मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले

मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले धारूर, धारूर तालुक्यातील आवरगाव येथील गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्ष 50 यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत आहे या ताना मधून 1 जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेला मराठा आरक्षण देत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून शेतामधील बोरीच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले. मराठा आरक्षणासाठी कित्येक आंदोलने झाले साखळी उपोषण गावोगावी करत आहेत तरी सरकार मनावर घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने धारूर तालुक्यातील आवरगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्षे 50 यांनी त्यांच्या शेतामध्ये बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे मुख्य कारण हे मराठा आरक्षण असून त्यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे व त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीत त्यांनी असे लिहिले आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत असून आरक्षण देत नसल्याने मुख...