पोस्ट्स

एप्रिल २६, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले ! परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-       वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन  होऊन जात आहेत.        पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर...
इमेज
खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्वरक्षा संकल्प शिबीराचा समारोप उत्साहात परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)       खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वरक्षा संकल्प शिबीराचा गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. १९ ते ३० एप्रिल दरम्यान या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.     या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे तसेच स्वरक्षणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तायक्वांदो, कुंफू, कराटे, लाठीकाठी, तलवार यांसारख्या क्रीडा प्रकारांतील कौशल्यपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैजनाथ ईटके यांनी सांगितले की “आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे मैदानावरील खेळ कमी होत चालले आहेत. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण होते,” तर डॉ शिका जैन यांनी सांगितले की “स्वरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि...

निवेदनाची दखल घेवुत-निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी

इमेज
  शासनाने जाहिर केल्याप्रमाणे सिमेंट रोड करा-नागरिकांची जिल्हाधिकाऱ्याकडे प्रत्यक्षात मागणी निवेदनाची दखल घेवुत-निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी परळी वै., प्रतिनिधी - मुख्यमंत्र्यांनी 1000 लोकसंख्या असलेल्या गावाला सिमेंट रोड करणार असे जाहिर केले आहे. त्याप्रमाणे परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी सिमेंट रोड करावा अशी मागणी सेलु सरपंच शिवकन्या फड व लोणी सरपंच जे.बी. सोनवणे व ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षामध्ये भेटून निवेदन दिले.  सेलु परिसरातील व लोणी परिसरातील सर्व नागरिकाशिवाय दत्तवाडी येथे लाखो भक्तगण आपला जीव मूठीत घेवून प्रवास करतात. पावसाळ्यात तर अक्षरशः कोणत्या नागरिकाचा अपघात होवून जीव जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सेलु सरपंच शिवकन्या फड व लोणी सरपंच जे.बी. सोनवणे व ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे व सर्व नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री सुनेत्रा जी पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, परळी विधानसभेचे ...
इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.
इमेज
  ​प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'प्रबोधनरत्न' पुरस्कार; परळीत  सत्कार परळी ,प्रतिनिधी: प्रख्यात सिने नाट्य लेखक आणि दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'एकता रंगकर्मी प्रबोधनरत्न पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचा परळी येथे भव्य सत्कार करण्यात आला. परळी सिने नाट्य कलावंत संघटना व मित्रपरिवारातर्फे डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ.सिद्धार्थ तायडे यांचे स्वागत व अभिनंदन केलेज्येष्ठ साहित्यिक व संपादकभीमयुगकार रानबा गायकवाड,प्रसिद्ध कवी व निवेदक बा. सो. कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, नवनाथ दाने, दत्ता मामा लांडे, मुख्याध्यापक शेख सर, शास्त्री कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे-

इमेज
  उष्मघातापासून बचाव करण्याच्या सूचना बीड, दि. 30 (जि. मा. का.) उष्माघाताची कारणे-उन्हामध्ये शारिरीक श्रमामुळे,उन्हात मजुरीचे कामे फार वेळ करणे,कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे,जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.घट्ट कपड्यांचा वापर करणे.उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे ही उष्माघात होण्याची कारणे आहेत.लग्न उत्सव, यात्रा याठिकाणी अति उन्हात थांबणे व फिरणे, उष्माघाताचे लक्षणे- चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे,शरीराचे तापमान खूप वाढणे,पोटात कळा येणे,शरीरातील पाणी कमी होणे,त्वचा कोरडी होणे,डोके दुखणे.बेशुद्ध होणे अथवा अस्वस्थ होणे, जोखीम गट- 5 पेक्षा कमी वयाची बालके 65 पेक्षा जास्त वय असणारे जेष्ठ नागरिक,अधिक कष्टाची सवय नसणारी व्यक्ती. धूम्रपान, मद्यपान करणारी व्यक्ती,मुत्रपिंड,-हदयरोग, यकृत,त्वचा विकार,लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण. अति आद्रता, वातानुकुलनाचा अभाव, शेतकाम, कारखान्यातील काम करणारे कामगार, उष्णतेशी संबधित व्यवसाय करणारे व्यक्ती.  उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे- पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली ...

सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी मानले आभार

इमेज
  परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा ऐतिहासिक निर्णय; सर्वानुमते ठराव मंजूर ; नगराध्यक्षा व नगरपरिषदेचे आभार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगरपरिषदेच्या दि. 30 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत “प्रत्येक सोमवारी मांस विक्री बंदी” या महत्त्वपूर्ण विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दि. 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आजच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून अंतिम मंजुरी देण्यात आली. परळी नगरपरिषदेच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा *सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी* यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या “विकास पर्व 2.0” या संकल्पनेतून जनभावना, धार्मिक संवेदनशीलता आणि स्थानिक गरजा यांचा समतोल साधणारे प्रशासन दिसून आले. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच परळीच्या पवित्रतेचा सन्मान राखण्याचा त्यांचा दृष्टीकोन या निर्णयातून अधोरेखित झाला आहे. या निर्णयासाठी  प...
इमेज
  परळीत ६७ व्या महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा; आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त परळी शहरात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता परळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. धनंजय पंडितराव मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परळीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनी या समारंभाचे आयोजन केले असून, त्यांनी परळी शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांना या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेला आणि हुतात्म्यांच्य...
इमेज
  संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले-अभयकुमार ठक्कर परळी वैजनाथ / प्रतिनिधी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आज संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुटे, डॉ.  दिनेश कुरमे  तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामविकास आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज असून समाजाने त्यांच्या आदर्शांचे पालन करून एक सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण करावा. तसेच त्यांनी सांगितले की, संत तुकडोजी महाराजांचे कार्य केवळ अध...

नागरिक सुखावले.....जनतेच्या समस्यांचा तात्काळ निपटारा

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांचा जालन्यात हाऊसफुल्ल 'जनता दरबार' जनतेच्या समस्यांचा तात्काळ निपटारा ; प्रशासनाला दिल्या जागेवर सूचना जालना दि. ३०-- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या दालनात 'जनता दरबार' घेतला. जनता दरबारात जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केली होती. यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यांच्या कामांचा जागेवरच निपटारा केला.     ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय आढावा बैठका पार पडल्या, बैठकीनंतर त्यांनी पालकमंत्री यांच्या दालनात जनता दरबार घेतला. जनता दरबारात नागरिकांनी एकट गर्दी केली होती. रस्ते, पाणीपुरवठा, वीज वितरण आणि वैयक्तिक लाभाच्या योजना अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केवळ अर्ज स्वीकारले नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून जागेवर प्रश्नांचा निपटारा केला. जनतेचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या. नागरिक स...

दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा...

इमेज
परळीतील सर्व आस्थापना व व्यावसायिकांनी 'फायर ऑडिट' व अग्निसुरक्षेचे नियम पूर्ण करून घेणे बंधनकारक - मुख्याधिकारी दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         वाढत्या उन्हाळ्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, परळी नगर परिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या जीवित व वित्तीय सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व व्यावसायिक संकुले, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना तात्काळ 'फायर ऑडिट' (अग्निसुरक्षा परीक्षण) करून घेणे आता बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.          सध्या तापमानाचा पारा वाढल्याने शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठे मॉल, हॉटेल्स, औद्योगिक युनिट्स आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांना फायर ऑडिटच्या कक्षेत...

तब्बल दीड तास चालली सभा; प्रदीर्घ चर्चा, अनेक सदस्यांच्या आयत्या वेळेच्या विषयांना नगराध्यक्षांनी दिली संधी...

इमेज
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा :परळीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानुमते अनेक महत्त्वाचे निर्णय ! नागापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, पाणी पुरवठा, मुलभूत सुविधा, अग्निशमन आदी विषयांसंबधित निर्णयांवर सभागृहात शिक्कामोर्तब परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —               नगर परिषद परळी वैजनाथची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या व विकासाभिमुख चर्चेच्या वातावरणात पार पडली. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी सर्वानुमते  घेण्यात आले. सभेत सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विधायक सूचना मांडल्या. नागापूर येथील न.प.च्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, पाणी पुरवठा,मुलभूत सुविधा, अग्निशमन, सोमवारी मांस विक्री बंदी, सरस्वती नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सात सदस्यीय अभ्यास समिती,आवश्यक रस्त्यांसाठी भूसंपादन प्रस्ताव करणे,आवश्यक साधनसामुग्री व मनुष्यबळ आदी सर्वंकष विषयांवर सभागृहात साधकबाधक चर्चा, संवाद व सर्वसमावेशी सुचनांनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती नग...

आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...
इमेज
 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण बीड, दि. 29 (जि. मा. का.) 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे.               मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 01 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता होणार आहे.  या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज एक बैठकीत आढावा घेतला.  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनचे शैलेश सूर्यवंशी आदींची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.             कार्यक्रम स्थळावरील व्यवस्था त्याचप्रमाणे इतर आयोजन याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्य ध्वजारोहण सकाळी 8.00 वाजता असल्...
इमेज
नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा ‘रामभरोसे’ : महादेव गंगणे पाटील परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रेसिन या कापड दुकानाला दि. २८ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. थर्मलची अग्निशमन गाडी लवकर आली पण नगरपरिषदेची गाडी वेळेवर पोहचू शकली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहर आणि परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा मात्र पूर्णपणे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात एखादी मोठी आग लागल्यास ती विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध असली, तरी ती केवळ नावापुरतीच उरली आहे. अनेकदा अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर सुरू होत नाहीत किंवा पाणी असूनही तांत्रिक बिघाडामुळे फवारे चालत नाहीत. वाहने जुनी झाली असून त्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. प्रशिक्षित अग्निशमन जवानांऐवजी कंत्राटी कामगारांवर ही यंत्रणा सुरू  आहे.प्रशासनाने तात्काळ नवीन आधुनिक अग्निशमन वाहने खरेदी करावीत, कायमस्वरूपी प्रशिक्षित जवान...

रेझिंन’ मॉल जळून खाक; ५०० मीटरवरूनही गाडी ४० मिनिटे उशिरा

इमेज
  परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बोजवारा! नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक; चौकशी व कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात बुधवारी (दि. २९) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ‘रेझिंन’ या कपड्यांच्या मॉलचा अक्षरशः राखरांगोळी झाला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राची गाडी तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिराने पोहोचली. या गंभीर हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील गजबजलेल्या ‘रेजिन लेडीज वेअर’ या दालनात अचानक आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले, मात्र प्रतिसादात झालेल्या विलंबामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत मॉलमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला होता. या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस ...
इमेज
  मुकुंद पुजा साहित्य भांडार येथे नव्याने सुरू झालेल्या भारतीय डाक सेवा केंद्र टपाल बुकींगला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद   परळी वैद्यनाथ दि.(प्रतिनिधी) भारतीय डाक विभागाने नव्याने सुरू केलेल्या भारतीय डाक  सेवा केंद्र. परळी येथील प्रसिद्ध असलेले मुकुंद पूजा विधी साहित्य भांडार येथे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या ग्राहक डाक सेवा केंद्राच्या पहिल्या दिवशी परळी येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 108 टपाल बुकिंग करण्यात आली.        भारतीय डाक विभागाने पहिल्यांदाच अशा ग्राहक सेवा केंद्राला मान्यता दिली असून, मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथील मुकुंद पूजा साहित्य भांडार येथे संचालक मुकुंद गोपाळ आंधळे यांना या केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.सोमवार दि.२७ एप्रिल रोजी मोहिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या टपाल बुकिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यास परळी येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या ग्राहक सेवा केंद्रावर स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल बुकिंग करून केली  जाते.मुकुंद पुजा  विधी साहित्य भांडार,न्युअरुणोद्य मार्केट,घरणीकर रोड,पर...

सर्व नवनिर्वाचित सरपंच जगमित्र कार्यालयात दाखल

इमेज
  परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. धनंजय मुंडेंचे एकहाती वर्चस्व! सिरसाळा पुन्हा ताब्यात, तर जळगव्हाण आणि मरळवाडी सहज राखली परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत तीनही ग्रामपंचायती वरती धनंजय मुंडे यांचे एकेरी वर्चस्व सिद्ध केले आहे. या पोटनिवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा या मोठ्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेख नसीब यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या समवेत आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात जाऊन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शेख नसीब शेख रहीम, माजी सरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख नय्युम, शेख रफिक, अक्रम पठाण, सलमान पठाण, माजी सरपंच इम्रान पठाण, उपसरपंच सुलतान पठाण, मोहम्मद इनामदार, गुड्डू पठाण, मुस्लिम संघाचे जिल्हाध्यक्ष शिराज देशमुख,...

बीड जिल्हातील केज येथील केंद्राचा समावेश

इमेज
  महा डायलिसीस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण किडनी विकारग्रस्तांना दिलासा मुंबई, दि २९ : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या "महाडायलिसीस" योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  ‘महाडायलिसीस’ योजना सध्या विविध शासकीय रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ...

महत्वपूर्ण निर्णय....

