पोस्ट्स

मार्च १, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

अप्रमानीत माहिती प्रसारित करणारांवर होणार....

इमेज
महादेव मुंडे खून प्रकरण : अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन बीड : प्रतिनिधी....             परळी शहरातील बँक कॉलनी परिसरातील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सध्या सुरू असून तपासाची प्रक्रिया अत्यंत गोपनीय व पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. या प्रकरणातील विविध तांत्रिक चाचण्यांचे अहवाल गोपनीय ठेवण्यात आले असून नागरिकांनी सोशल मीडियावरील किंवा इतर माध्यमांमधील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपळा (ता. परळी) येथील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री वनविभाग कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला होता. या घटनेनंतर मयताचे बंधू अशोक दत्तात्रय मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९१/२०२३, भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या बीड येथील विशेष तपास पथकाकडून सखोल पद्धतीने केला जात आहे. तपास...

संभाजीनगर विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांना मातृशोक

इमेज
  प्रा. डॉ. विमलादेवी काळे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र शाखेच्या सेवानिवृत्त प्रा.डॉ. हे विमलादेवी सुग्रीव काळे वय (८२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.          प्रा. डॉ. विमलादेवी काळे यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात एम एस्सी करून पीएचडी मिळवली होती. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, आर्य समाज प्रतिनिधी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष ब्रह्ममुनि तथा प्रा.डॉ. सुग्रीव काळे यांच्या त्या पत्नी तर परळीतील अस्थिरोगतज्ञ डॉ. मधुसूदन काळे, उद्योजक विक्रम काळे व छत्रपती संभाजी नगरचे विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांच्या त्या मातोश्री होत.
इमेज
  दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा अतिरिक्त कार्यभार परळी (प्रतिनिधी) : भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथील आयुक्त सौ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून गुरुवार, ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले. राज्याचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.सध्या सौ. मुधोळ-मुंडे या समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे आयुक्त म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडेच आता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महत्त्वाच्या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या महामंडळाच्या कामकाजाला यामुळे अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन जबाबदारीमुळे ऊसतोड कामगारांच्या विविध ...

अजित दादा असते तर... मुंडेंनी काढली आठवण...

इमेज
  राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यास प्राधान्य तर रोजगार निर्मितीत होणार क्रांती महाराष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर विकसित राज्य म्हणून होण्याची दूरदृष्टी दर्शविणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे यांनी केले स्वागत अजित दादा असते तर... मुंडेंनी काढली आठवण मुंबई (प्रतिनिधी) - स्व. अजितदादांच्या विकासाच्या व्हिजनला आजचा अर्थसंकल्प समर्पित करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय आज सभागृहात मांडला असून महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सुशासन आणि सर्वसमावेशक अशा चार स्तंभांच्या माध्यमातून राज्याच्या चौफेर विकासाची चतुसूत्री मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  २५ सप्टेंबर, २०२५ पर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंतचे कर्ज माफ करणे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान ...

सर्व स्तरातून अभिनंदन....

