इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

तहसील कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने

 मणिपूर व बेडग घटनेच्या निषेधार्थ अंनिस व समविचारी संघटनांचे राष्ट्रपतींना निवेदन 



 तहसील कार्यालयासमोर केली तीव्र निदर्शने

परळी प्रतिनिधी.   मनिपुर येथे महिलांची नग्न धिंड काढून बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करावे तसेच सांगली जिल्ह्यातील बेडग येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडणाऱ्या जातीवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी  या मागणीसाठी परळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतींना परळी तहसीलदार यांच्या  मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

      माणुसकीला काळीमा फासणारी घटना 4  मे रोजी मणिपूर येथे घडली. या घटनेत वीस वर्षीय तरुणीसह तीन महिलांची नग्न धिंड काढून  सामूहिक बलात्कार करण्यात आला.  महिलेच्या  वडिलांची व भावाची हिंसक जमावाने हत्या केली. या प्रकरणास राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे. तर सांगली जिल्ह्यातील बेडग येथे जातीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेली कमान उध्वस्त केली. या घटनेतील आरोपींनाही अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या वतीने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन परळीचे येथे तहसीलदार यांनी स्वीकारले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी  मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुध्दा केली. 

   आंदोलनात शहरातील पुरोगामी व समविचारी पक्ष आणि संघटनांचे सर्वश्री रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, प्रा. दासू वाघमारे, प्रा. विलास रोडे, विजयकुमार गंडले, विठ्ठलराव झिलमेवाड, अनिल मस्के, गोपाळ आघाव, रानबा गायकवाड, नवनाथ दाने ,अशोक मुंडे, सुकेशनी नाईकवाडे, संजीव राय, गंगाधर आप्पा रोडे, शंकर काटकर, प्रशांत कामाळे, आर.ए.रोडे आदी उपस्थित होते.

•••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!