इमेज
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर. राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती. राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी सहा एआय-उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. याशिवाय पाच एआय इनोव्हेशन सिटीज ची स्थापना होणार. महाराष्ट्राचे एआय पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारे दमदार धोरण. (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग) सामजिक समता व समरसता वर्षा निमित्त साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार. (सामाजिक न्याय विभाग) हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना. राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरिता महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम. पायाभूत सुविधा उपक्रमांचे नियो...
इमेज
  तहसीलदार राकेश गिड्डे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी बीड : केज येथील दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असताना या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईलातूर मार्गावर रेणापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात तहसीलदार गिड्डे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात म्हणून नोंदविण्यात आले असले तरी या घटनेमागे काही संशयास्पद बाबी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे आली होती. नॅशनल ह्युमन राइट्स अँड क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन व वुमन अँड चाइल्ड सेक्युरिटी वेल्फेअर फाउंडेशनच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रिया रामेश्वर झांबरे यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सीआयडी चौकशीचे आद...

उपस्थित राहण्याचे आवाहन...

इमेज
  डी डब्ल्यू पी एस वंडरलैंड शाळेचा ना. पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे  किरण गित्ते ,उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते २ मे रोजी उद्घाटन परळी( प्रतिनिधी )विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली  वर्ल्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड शाळेचा मा. नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे मंत्री पशुसंवर्धन ,पर्यावरण आणि हवामान बदल ,महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री किरण गित्ते IAS सचिव  : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य उद्योग, वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा  सौ.उषाताई किरण गित्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे वार शनिवार 2 मे 2026 रोजी सायंकाळी 06:00 स्थळ डी डब्ल्यू पी एस वंडरलँड नाथ रोड परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे होणार आहे.                विवेकानंद  युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड परळी वैजनाथ या नवीन शाळेचा प्लेग्रुप, नर्सरी, जुनियर केजी ,सिनियर केजी या नवीन शाळेचा उद्घाटन समारंभ महारा...

दोन निवडणुका…पण परिस्थिती जैसे थे...

इमेज
ग्रामपंचायत पोटनिवडणूक: परळीतील अशी एक ग्रामपंचायत जिथे  दोन जागा… दोनदा निवडणूक… तरीही एकही अर्ज नाही! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      परळी वैजनाथ तालुक्यातील नागदरा-आनंदवाडी ग्रामपंचायतीची एक विलक्षण आणि विचार करायला लावणारी परिस्थिती समोर आली आहे.ग्रामपंचायतीतील दोन सदस्य पदांच्या जागांसाठी दोनदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही एकही अर्ज न आल्याने या जागा पुन्हा रिक्तच राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, ही घटना एकदाच घडलेली नसून 2023 मधील सार्वत्रिक निवडणुकीतही याच दोन जागांसाठी एकही उमेदवार पुढे आला नव्हता. त्यानंतर अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहिली.      या मागील कारण शोधले असता एक ठोस आणि संघटित भूमिका समोर आली आहे. नागदरा व आनंदवाडी या दोन गावांची मिळून ही  ग्रुप ग्रामपंचायत असून, एकूण 9 सदस्य पदांपैकी 5 जागा नागदरा तर 3 जागा आनंदवाडीच्या मतदारांवर आधारित आहेत. रिक्त राहिलेल्या दोन जागा या आनंदवाडीच्या वाट्याला येणाऱ्या असल्याने, त्या गावातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंदवा...

घातपाताचा दाट संशय:

इमेज
  सोनपेठ तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा परळीजवळ विहिरीत आढळला मृतदेह ! संशयास्पद मृत्यू; कंबरेला दगड बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला परळी वैजनाथ, प्रतिनिधी:         सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी परळी तालुक्यातील इंजेगाव - सोनपेठ रस्त्यावर कॅनॉलच्या पलीकडील निर्जन ठिकाणच्या एका विहिरीत आढळून आला. मृताच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        महारुद्र व्यंकटराव शिंदे (वय २३) असे मृताचे नाव असून तो २३ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. महारुद्रचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. दरम्यान, आज सकाळी इंजेगाव -सोनपेठ रस्त्यावर  कॅनॉल पलीकडे असलेल्या एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घातपाताचा दाट संशय:        परळी...

वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल.....

इमेज
  या लोकप्रतिनिधीने लाज आणली: अर्वाच्य अशोभनीय भाषा, धटिंगगिरी आणि अज्ञानी मुजोरपणा! परळीतील सामाजिक कार्यकर्त्याचे आमदार संजय गायकवाड यांना 'खुले पत्र'; वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना परळी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी एका जाहीर पत्राद्वारे चांगलेच धारेवर धरले आहे. "लोकप्रतिनिधीची भाषा, वर्तन आणि त्यांचा अभ्यास हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा असावा," अशा शब्दांत खडे बोल सुनावत इंगळे यांनी गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पत्र सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अनंत इंगळे यांनी आपल्या पत्रात प्रामुख्याने आमदार गायकवाड यांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजात एक आदर्श निर्माण करणे अपेक्षित असते. मात्र, संजय गायकवाड यांची भाषा आणि त्यांची शिवीगाळ करण्याची पद्धत ही लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात बसणाऱ्या व्यक्तीला शोभण...

कामगार दिनी....... मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीत १ मे रोजी 'सीटू'चा भव्य कामगार मेळावा; कॉम्रेड किरण मोघे करणार मार्गदर्शन परळी (प्रतिनिधी):        जागतिक कामगार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही परळी शहरात 'सीटू' (CITU) संलग्न कामगार संघटनांच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी  परळी वैजनाथ येथील जाजीवाडी विठ्ठल मंदिर येथे दुपारी १ वाजता हा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती 'सीटू'चे अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी. यांनी दिली आहे.       जागतिक कामगार चळवळीचा इतिहास आणि आपल्या देशातील कामगार चळवळीची सद्यस्थिती याबद्दल कामगारांमध्ये जनजागृती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जाते.यावर्षीच्या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य 'सीटू'च्या सचिव तथा घरकामगार संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉम्रेड किरण मोघे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना त्यांच्या हक्कांची आणि भविष्यातील लढ्याची दिशा समजण्यास मदत होईल.   ...
इमेज
परळी उपजिल्हा रुग्णालयात नेफ्रॉलॉजिस्ट आणि ICU सुविधा उपलब्ध करा; महादेव गंगणे पाटील यांची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष वेधत, येथे तातडीने तज्ज्ञ डॉक्टर (नेफ्रॉलॉजिस्ट) आणि आयसीयू (ICU) सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महादेव सोपानराव गंगणे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड. जीवनराव देशमुख यांच्यासह त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ यांना लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे, मात्र तिथे या विषयातील तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीत. तसेच रुग्णालयात अतिदक्षता विभागाची (ICU) सोय नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती अनेकदा नाजूक असते. अशा वेळी अचानक प्रकृती बिघडल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांची आणि आयसीयू सुविधेची गरज भासते. सध्या या सुविधा रुग्णालयात उपलब्ध...

गुणवत्तेनुसार सेवा देणाऱ्या जिल्ह्यांचा अधिकाऱ्यांसह गौरव

इमेज
  नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज-मुख्य सचिव राजेश अग्रवाल मुंबई,दि.28: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि राज्यसेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, पासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईल, अशी प्रणाली विकसित केली जात आहे. एआय आधारित यंत्रणेक...

विशेष लेख क्रमांक 2-

इमेज
  विशेष लेख क्रमांक 2- भारताची जनगणना 2027 : डिजिटल युगातील पहिली जनगणना भारताची 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना 2027 मध्ये होणार आहे. 2011 नंतर 16 वर्षांनी होणारी ही जनगणना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरणार आहे. कोविड-19 मुळे 2021 ची जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. जनगणनेची ठळक वैशिष्ट्ये: 1. पहिली डिजिटल जनगणना ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल. गणक कर्मचारी मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित करतील. नागरिकांसाठी _स्वतः माहिती भरण्याची सुविधा_ प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे.  http://census.gov.in पोर्टलवर नागरिक स्वतःच्या घराची माहिती भरू शकतात. 2. दोन टप्प्यांत जनगणना - पहिला टप्पा : घरांची यादी आणि गृह जनगणना   एप्रिल ते सप्टेंबर 2026. यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता यांची माहिती घेतली जाईल. - दुसरा टप्पा : लोकसंख्या गणना   फेब्रुवारी 2027. यात वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, जन्मदर यांसारखी वैयक्तिक माहिती नोंदवली जाईल. 3. जात जनगणनेचा समावेश 1931 नंतर प्रथमच जनगणनेत जातीची गणना केली जाणार आहे. आतापर्यंत फक्त अनुसूचित जाती आणि जमात...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या