पोस्ट्स

MB NEWS-"त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

इमेज
  सहकारी शिक्षकाने शिवीगाळ करून मारहाण केली: आपमान सहन न झाल्याने केली शाळेतच आत्महत्या  "त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल  सोनपेठ, प्रतिनिधी....            गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रुमणा पाटीवर शिवीगाळ करून मारहाण केल्याने अपमानित झालेले शिक्षक विठ्ठलराव अनंतराव रत्नपारखी यांनी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सोनपेठ पोलीस ठाण्यात दिनांक 26 डिसेंबर रोजी   दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धारासुर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मयत रत्नपारखी यांना सोमवारी सकाळी आरोपी शिक्षक राठोड यांनी फोन करून धारासुर शाळेवर येण्यास सांगितले. तेव्हा मयत शिक्षक रत्नपारखी यांनी मी पंचायत समितीत नोकरीवर आहे शाळेत येऊ शकत नाही असे आ...

MB NEWS:पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी

इमेज
  पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला. म्हैसूर तालुक्यातील काडाकोलाजवळ आज (दि२७) झालेल्या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा नातू आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. प्रल्हाद मोदी त्यांच्या मर्सिडीज बेंझ कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातूही कारमध्ये होते. या अपघातात प्रल्हाद मोदी, त्यांची सून आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा आणि चालक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने म्हैसूरच्या जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

MB NEWS:प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

इमेज
  औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा - धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीसांचे आश्वासन नागपूर (दि. 28) - परळी वैद्यनाथ सह  राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे नोकरी देणे व अन्य मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केलेल्या एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र येथील काही प्रकल्पग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने...

MB NEWS:परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते

इमेज
  परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते  परळी प्रतिनिधी - शहरातील पेंटर युनियनच्या माध्यमातून लढणार असल्याचे प्रतिपादन पिराजी  किर्ते यांनी केले. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.परळी येथील जिजामाता उद्यान येथे पेंटर युनियनची नुकतीच बैठक संपन्न झाली.      पेंटर युनियनचे अध्यक्ष पिराजी किर्ते म्हणाले की, वाढती महागाई पाहता पेंटर लेबर ची मजुरी वाढवून देण्यात यावी.तसा  ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.    यावेळी पेंटर युनियनची कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून पिराजी कीर्ती, तर उपाध्यक्ष सय्यद ताहीर भाई ,सचिव संतोष रोडे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे यांची निवड करण्यात आली.तर सदस्य राजेश शिंदे,राजेश होके, बालाजी देशमुख,विनोद वाघमारे , विनोद आचार्य ,संघपाल कसबे, निलेश जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली  यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ओमकार मिरकले, बाळू फुन्ने,  सतीश गोरे ,शिवाजी दराडे,देविदास मिरकले ,पद्माकर सरोदे ,शिवाजी केसापुरी, लक्ष्मण कांबळे, प्रशां...

MB NEWS:सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर

इमेज
  सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर         :  सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव विधीमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदरसह कारवार महाराष्ट्रात आणणार, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ठराव मांडण्यात आल्यानंतर विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदर, कारवार, भालकीसह ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सीमा भागात काम करणाऱ्या मराठी संस्था, संघटनांना अर्थ सहाय्य केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवण्यात येईल. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ८६५ गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येईल. त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक विकासासाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच अनेक योजनांसाठी निधी दिली जाईल, अ...

MB NEWS:लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी

इमेज
  29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा   लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी परळी वैजनाथ :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.         जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा  मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.       या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन ...

MB NEWS:एमपीएससी मार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय

इमेज
 'त्या' 111 उमेदवारांनाही एमपीएससी मार्फत नियुक्ती देण्यात येणार - उपमुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर घोषणा एमपीएससी मार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय नागपूर (दि. 27) - राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र ई डब्ल्यू एस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्ती साठी राज्य सरकार मॅट कडे भक्कमपणे बाजू मांडणार असून, या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याची घोषणा आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना केली आहे.    राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली आयोजित केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 1143 उमेदवार पात्र ठरले होते. यांपैकी 1032 उमेदवारांना काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याचे लक्षात आल्याने तसेच नियुक्ती मिळण्यासाठी उमेदवारांनी उपोषणाचे व आंदोलनाचे अस्त्र उपसल्याने दि. 1 डिसेंबर रोजी 1032 उम...