पोस्ट्स

एप्रिल ५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ

इमेज
  बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू बीड प्रतिनिधी —        मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात  बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .     याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नंतर नाते...

रमाई घरकुल योजनेअंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपये निधी वर्ग...

इमेज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता अदा स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे साडेतीन महिन्यांचे  1 कोटी 16 लाख रुपये  वेतन प्रदान रमाई घरकुल योजनेअंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपये निधी वर्ग परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        नगर परिषद कर्मचाऱ्यांना दर महिना वेतन करण्यासाठी सहाय्यक अनुदान प्राप्त होत असते मात्र मार्च महिन्याचे सहाय्यक अनुदान प्राप्त नसतानाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ना.पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील अधिकारी ,कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे वेतन व महागाई भत्ता अदा करण्यात आला आहे.. त्याचबरोबर स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी साडे तीन महिन्याचे वेतनही या कामगारांना प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 154 लाभार्थ्यांचे निधी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे न. प. कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून नगरपरिषद कर्मचाऱ...

अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'

इमेज
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने  केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.          परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...

प्रासंगिक लेख / महात्मा फुले जयंती /11 एप्रिल 2026

इमेज
सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.  मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार महात...

शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर

इमेज
महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकारातून शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर मुंबई, दि. 10 :  महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच एक पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अंतर्गतच्या उपक्रमांबाबत अवगत केले. त्यानुसार विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे. महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंधने याविरुद्ध लढा देत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि मानवी मुक्तीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला....

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन

इमेज
आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर; दि.९(विमाका) जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियान राबविण्यात येत आहे.  हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने झोकूण देऊन काम करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.  मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज येथे विभागातील, १३जिल्ह्यातील जिल्हा स्तरावरील,पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता आयोजित 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट होते. तसेच अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, छत्रपती संभाजी महानगरपालिकेचे...
इमेज
नागापूर येथे उद्या 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' परळी वैजनाथ (प्रतिनिधी): महसूल उपविभाग परळी वैजनाथ आणि महसूल मंडळ नागापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नागापूर येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' (टप्पा क्र. १) आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री नागनाथ देवस्थान मंदिर सभागृहात संपन्न होईल. या शिबिरामध्ये नागापूर तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या नागापूर, बहादूरवाडी आणि लिंबूटा या तीनही गावांतील नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ एकाच छताखाली मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गटाच्या सदस्य आणि योजना दूतांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी मार्ग...
इमेज
  शिक्षकांचे वेतन १४ एप्रिलपूर्वी अदा करा : मुप्टा संघटनेची मागणी बीड | प्रतिनिधी शिक्षक संघटना (मुप्टा), बीड जिल्ह्याच्या वतीने माहे मार्च २०२६ चे प्रलंबित वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी, म्हणजेच १४ एप्रिलपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शिक्षकांच्या दैनंदिन गरजा व आर्थिक अडचणी लक्षात घेता वेतन वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन लवकर मिळाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही संघटनेने स्पष्ट केले. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा. शशिकांत जावळे, जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण घोलप तसेच प्रा. प्रविण तरकसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.शिक्षकांच्या या न्याय्य मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन वेतन अदा करावे, अशी अपेक्षा मुप्टा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
इमेज
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन केज: केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

इमेज
  विकासाला संवेदनशीलतेची जोड : परळीत उभे राहणार  ज्येष्ठ नागरिक भवन; मान्यवरांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाची कदर करत, परळी शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज भवन उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रस्तावित असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.           सुमारे २५ लाख रुपयांच्या निधीतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून हे भवन उभारले जाणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, आरामदायी आणि सर्व सुविधा असलेले एक हक्काचे सभागृह उपलब्ध होणार आहे. आयुष्यभर कुटुंब आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या वडीलधाऱ्यांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या पाठपुराव्यातून नगरपरि...

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू

इमेज
अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई, दि. ८: राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झाले होते. जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे  केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकस...

