पोस्ट्स

भूसंपादन मावेजा: आधी गाडी जप्त,आता थेट कैद चे आदेश

इमेज
  बीड न्यायालयचे आदेश:  जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना कैद करा ! भूसंपादन मावेजा: आधी गाडी जप्त,आता थेट कैद चे आदेश बीड..... भूसंपादनाच्या मावेजासाठी आधीच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन न्यायालयाने जप्त केले असून आता थेट जिल्हाधिकारी बीड आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर श्रीमती एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. तसे वॉरंटचं न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध थेट काढल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची भूसंपादन मावेजाची अनेक प्रकरणे अनेक वर्षा पासून प्रलंबित आहेत . त्यासाठी शेतकरी येरझारा घालत असतात. न्यायालयाचा निवडा आल्यानंतरही भूसंपादन मावेजा दिला जात नसल्याचे देखील अनेक प्रकरणे आहेत. त्यातूनच काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन देखील न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता बीडच्या दिवाणी न्यायालयाने आणखी एक आदेश दिला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्त...
इमेज
  ना. पंकजा मुंडे महाकुंभमेळ्यात सहभागी ; आई प्रज्ञाताईंसह त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान मुंबई ।दिनांक २४।  राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आज (ता. २४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचल्या. यावेळी त्यांनी आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.   प्रयागराज येथील घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात ना. पंकजाताई व यांनी आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले. तसेच त्यांनी यावेळी त्रिवेणी संगम येथे आरती आणि प्रार्थना देखील केली. अद्भुत अन् अद्वितीय अनुभव - ना. पंकजाताई ----- यावेळी माध्यमांशी बोलतांना ना. पंकजाताई म्हणाल्या, महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचा आणि इथल्या वातावरणाचा अद्भुत आणि अद्वितीय असा अनुभव मला आला. २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याची तयारी कशी करता येईल याचा अभ्यास आम्ही इथे केला. एवढी प्रचंड गर्दी असूनही प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय चोख आणि नियोजनबद्ध आहे त्याबद्दल मुख्यमंत्...
इमेज
  शाळेचा निरोप घेतांना विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञ असावे-भागवत मसने अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :-इयता दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतून निरोप घेतांना आपल्या शिक्षक व शाळांप्रति कृतघ्न असावे असा सल्ला सुप्रसिद्ध वात्रटिकार तथा शिक्षक भागवत मसने यांनी दिला. ते होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, होळ ता केज जिल्हा बिड येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक परमपूज्य नारायण दादा काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  या निरोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून  भागवत मसने यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सुधीर शिंदे महसूल सहाय्यक, मीरा राख कर सहाय्यक, कांचन हरगावकर जेल पोलीस हे देखील उपस्थित होते.               या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध वात्रटिका कार भागवत मसने म्हणाले की शालेय जीवना पासूनच शिक्षक,  शाळा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देतात. शाळेतील  प्रत्येक विषयाच...

संतोष जुजगर यांचा प्रासंगिक लेख>>>>एक नव्या पर्वाची सुरुवात!

इमेज
रस्त्यावर किराणा दुकान सुरु करुन स्वतःचे सुपर मार्केट निर्माण करणारे प्रेरक व्यावसायिक कुटुंब ! शून्यातून विश्व निर्माण करणारे परळीतील उद्योजक : वैजनाथअप्पा कोल्हे यांचा संघर्षमय प्रवास आणि भव्य यश ‘शिवम् सुपर मार्केट’ ची भव्य सुरुवात : यशाचा नवा अध्याय         कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं!-हे परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध उद्योजक वैजनाथअप्पा कोल्हे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत त्यांनी परळी शहरातील ‘शिवम् सुपर मार्केट’ या भव्य व्यावसायिक साम्राज्याची उभारणी केली आहे. आज त्यांचे नाव केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे, तर समाजसेवेतील एक आदर्श म्हणूनही घेतले जाते. संघर्षाचे दिवस : लहानपणातील कठीण परिस्थिती         वैजनाथअप्पा कोल्हे यांचे बालपण हे अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वडील लक्ष्मणअप्पा आणि आई शिवबाई यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपल्या मुलांना जगण्याचे संस्कार दिले. वैजनाथअप्पा...

शरद पवार पक्षाकडून सवाल !

इमेज
परळी नगरपालिकेचं नेमकं चाललयं काय? नगर पालिकेकडून महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेत की नाही ? परंपरेप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे - अँड जीवनराव देशमुख परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)            नगरपालिकेच्या स्थापनेपासून महाशिवरात्री निमित्त शहरात कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते पण यंदा नगरपालिकेने आणखीनही कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याची माहिती दिली नाही. महाशिवरात्री दोन दिवसांवर आलेली असताना एकही कार्यक्रम आयोजित केला नाही,तो परंपरेप्रमाणे आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.             बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग शहरात आहे. अनादी काळापासून महाशिवरात्री महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये येथील नगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरपालिकेच्या वतीने या शिवरात्री महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रशासक म्हणून मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आहेत यांनी या कार...

पात्र महिलांना करावं लागणार ई-केवायसी

इमेज
  लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा ८वा हप्ता महिलांना कधी मिळणार? मुंबई : महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना विधानसभेत महायुतीला मोठं यश मिळवून देण्यात गेमचेंजर ठरली. २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या गरजू महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट २०२३ सुरू झाली. मात्र अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर आता सरकारकडून अपात्र महिलांना यातून बाद करण्याचं काम होती घेण्यात आलं. आतापर्यंत या योजनेमधून ७ हप्ते महिलांच्या खात्यात देण्यात आले. आता फेब्रुवारी महिन्याचा ८वा हप्ता कधी देण्यात येणार अशी महिलांमध्ये उत्सुकता आहे. फेब्रुवारीचा ८वा हप्ता महिलांना कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण सात हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता महिला लाभार्थी फेब्रुवारीतील आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अर्जाची पडताळणी होणार असल्याने आठव्या महिन्यात पैसे येतील की नाही, अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.ज्या ...
इमेज
सचिन तेंडुलकरपेक्षा 'फास्टर' निघाला रोहित शर्मा; ९००० धावांसह सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात २० धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या खेळीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. पाक विरुद्धच्या हायहोल्टेज लढतीत रोहितनं  एक धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे पडला. आता सलामीवीराच्या रुपात सर्वात जलद ९००० धावा करण्याचा विक्रम  रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे. रोहित शर्मानं वनडेत आतापर्यंत २६२ डावात ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या डावाची सुरुवात करताना त्याने १८१ डावात ९ हजार धावांचा पल्ला  गाठला आहे. रोहितशिवाय वनडेत सलामीला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये बाबतीत  सचिन-गांगुली हे दोनच फलंदाज हिटमॅनच्या पुढे आहेत.या दिग्गजांच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री  ३७ वर्षीय रोहित शर्मा वनडेत सलामीवीराच्या रुपात ९००० धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेट जगतातील सहावा फलंदाज आहे. स...