इमेज
अभिमानास्पद: परळीच्या भूमिपुत्राचा यूपीएससीत डंका; हर्षवर्धन तिडके यांनी आयएएसमध्ये मिळवली 355 वी रँक परळी वैजनाथ :  एमबी न्यूज  वृत्तसेवा...          परळी तालुक्यातील पांगरी येथील भूमिपुत्र हर्षवर्धन अशोक तिडके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आयएएसमध्ये 355 वी रँक मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परळी तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.        हर्षवर्धन तिडके हे लातूर येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी अशोक तिडके यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण लातूर येथे पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. पुढे अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी देशातील नामांकित शिक्षणसंस्था आयआयटी बाॅम्बे,पवई येथे प्रवेश घेतला आणि तेथून पदवी शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे कोणतेही ...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे - राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार  राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे  नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे सातारा येथील दरे येथे निसर्गोपचार केंद्र स्थापन केले जाईल मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाईल आयुष्यमान योजने 1 हजार 356 वरून 2 हजार 399 पर्यंत आजारात वाढ केली आहे महिमा संस्थेची स्थापना करणार तरुणांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल 36 नवदिशा केंद्र स्थापना केली जाईल महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे युनिकॉर्नमध्येही महाराष्ट्र अव्वल महाराष्ट्रात 1 लाख 25 हाजर उद्योजक घडविणे व 50 हजार स्टार्ट अप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे 25 लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा दिली जातील आणखी 25 लाख बहिणींनी लखपतीदीदी करण्याचे उद्दिष्ट आहे 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत आहे लाडकी बहीण योजना अशीच सुरू राह...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेचा विस्तार; शेतमजुरांनाही मिळणार आर्थिक संरक्षण मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेची व्याप्ती वाढवून आता शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली. आतापर्यंत या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळत होता. मात्र आता शेतमजूर वर्गालाही अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षेचा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेच्या विस्तारासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना अपघाती प्रसंगी मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक सुरक्षेचे कवच अधिक व्यापक होणा...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  Maharashtra Budget 2026 : CM फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडला जाणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, फडणवीसांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांसह नवीन योजनांची घोषणा केली आहे. विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते या चार नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार आहे. याकरिता २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव, यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या ...

Live: Maharashtra budget.....

इमेज
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी प्रस्तावित केलेली ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ मंजूर; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रस्तावित केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजने’ला राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. ग्रामीण भागात पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच इतर पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकरी यांना पशुधन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे पशुपालकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग ...

LIVE: maharashtra Budget....

इमेज
अर्थसंकल्पात ग्रामीण विकासावर भर; पशुधन उद्योग, मत्स्यसंपदा आणि शेतमजुरांसाठी महत्त्वाचे निर्णय मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. ग्रामीण भागातील रोजगार वाढवणे, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाला बळ देणे तसेच शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. राज्यात ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या योजनेमुळे पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पशुधन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा सुमारे २५ टक्...

अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व हरवले....

इमेज
परळीतील भाजप नेते, पत्रकार किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ.कीर्ती धोंड यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       येथील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शहराध्यक्ष  किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ. कीर्ती किरण धोंड (वय ४२) यांचे आज, गुरुवार दि. ५ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने धोंड परिवारासह स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.       सौ. कीर्ती किरण धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून परळीत काम केले. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. अत्यंत मनमिळावू, कुटुंबवत्सल आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.सौ. कीर्ती धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पती, सासू आणि एक मुलगा असा  परिवार आहे. स्वतः च्या आजारपणातही जपले होते सामाजिक भान         सौ. कीर्ती धोंड या केवळ अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत नव्हत्या, तर त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला होता. २०२३ मध्ये त्यांनी शासकीय कर्कर...
इमेज
  परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा  वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्...

लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण..

इमेज
  जिल्ह्यात पशुधनासाठी लाळखुरकूत उपलब्ध प्रतिबंधात्मक  लसीचा लाभ घ्यावा - अनिल बोर्डे गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पशुधनास दर सहा महिन्यांनी लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध झालेली आहे. जिल्ह्यात  लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी क्रमांक ८ ही जिल्ह्यात दिनांक १३/२/२०२६ते २९/३/2०२६ राबविण्यात प्रारंभ झालेला आहे.    केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ रोग नियंत्रण समूह गट योजनेमधील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत लाळखुरकूत प्रतिबंधात्मक लस मोहीम दिनांक १३/२/२०२६ ते२९/३/२०२६ नुसार मोहीम फेरी क्रमांक ८ सुरू झालेली आहे.      बीड जिल्ह्यासाठी एकूण (५०५३००) एवढ्या  प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झालेल्या आहेत. लसीचा तालुकास्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे असे समजते .तरी पशुधन चालकाने  किंवा शेतकरी ग्राहकाने लस घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क करणे आवश्यक आहे.  त्यासाठी जनावराच्या कानात बिल्ला असल्याची व संबंधित पशुचालकाच्या भ्रमणध्वनी द्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.  ...

अभिष्टचिंतन.....