नारी शक्ती वंदन अधिनियम

इमेज
  विशेष लेख :नारी शक्ती वंदन : महाराष्ट्र अग्रेसर जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी, या एका कवितेच्या ओळी साऱ्यांनाच अवगत असल्या, तरी आपल्या देशात महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग हा तसा मर्यादितच राहिला आहे. केवळ साहित्य किंवा इतिहासातील चार- दोन दाखले देऊन हा विषय संपत होता. त्यामुळेच भारतात महिलांचे सशक्तीकरण हा केवळ चर्चेचा विषय होता. शहरी भागात शिक्षणाच्या सुविधांमुळे थोडी बरी स्थिती असली, तरी ग्रामीण भागात मात्र विदारक परिस्थिती होती. मात्र २०१४ नंतर देशात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. देश सशक्त व्हायचा असेल, तर स्त्री सशक्त झाली पाहिजे हे स्वप्न पाहून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिले आणि त्यासाठी विविध योजना आणून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवितानाच राज्याच्याही योजना सुरू करून महिला सक्षमीकरणाला बळ दिले. त्यामुळे पाळण्याची दोरी धरणारे हात आता देशाच्या अर्थकारणात आपले भरीव योगदान देऊ लागले आहेत. महिला सशक्तीकरण म्हणजे नेमके काय, तर त्यांनी स्वतःचे निर्णय स्वत...

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन

इमेज
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” आज विभागीय कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर, 8 (विमाका): “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे आज (९ एप्रिल २०२६) रोजी सकाळी १० ते सायं. ५. या वेळेत करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  या कार्यशाळेचे उद्घाटन  होणार आहे.          मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर येथे होणाऱ्या  या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ राहणार आहे. तसेच  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री  मेघना साकोरे- बोर्डीकर , सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे  सचिव  रविंद्रन,सार्वजनिक आरोग्य विभागाचे  आयुक्त  डॉ. कादंबरी बलकवडे,  सार्वजनिक विभागाचे आयुक्त (शहरी आरोग्य) डॉ. सुनील भोकरे,  आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर,   तसेच आरोग्य सेवा स...

आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - राजेभाऊ फड

इमेज
कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडा: परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे आज रास्ता रोको   परळी/प्रतिनिधी कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे. कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याची  मागणी आता जोर धरू लागली आहे. पाण्याअभावी या भागातील जलाशय कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा साठवण तलाव अतिशय डोंगराळ भागात असल्याने येथून टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडणे हा एकमेव पर्याय आहे. या साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडल्यास याचा फायदा परिसरातील गावांना होतो. कन्हेरवाडी, जिरेवाडी, ब्रम्हवाडी, जलालपूर, बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर...

तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

इमेज
तरुणाच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेतला तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केज :- वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे १० ची परीक्षा दिलेल्या  १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दि. ७ एप्रिल रोजी आई-वडीला सोबत घरी जेवण केले. त्या नंतर तिचे आई-वडील जनावरांना चारा पाणी करीत असताना त्यांची मुलगी  ही रात्री १०:०० च्या सुमारास घरात गेली आणि तिने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. मुलगी आवाज देऊनही घर उघडत नसल्याने आईने दरवाजा शेजारी असलेला काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. तेव्हा अनुजाने घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकला तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. या प्रकरणी मुलीचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अक्षय भगवान काळे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १८६/२०२६, भ...

वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच

इमेज
ग्राम महसूल अधिकारी अडकला लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच  केज :- वारसांच्या फेरसाठी ग्राम महसूल अधिकारी महोदयांनी ३९ हजाराची लाच शेतकऱ्याकडे माहिती त्या नंतर तडजोडी अंती ३५ हजार रु देण्याचे कबुल झाल्या नंतर ९ हजार रु. ची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथील ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला.       केज तालुक्यात दहिफळ वडमाउली सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर राऊत यांनी पिराची वाडी तालुका केज येथील शेतकऱ्याचा वारसाचा फेर घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ३९ हजाराची लाच मागितली. तडजोडी अंती त्यांच्या ३५ हजार रन देण्याचे कबुल झाले. मात्र शेतकऱ्याला ग्राम महसूल अधिकाऱ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्या नंतर दि. ८ एप्रिल रोजी दहिफळ वडमाउली येथे दुपारी ५ हजार रु. ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस उपाधिक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलिस निरीक्षक बीडकर, सुरवसे, पुरी हे स...
इमेज
  परळीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  आज (दि. ८ एप्रिल) परळीत यशस्वी सापळा कारवाई करत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणातील आरोपी दशरथ देविदास गोरे (वय ४८) हे ग्रामपंचायत अधिकारी असून जिरेवाडी ग्रामपंचायतीसह पिंपळगाव (गाडे) येथे अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.      तक्रारदार (वय ५४) यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाच्या कुशल बिलावर सही करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे १००० रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने बीड ACB कडे ८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तडजोडी अंती ५०० रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली.यानुसार विद्यानगर, परळी येथील एका खाजगी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपीला रंगेहा...
इमेज
  २४ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल व हत्यारे जप्त धारूर , प्रतिनिधी... धारूर पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत जबरी चोरीसह दोन गुन्ह्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दीड तासांतच पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १३०/२०२६ अंतर्गत फिर्यादी भागवत बबन कांबळे यांच्या तक्रारीनुसार ६ एप्रिल रोजी आंबेवडगाव–धारूर मार्गावरील शिवराज ढाबा परिसरात उभी असलेल्या पिकअप वाहनातून जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे रंगाचे (पेंट) डबे चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ७३०३० रुपयांचा रंगाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तपासादरम्यान पोलिसांनी मनोज ऊर्फ सोन्या चंद्रकांत घोळवे (वय १९, रा. आंबेवडगाव) व सुमित प्रमोद कंगने (वय १९, रा. धूनकवाड, ता. धारूर) या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल मेमोरँडम पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आला.तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ८०० चारचाकी गाडी, एअ...

