दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली



बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले. 

 सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत.

बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण 11353 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्टच्या प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी 371 प्रकरणे निकाली निघाली आहेत.

दाखलपुर्व प्रकरणामध्ये एकूण 21115 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 838 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच स्पेशल डाईव्हचे एकूण प्रलंबीत प्रकरणापैकी 390 प्रकरणे निकाली निघाली आहेत. असे एकूण 1599 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 7 कोटी 42 लाख 59 हजार 339 एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत.

बीड मुख्यालयातून कौटुंबिक न्यायालयातील एकूण 5 प्रकरणे निकाली निघाली असून यामध्ये पाच महिला सासरी नांदावयास जाणेची प्रकरणे यशस्वी झाली आहेत. तसेच मोटार अपघात प्रकरणात एका प्रकरणामध्ये ₹4 कोटी 48 लाख 90 ची* प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

सदरील लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.वहाब ए.सय्यद, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच वकील संघाचे सर्व सदस्य, जिल्हा सरकारी वकील व सर्व सरकारी अभियोक्ता तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक एस.पी.झेंड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस.टी.शिंदे व इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांची लोकन्यायालयात प्रमुख उपस्थिती होती.

न्यायालयीन कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....