पोस्ट्स

एप्रिल २६, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...

इमेज
परळीत ‘ गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर; गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत आज परळी वैजनाथ येथे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गो-प्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करावे आणि गोवंश हत्या बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान देशातील ५००० हून अधिक तहसील कार्यालयांत] एकाच वेळी राबविण्यात आले.       परळी शहरात सकाळी या अभियानानिमित्त औद्योगिक वसाहत सभागृहापासून शांततामय मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर गो-भक्तांनी एकत्रितपणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तिला अधिकृतपणे 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे.,,संपूर्ण देशात गोवंश हत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा अमलात आणावा:,बेवारस आणि वृद्ध गोवंशाच्या संगोपनासाठी असलेल्या ग...

मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...

इमेज
परळीत ‘ गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर; गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत आज परळी वैजनाथ येथे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गो-प्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करावे आणि गोवंश हत्या बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान देशातील ५००० हून अधिक तहसील कार्यालयांत] एकाच वेळी राबविण्यात आले.       परळी शहरात सकाळी या अभियानानिमित्त औद्योगिक वसाहत सभागृहापासून शांततामय मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर गो-भक्तांनी एकत्रितपणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तिला अधिकृतपणे 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे.,,संपूर्ण देशात गोवंश हत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा अमलात आणावा:,बेवारस आणि वृद्ध गोवंशाच्या संगोपनासाठी असलेल्या ग...

नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली माहिती...

इमेज
परळी वैजनाथ शहरातील १ ते १७ प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाईप लाईनची कामे होणार १५ व्या वित्त आयोगातून शहरातील आवश्यक त्या ठिकाणच्या सहा किलोमीटर पाईपलाईनच्या कामांना मंजुरी - नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ: प्रतिनिधी...          परळी वैजनाथ शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या बंधनकारक अनुदानातून  एकूण १ कोटी ९६ लाख ९५ हजार ६३९ रुपयांच्या निधीला ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे परळी वैजनाथ शहरातील प्रभाग क्रमांक एक ते सतरा या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाणी पुरवठा पाईप लाईनची  विस्तारीत कामे होणार आहेत. सर्व प्रभागांमध्ये मिळून एकूण सहा किलोमीटरची पाईपलाईन ची कामे यामधून केली जाणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी व...

११ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत

इमेज
  व्यापार विस्ताराला मिळणार मोठा वाव: परळी नगर परिषदेच्या ५४ पैकी २७ दुकानांचा होणार ई-लिलाव ११ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत परळी वैजनाथ: प्रतिनिधी        नगर परिषद परळी वैजनाथच्या मालकीच्या जागेत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाशेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील ५४ दुकाना पैकी पहिल्या टप्प्यातील २७ दुकानांचा ई-लिलाव जाहीर करण्यात आला आहे. इच्छुक संस्था आणि व्यक्तींना ११ मे २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.शहरातील व्यापार विस्ताराला या व्यापारी संकुलामुळे मोठा वाव मिळणार असून इच्छुक व्यावसायिक व्यापाऱ्यांनी अधिकाधिक या लिलावात सहभागी भावे असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.        नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार, तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील एकूण ५४ गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.या पैकी पहिल्या टप्प्यात २७ गाळे भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. यासाठी किमान अनामत रक्कम ५०,००० रुपये निश्चित करण्यात आली असून, निविदा शुल्क ५,००० रुपये आहे.२४ एप्रिल २०२६ (दुप...
इमेज
बाबासाहेबांनी देशातील पाणी समाजाच्या मालकीचे केले - उत्तम कांबळे  परळी प्रतिनिधी.     या देशातील व्यवस्थेने ज्याला पाण्याला स्पर्श करू दिला जात नव्हता अशा अस्पृश्य समाजात जन्मलेले महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे जलमंत्री झाले व भारताच्या पाण्याचे नियोजन केले . एवढेच नाही तर बाबासाहेबांनी देशातील पाणीच समाजाच्या मालकीचे केले असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.ते परळी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श भीम जयंती महोत्सवात व्याख्यानप्रसंगी  बोलत होते.     रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे हे होते.यावेळी पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की, 1942 मध्ये व्हाईसरॉय मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री झाले.मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी या देशातील कामगारांची पिळवणूक थांबवली. बारा ते सोळा घंटे काम करणाऱ्या मजुरांच्या क...
इमेज
थोर महात्म्यांच्या विचारांचा जागर करत अंबाजोगाई ते कळंब लोकसंवाद पदयात्रेचे आयोजन अंबाजोगाई (प्रतिनिधी):-  अंबाजोगाई ते कळंब तालुक्यांतील सुमारे २० गावांमधून लोकशक्तीच्या चैतन्याला साद घालणारी आणि थोर महात्म्यांच्या विचारांचा जागर करीत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे लोकशिक्षण करणारी आश्वासक लोकसंवाद पदयात्रा सोमवार, दिनांक २७ एप्रिल पासून अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथून सुरू झाली असून, कळंब येथे १ मे २०२६ रोजी या लोकसंवाद पदयात्रेचा समारोप होणार असल्याची  माहिती पदयात्रेचे प्रमुख संयोजक डॉ.सोमनाथ रोडे यांनी येथे दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी स्मृतीवर्ष, सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती, कस्तुरबा व महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही पदयात्रा केवळ जनाधारावर चालणार आहे. त्यामुळे जनतेने स्वेच्छेने पदयात्रेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. विविध संस्था व संघटनांच्या समन्वयातून ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली असून साधारणतः दररोज तीन ते चार गावातून सेंद्...
इमेज
  राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या वतीने माहितीपटासाठी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात  चित्रीकरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून एक राज्यातील प्रमुख शक्तिपीठं, ज्योतिर्लिंगांसह प्रमुख तीर्थस्थळं, धार्मिक ठिकाणांची विस्तृत माहिती देणारा ‘भक्ति-पर्यटना’वरील माहितीपट तयार करण्यात येत आहे. जागतिकस्तरावर माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या माहितीपटासाठी प्रत्यक्ष त्या-त्या गाव-शहरांमध्ये जाऊन चित्रीकरण करण्यात येत आहे. रविवारी अंबाजोगाईत आणि परळी-वैजनाथ येथे ‘भक्ति-पर्यटना’साठी चित्रीकरण पार पडले. मराठवाड्यातील देवीची साडे तीन पीठांपैकी असलेली ठिकाणी आणि बारा ज्योतिर्लिंगांमधील तीन मंदिरांसह अन्य काही स्थळांचे माहितीपटासाठी चित्रीकरण करण्यात येत आहे. रविवारी अंबाजोगाईत आणि परळी-वैजनाथ येथे ‘भक्ति-पर्यटना’साठी चित्रीकरण पार पडले.सोमवारी माहूर, नांदेडचा गुरुद्वारा, आैंढा-नागनाथ आदी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून एक राज्यातील प्रमुख शक्त...
इमेज
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले केज:- केज तालुक्यातील एका गावातून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका भिन्न धर्मीय तरूणाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे. दि. २३ एप्रिल रोजी एका मुलीचे आई-वडील हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी नेकनुर येथे गेले होते. रात्री आई-वडील घरी आल्या नंतर त्यांना त्यांची मुलगी घरी नसल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला. मात्र मुलगी आढळून आली नाही. त्या नंतर मुलीच्या भावाच्या मोबाईल नंबरवर त्यांना अंबाजोगाई तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत सदस्याने कळविले की, बेपत्ता असलेल्या मुलीला घेऊन, एक भिन्न धर्मीय तरुण हा अंबाजोगाई तालुक्यातील त्याच्या आजोळी गेलेला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून त्यांच्या गावातील भिन्न धर्मीय इसम हा  त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून गेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून भिन्न धर्मीय इसमा विरुद्ध गु. र. नं. २४३/२०२६ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत.
इमेज
परळी वैजनाथ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सुधारणा कामांना मंजुरी; पाच जलकुंभांची होणार तातडीने दुरुस्ती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची माहिती परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि जलकुंभांच्या दुरुस्तीसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत (बंधनकारक अनुदान) ४५ लाख १९ हजार ८८३ रुपयांच्या विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा जलकुंभ दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी दिली आहे.        राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदे कडून सादर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा सुधारणांच्या प्रस्तावास १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, 'बद्ध अनुदानातून' निधी पाणीपुरवठा आणि जलपुनर्भरण कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार म...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....