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील हृदयद्रावक घटना

इमेज
"माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो आहे " असे स्टेटस ठेवत तरुणाने नैराश्येतून आपले जीवन संपवले अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील युवकांना कोणाची नजर लागली की काय असा यक्षप्रश्न भेडसावू लागला आहे. कारण युवकांत आत्महत्या, अत्याचार, गुंडगिरी , तसेच टवाळखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. नुकतीच दै पुढारीमधून  बातमी देखील प्रकाशित करण्यात आली होती. अशीच तालुक्यात एक २४ वर्षीय तरुणाने नैराश्येतून विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या एकटेपणाच्या भावनेतून तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली असून महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव आहे.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. घराच्या छतावर तो एकटाच झोपायला गेला होता. त्याने पाणी पिण्याच्या तांब्यात काहीतरी विषारी द्रव्य मिसळून प्यायले होते. बराच वेळ झाला तरी...

ट्रकच्या धडकेत बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

इमेज
स्कुटीला मागून धडक देत तथागत चौकात दीनदयाळ बँकेच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू अंबाजोगाई (प्रतिनिधी):-  अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर तथागत चौक परिसरात आज भीषण अपघात झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत स्कुटीवर जात असलेले दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवर जात असताना भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून उत्तरीय  कारवाईसाठी मृतदेह स्वा रा ती येथे  पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा  पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड मकरंद पत्की यांच्यासह बँकेचे संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.          मूळचे उजनी गावचे रहिवासी असलेले  स...

काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान

इमेज
  काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- मनोज गित्ते परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात 'संघटन सृजन अभियान' हाती घेतले असून, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या परळी वैजनाथ शहरातील बीड रोडवरील चेंबरी रेस्ट हाऊस येथे 'संघटन सृजन अभियान' संदर्भात बैठक होणार आहे.तरी परळी वैजनाथ तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मापुरी गटातील युवक काँग्रेसच्या युवानेते मनोज गित्ते यांनी केले आहे.         अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये संघटन सुजन अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  आणि राज्याचे काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई अशोकराव पाटील ,अशोकराव पाटील , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटी सरचिटणीस व  नगराध्यक्ष ...

प्रशासनाची कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

इमेज
महापुरुषांच्या विचाराला साजेशी जयंती साजरी करा- उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे परळीमध्ये आंबेडकर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन; प्रशासनाची कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर परळी, (प्रतिनिधी):-भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परळी शहरात व तालुक्यात महापुरुषांच्या विचाराला साजेशी जयंती साजरी व्हावी, शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा व्हावा यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.       या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत कटिबद्ध आहे. मात्र नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. समित्यांनी जबाबदार स्वयंसेवक नेमून त्यांना ओळखपत्र द्यावे. मिरवणुकांमध्ये महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असल्याने शिस्त पाळणे गरजेचे आहे. मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर क...

भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!

इमेज
गोविंद (भैय्या)चांडक यांना आजीशोक; फुलाबाई काकाणी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      येथील सर्वपरिचित व्यावसायिक गोविंद (भैय्या) चांडक यांच्या आजी श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांचे दि.६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.      श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, संयमी व धीरोदात्त स्वभावाच्या होत्या. वयाची शंभरी पार करत त्यांनी जीवनभरात लेक, नातू, नातसूना पणतू अशा पारिवारिक नात्यांना भरभरून माया दिली. चांडक परिवारासाठी एक आधारवड अशी कौटुंबीक भूमिका त्यांनी अगदी लीलया पार पाडत एक आदर्श निर्माण केला. वयोमानापरत्वे त्यांनी शतकी आयुष्यात इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन नातू, तीन नाती,नातसूना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांच्या निधनाने चांडक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

परळीत आनंदोत्सव.

इमेज
परळी वैजनाथ : एल. आय .सी .(एस .ओ). शाखेचे सर्व उदिष्ट पूर्ण; यशाचा जोरदार आनंदोत्सव   परळी : एल आय सी च्या छत्रपती संभाजीनगर विभागातील परळी वैजनाथ (SO) शाखेने  मार्च अखेर विविध विमा योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्व स्तरांवरील निर्धारित उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. या यशाचा आनंदोत्सव सोमवार, दिनांक  ६ एप्रिल 2026 रोजी  दुपारी १२ वाजता ढोल-ताशा सह मिरवणूक काढून  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आंबेजोगाई शाखेचे वरिष्ठ शाखा अधिकारी श्री. हनुमानजी मासाळ साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आंबेजोगाई शाखेचे वरिष्ठ शाखा अधिकारी श्री. हनुमानजी मासाळ, शाखा अधिकारी श्री. प्रमोदजी पाटील,  परळी वैजनाथ शाखेचे शाखा अधिकारी श्री. नरसिंहजी बिरेवाड ,  ओमकेश    दहिफळे व  एल आय सी  (विमा ) प्रतिनिधी उपस्थित होते

अध्यक्षपदी स्वप्नील पतंगे तर सचिव गुलाब पीलवटे यांची निवड

इमेज
  शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी स्वप्नील पतंगे तर सचिव गुलाब पीलवटे यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यासाठी शिवाजी नगर येथे नुकतीच विशेष बैठक पार पडली. या बैठकीत चालू वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसंमतीने जाहीर करण्यात आली.या निवडीमध्ये अध्यक्षपदी स्वप्नील पतंगे यांची, तर सचिवपदी गुलाब पिलवटे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे; सोहेल फिरोज पठाण, रजनीकांत गायकवाड, लखन मोरे, गणेश साळुंके, चंद्रकांत पठाडे.मार्गदर्शक महादेव गंगणे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "यंदाची जयंती केवळ औपचारिकतेसाठी नसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्यासाठी असेल." या निवडीबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि विविध संघटनांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच जयंती उत्सवाचे ...
इमेज
स्वा रा ती च्या वैद्यकीय विद्यार्थ्याने गळफास घेतल्याने अंबाजोगाईत खळबळ अंबाजोगाई (प्रतिनिधी):- येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा रोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मंदार उमेश दाभाडे (वय २८) या विद्यार्थ्याने आज पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला मंदार हा या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मंदार हा अंबाजोगाई  शहराच्या चनई रोडवरील संत रविदास नगर भागातील सातपुते यांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कालच दि ५ रोजी आपल्या घरमालकाला फोन पे द्वारे तीन हजार रुपये घरभाडे पाठवले होते. त्यानंतर  पहाटे  त्यांच्या भावाला आपल्या मोबाईलचा पासवर्ड संदेशाद्वारे पाठवला होता.  त्यानंतर आपण राहात असलेल्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंदारने गळफास घेण्यापूर्वी तोंडाव...

अनंत इंगळे यांचा स्तुत्य उपक्रम

इमेज
  स्मृतिशेष नागोराव इंगळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंनिस पत्रिकेच्या वार्षिक वर्गणीचे वाटप; अनंत इंगळे यांचा स्तुत्य उपक्रम परळी / प्रतिनिधी  परळी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या परळी शाखेला राज्याध्यक्ष माधव बावगे व राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी भेट दिली यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव अनंत इंगळे यांनी आपले वडील स्मृतिशेष नागोराव इंगळे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन केले. वडिलांच्या आठवणी जपत, समाज प्रबोधनाला गती देण्यासाठी त्यांनी 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके'च्या १५ वाचकांची  वार्षिक वर्गणी भरून १५ कार्यकर्त्यांना ही पत्रिका भेट दिली. दरवर्षी कौटुंबिक किंवा धार्मिक विधींवर खर्च करण्यापेक्षा, विवेकी विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने अनंत इंगळे यांनी हा निर्णय घेतला. 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' हे विवेकवादी विचारांचे मुखपत्र असून, त्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींविरुद्ध जनजागृती केली जाते. अनंत इंगळे यांनी १५ क...
इमेज
शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये योग्य समन्वय असल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण होतात - प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे  परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)       शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये योग्य समन्वय असल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण होतात असे प्रतिपादन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात बोलताना केले. तर पालकांनीही विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे असे मत संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केले.       येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी (दि.०७) सकाळी ११ वाजता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालक मेळाव्याच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख, माता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, श्रीमती टकले, श्री ठाकुर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्राचार्या डॉ विद्या देशपांडे म्हणाल्या की, आमच्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या