इमेज
  ईटके गुरूजी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व-विलास ताटे परळी वै....... - ईटके गुरूजी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन ओबीसी परिषदेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांनी केले आहे. दि.3 मार्च 2026 रोजी 80 वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. गुरूजी वैद्यनाथ विद्यालयात शिक्षक असतांना पूर्णतः चांगला विद्याथ घडवण्यामध्ये त्यांचा हातखंडा असायचा फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे हा उद्देश न ठेवता त्याच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवून त्या विद्यार्थ्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यामध्ये त्यांचा रस असायचा. राजकारणात राहूनही कसल्याही प्रकारच्या आमिषाला न बळी पडता कोणत्याही वाईट सवयीला जवळ न येवू देता दुसऱ्यांचे चांगले व्हावे यासाठीच अहोरात्र प्रयत्न करित असत. एखाद्या व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिबद्दल तो व्यक्ति वाईट आहे असे सांगितल्यास ते कधीही त्या व्यक्तिस नाव ठेवण्याचे काम करित नसत आजही व्यायामाला प्रथम प्राधान्य देवून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टिने सर्वांना विनाशुल्क कसल्याही प्रकारच्या आमिषाची अपेक्षा न करता ते मार्गदर्शन करतात. म्हणुनच त्यांना सर्व राजकीय पक्षातील, सर...

पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरती होईल....

इमेज
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती – मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि.४ : पशुसंवर्धन विभागातील नवीन आकृतीबंध ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाल्यामुळे काही संवर्गांतील पदसंख्या वाढली आहे. पदभरतीची प्रक्रिया गतीने सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरतीचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला. विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, वाढीव पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) सोबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार 25 एप्रिल 2025 रोजी एलडीओ (पशुवैद्यकीय विकास अधिकारी) पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तसेच 12 ऑगस्ट रोजी वर्ग-एक दर्जाच्या सहा सहाय्यक आयुक्तपदांची जाहिरातही काढण्यात आली आहे. परीक्षेसाठी पेपर सेटिंग प्रक्रियेसाठी तज्ज्ञ अधिकारी व प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक असून पेपर सेटिंगचे काम पूर्ण होताच परीक्षा घेण्यात येईल, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर, एमपीएससीकडूनही भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले...

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

इमेज
बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन बीड, दि. ४ मार्च २०२६  आखाती देशातील काही भागात निर्माण झालेल्या युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन करत स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. अफवांमुळे काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अतिरिक्त इंधन साठवण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सर्व पेट्रोल पंप कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.नागरि...

पैठण येथे १० मार्च रोजी गौरव सोहळा

इमेज
ह.भ.प. पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज यांना 'वारकरी भूषण' पुरस्कार जाहीर पैठण येथे १० मार्च रोजी गौरव सोहळा; शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज मिशनचा उपक्रम बीड: प्रतिनिधी        शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज मिशन आणि नाथवंशज श्री. योगिराज महाराज पैठणकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येणारा मानाचा 'वारकरी भूषण पुरस्कार' यावर्षी ह.भ.प. आचार्य पूज्यश्री अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा, बीड) यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.      दंडवत स्वामींच्या परंपरेतील वारसा असलेले अमृताश्रम स्वामी महाराज यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नवगणराजुरी येथील एका सात्विक कुटुंबात झाला. ते शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे परमशिष्य परमहंस 'दंडवत स्वामी' यांच्या परंपरेतील वारसदार आहेत. वारकरी संप्रदायातील त्यांचे प्रदीर्घ कार्य आणि आध्यात्मिक योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.      दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा हा ...
इमेज
  राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळीत विचारांचा जागर परिवर्तनासाठी संत, सुधारक आणि समाजक्रांतीकारक या तिन्ही भूमिका गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यातून साकारल्या- ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस झोपडपट्टीतून उभा राहिलेला प्रवास म्हणजेच विचारांची ताकद –विशाल लोंढे संविधानातील मूल्ये रुजविणे हेच संतांचे कार्य” – ज्ञानेश्वर महाराज वाबळे परळी वैजनाथ (प्रतिनिधी):– समाजप्रबोधन, स्वच्छता आणि समतेचा अखंड संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळी येथे भव्य सुवर्ण शतकोत्तर महोत्सवी वर्ष सोहळा दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परळी आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्...

बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आवहान

इमेज
  जिल्ह्यात "छत्रपती शिवाजी महाराज" महसूल अभियानाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा - अनिल बोर्डे बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आवहान गेवराई (प्रतिनिधी) महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी ग्राहक, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागातील प्रलंबित प्रश्नाचे तात्काळ शिबिरातून निराकरण करण्यात येणार आहे.  जिल्ह्यात मंडळ स्तरावर  ७ व १४ मार्च २०२६ नंतर १० व१७ एप्रिल २०२६ नगरपंचायत व नगरपरिषद स्तरावर ८ व१५ मे२०२६ रोजी शिबिरे आयोजीत करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत भोगवटदार वर्ग २/ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतर, जिवंत ७/१२ मोहिमे द्वारे नोंदी दुरुस्ती, प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निपटारा सामाजिक अर्थसहाय्य योजनाचे आदेश वितरण, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप पानंद रस्त्याच्या मान्यता प्रक्रिया तसेच डिजिटल( कोड युक्त ) ७/१२ बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.   याशिवाय लो...

रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या वाणीने रंगणार रामकथा; संत-महंतांच्या उपस्थितीत हरीनामाचा गजर

इमेज
  केज येथील बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रमात ११ ते १९ मार्च दरम्यान १०८ कुंडी भव्य महाविष्णु यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह केज (प्रतिनिधी) :-        केज येथील बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन निमित्त दि. ११ ते १९ मार्च २०२६ दरम्यान १०८ कुंडी भव्य महाविष्णु यज्ञ, संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह या भव्य-दिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ११ मार्च रोजी विष्णू यागाच्या शुभारंभाने या सोहळ्याची मंगल सुरुवात होणार आहे. भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन आयोजक श्री ह. भ. प. भागवत भूषण केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांनी केले आहे.          “जगज्यपालं चालकान्द्रा महायानभीनीलका दुरावारमा सुद्यासहायम् भन्नेहं भजेऽहं ॥” श्री भगवान विष्णु हे सकल जीवांचे पालन-पोषण करणारे दैवत असून अनादि कालापासून ऋषि-मुनि यज्ञाद्वारे त्यांची आराधना करत आले आहेत. धर्मग्रंथानुसार श्री विष्णू यज्ञाने सर्व सिद्धी, इच्छापूर्ती, विवाह-शुभफल, पितृदोष निवृत्ती, दारिद्र्य नाश तसेच महालक्ष्...

परळीत महावितरणच्या नावाने सर्वस्तरातून ' शिमगा '....!

इमेज
महावितरण चा परळीत बेफिकीर कारभार ; अव्वाच्या सव्वा बिलांनी नागरिक हैराण ! नियमित बिल भरणाऱ्यांना वाढीव बील ,सोलर बसविलेल्या ग्राहकांनाही बील, दुरुस्तीसाठी मार्गदर्शनाचा अभाव, विज बिलांच्या अडून 'मोठा झोल' परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       परळी शहरात महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन चुकीची, वाढीव व अवास्तव वीज बिले हा जणू नित्याचा प्रकार बनला आहे. घरगुती मीटरला कमर्शियल दराने बिल आकारणे, सौर ऊर्जेचे युनिट जमा असतानाही मोठी रक्कम वसूल करणे, बिल भरूनही वीजपुरवठा खंडित करणे आणि स्मार्ट मीटरमुळे अचानक वीज तोडली जाणे अशा तक्रारींनी नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. घरगुती मीटरला कमर्शियल बिल; ज्येष्ठ नागरिकांचा उपोषणाचा इशारा      हालगे गल्ली परिसरातील ज्येष्ठ नागरिक सुमंत दत्तात्रय देशमुख यांना निवासी भागात राहत असतानाही कमर्शियल दराने वीज बिल आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणताही व्यावसायिक वापर नसताना वाढीव दर लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार अर्ज करूनही दुरुस्ती न झाल्याने...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....