले नवरदेव पळून गेला,लगेच दुसर्‍याशी लग्न: अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह;गुन्हा दाखल बीड/ प्रतिनिधी...        लग्न लागले नवरदेव पळून गेला म्हणून लगेचच दुसर्‍याशी लग्न लावून देण्यात आले.अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह झाल्याचा प्रकार समोर आला असुन याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.    एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे पहिला नवरदेव लग्न लागल्यानंतर मंडपातून पळून जाताच दुसऱ्या सोबत विवाह लावल्याचा खळबळ जनक प्रकार बीड शहरातील शाहूनगर भागात उघडकीस आला.बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला. या 32 वर्षीय इसमाला दोन पत्नी आहेत. दोघीही सध्या नांदत नसल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. येत असल्याचे पाहताच त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासना...