पोस्ट्स

मार्च १५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती..

इमेज
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती बीड दि. २० --- जिल्हयात काल आणि परवा गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली. बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यालाही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचे तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली पिके भिजल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश देऊन शासनाच्या संबंधित विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ...

नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

इमेज
परळीत २२ एप्रिल रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक  उपनयन संस्कार सोहळा! नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-     ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४६ वा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा येत्या २२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.    गेल्या ४५ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे सकाळी ८.५२ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी २१०० रु...

ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ...

इमेज
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ६७७ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता होणार प्रदान रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण  ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ परळी वैजनाथ | प्रतिनिधी...        प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळी शहरातील तब्बल 677 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्वांसाठी निवारा हे उद्दिष्ट घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचे छत असावे या दृष्टिकोनातून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून 677 लाभार्थ्यांना ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या दिवशी दि. 19 रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे. ...

विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा

इमेज
19 कोटी रुपयांचे  टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू  विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा    परळी (प्रतिनिधी)...     परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना  डी.पी.डी.सी.2025-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे यावे व संबंधित एजन्सी ला ब्लॅकलिस्ट करावे या मागणीसाठी  नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले.या उपोषणाला विविध पक्ष व संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला.         श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत .शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आ...
इमेज
  स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक निर्णय मुंबई, दि. 16: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्वयंसेवी सेवेचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) सातत्याने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे.  याच अनुषंगाने स्वयंसेवी सेवेकरिता CME (Continuing Medical Education) क्रेडिट गुण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी स्पष्ट व पारदर्शक धोरण राबविण्यात येत आहे.  स्वयंसेवी सेवेसाठी सीएमई (CME) क्रेडिट गुण देण्याबाबत  सखोल विचार करून परिषदेकडून सध्या अंमलात असलेल्या प्रणालीची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त असलेल्या संघटना, संस्था, अध्यापन संस्था तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना ठराविक निकष व मार्गदर्शक तत्वांनुसार CME क्रेडिट गुण प्रदान...

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार

इमेज
  कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. 16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय (LEHS AI Unit) या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृ, नवजात व बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे हा या भागीदारीच...
इमेज
  राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळया रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर नवी दिल्ली, 16 मार्च  : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या  पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे. यंदाच्या ...

ना पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उर्वरित काम पूर्णत्वास घेऊन जाणार...

इमेज
  परळीतील भगवान विश्वकर्मा मंदिर : माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केली पूजा व आरती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ नगरी परळी वैजनाथ येथील  भगवान विश्वकर्मा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे. या निमित्ताने माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी  उपस्थित राहून भगवान विश्वकर्मा यांची पूजा व आरती केली.            यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी उपस्थित भाविक बांधवांना शुभेच्छा देताना सांगितले की, सृष्टीचे दिव्य शिल्पकार व निर्माणकलेचे अधिष्ठाता भगवान विश्वकर्मा यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती नांदो, हीच प्रार्थना आहे.मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात  भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक विधी, पूजा-अर्चा व आरतीच्या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने भारावून गेला...

मतदान 23 एप्रिलला तर 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार

इमेज
  राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान 23 एप्रिलला तर  4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.  राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.  निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.  मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.  दर...
इमेज
  मेट्रो भवनाचे उदघाटन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले. पुणे मेट्रोच्या कामाची गती ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो कामांपैकी एक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी मेट्रो टीमचे कौतुक केले. मेट्रो भवन हे केवळ एक कार्यालय नसून, मेट्रोच्या स्वयंचलित सिग्नलिंग, कमांड अँड कंट्रोल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे हृदय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी अशा प्रकारच्या सुसज्ज इमारतीची नितांत गरज होती, जी आज पूर्ण झाली आहे. पुणेकरांनी मेट्रोचा उदंड प्रतिसाद दिला असून, दैनंदिन प्रवाशांची संख्या 2.5 लाखांच्या पार गेली आहे. विशेषतः गणेशोत्सवात एकाच दिवशी पावणे सहा लाख प्रवाशांनी प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला. हा ओघ पाहता, मुख्यमंत्री यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्ष...

बेरोजगारांना रोजगाराची संधी....

इमेज
  दिनांक 17 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिना  निमित्त  ‍जिल्हयातील पंडित दीनदयाल उपाध्याय  रोजगार मेळावा       बीड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड मार्फत दिनांक 17 मार्च  2026 रोजी  सकाळी 10.30 वा  तुलसी संगणकशास्ञ व माहितीतंत्रज्ञान महाविदयालय डी.पी.रोड बीड  येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  सदर मेळाव्यामध्ये पुढिलप्रमाणे नांमाकित कंपनीच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत.  *एल आय सी बीड* येथे    1)  विमा सखी  एकूण पदे 15 शैक्षणिक पात्रता- 10 वी किंवा 12 वी/पदवी वयोमर्यादा-18 ते 40        जॉब लोकेशन-बीड  गोविंदाज  प्रा.लिमिटेड नाशिक येथे ट्रेनी  या पदाची एकुण पदे-30 शैक्षणिक पात्रता- 12 वी/पदवी   वयोमर्यादा- 18 ते 35  जॉब लोकेशन- छ.संभाजी नगर/बीड/पुणे ब्रिजयोग टोय...

वाढत्या चोऱ्या,- पोलिसांसमोर आव्हान

इमेज
  परळीत जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी; पाच लाखांचा ऐवज लंपास परळी वैजनाथ: शहरातील जुन्या थर्मल कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ४ लाख ९१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. [1, 2] परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तंत्रज्ञ अशोक गुंडू पाटील हे जुन्या थर्मल कॉलनीतील एफ-६ (क्वार्टर क्र. ४२५/४२६) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील आठ दिवसांपूर्वी गावी गेल्यामुळे शेजारील क्वार्टर क्रमांक ४२५ बंद होते. हीच संधी साधून १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, मणी, मिनी गंठण, मंगळसूत्र यांसह चांदीचे लिंग, मूर्ती आणि चैन असा एकूण ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १४ मार्च रोजी सकाळी ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याच रात्री चोरट्यांनी कॉलनीतील इतर काही घरांमध्येही चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलीस निरीक्षक धन...
इमेज
  कु.अवनी मोगरकरचे ऑलिम्पियाड परीक्षेत यश परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गणेशपार भागातील ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अवनी अश्विन मोगरकर हीने ऑलिम्पियाड परिक्षेत सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले आहे.कु.अवनी ही नगरसेविका सौ.जयश्री मोगरकर यांची नात आहे.    इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या ऑलिपियाड स्पर्धात्मक परीक्षा आहेत.या परीक्षा गणित, विज्ञान,इंग्रजी आणि तर्कशक्ती यांसारख्या विषयांमधील विद्यार्थ्यांचे सखोल ज्ञान आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य तपासतात.विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे,गणित,विज्ञान, इंग्रजी,कॉम्प्युटर आणि सामान्य ज्ञान ही ऑलिम्पियाड परीक्षेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास वाढतो, विश्लेषणात्मक कौशल्ये सुधारतात आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी पाया तयार होतो.या ऑलिम्पियाड परिक्षेत ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या कु.अवनी अश्विन मोगरकर हीने सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले आ...

परळी मतदारसंघातील शेत/पाणंद रस्ते योजनेचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

इमेज
  मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांचा जाहीर सत्कार करणार - आ. धनंजय मुंडे परळी मतदारसंघातील शेत/पाणंद रस्ते योजनेचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करा, अतिक्रमणे आणि अपिलांची प्रकरणे सोडवण्यासाठी मिळून प्रयत्न करा - धनंजय मुंडे यांचे आवाहन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना उत्पादित शेतीमालाला ताजी बाजारपेठ मिळवून देण्यासह स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतून परळी मतदारसंघातील प्रत्येक शेत / पाणंद पक्क्या रस्त्याने जोडण्याचे आपले उद्दीष्ट असून,  यासाठी मनरेगासह जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जास्तीत जास्त कामे प्रस्तावित केली जावीत. या निधी बरोबरच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून, ही योजना 100% यशस्वीपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायती तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आपण जाहीर सत्कार करणार असल्याची भावना माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील एका बैठकीत बोलून दाखवली.  परळी वैजनाथ विधानसभा मतदा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या