पोस्ट्स

एप्रिल १२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...
इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...

भविष्यातील १५ हजार रुपयांच्या साहित्यासाठी ही नोंदणी आवश्यक

इमेज
  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा -डॉ. संतोष मुंडे                               भविष्यातील १५ हजार रुपयांच्या साहित्यासाठी ही नोंदणी आवश्यक परळी: (प्रतिनिधी)...     भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत ८ दिवसीय नोंदणी शिबिराचे आयोजन श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे करण्यात आलेले आहे. दिनांक १४ एप्रिल ते २१ एप्रिल असे आठ दिवस सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिरामध्ये दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहिती या शिबिराचे मुख्य आयोजन महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री आ.धनंजय मुंडे तसेच ना.पंकजाताई मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री ना.अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रत्येक...

भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

इमेज
परळीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व आशा भोसले  ज्येष्ठ साहित्यिक मधु जामकर यांनी जागवल्या आशा भोसलेच्या आठवणी परळी वैजनाथ- प्रतिनिधी... परळीत आयोजित केलेल्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण सूर सम्राज्ञी आशा भोसले यांची संगीत रजनी ठरले होते.आशाताईंचा स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याचा बाणा या संमेलनातही उपस्थितांना पाहता आला. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १९९८ साली म्हणजे तब्बल २८ वर्षांपूर्वी ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.या संमेलनातील विविध परिसंवाद, चर्चासत्रे, काव्य संमेलने, या सर्व कार्यक्रमांमध्ये एक सांगीतिक कार्यक्रम हा सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे सादरीकरण आकर्षण ठरले.  या संमेलनाची संकल्पना "साहित्य-सूर" अशी असल्याचे आशाताईंसमोर मांडल्यानंतर तेव्हा त्यांनी परळीस येण्यास तत्काळ होकार दिला आणि त्यांचा सांगीतिक कार्यक्रम न भूतो.असा ठरल्याच्या आठवणी या संमेलनाचे कार्यवाहपद भूषवलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांनी आशाताईंच्या निधनानंतर जागवल्या. मराठी विषयाचे प्राध्यापक राहिलेले मधु जामकर यांनी सांगितले की, १९...

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे,अशी मागणी

इमेज
परळी ते खडका (नैकोटा मार्ग) रस्त्याची झाली चाळण; नागरिक व भाविकांचे  हाल  परळी वैजनाथ: प्रतिनिधी..... परळी ते खडका (मार्गे नैकोटवाडी (दत्तवाडी) या 25 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जागोजागी मोठे मोठाले खड्डे पडले आहेत. परळीला ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ महादेवाच्या दर्शनासाठी दर सोमवारी परभणी जिल्ह्यातून या रस्त्याने जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. दत्तवाडी नैकोटवाडी या ठिकाणी दररोज तसेच दर गुरुवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक भक्तजन मुक्तेश्वर नारायण दत्तानंद संस्थान,दत्तवाडी नैकोटवाडी या परिसरात दर्शनासाठी येतात. गुरुवारी तर या परिसराला यात्रेचे स्वरूप असते.  परळी वैजनाथ ते खडका रोडा मार्गे असलेले रस्ता 'थर्मल रोड' म्हणून ओळखला जातो. हा अत्यंत खिळखिळा झाला आहे. या रस्त्याने परळी ते खडका,परळी ते नैकोटा या व इतर एसटी महामंडळाच्या बसेस देखील चालतात. या रस्त्याचा परळी ते लोणी हा 15 किलोमीटर पर्यंत भाग परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यात येतो तर लोणी ते खडका 10 किलोमीटरचा भाग हा पाथरी मतदारसंघात सोनपेठ तालुक्यात परभणी जिल्ह्यात येतो. परळी ते...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी   सत्य,न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचे प्राण -डॉ माधव रोडे  परळी प्रतिनिधी...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये  प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.माधव रोडे यांनी सत्य न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचे प्राण आहेत हे सांगून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील एक थोर भारतीय समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि शिक्षणक्रांतीचे जनक होते. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, जातिभेद निर्मूलन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला  त्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली हे सांगून कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’  असे रोखठोकपणे असे विचार यास प्रसंगी व्यक्त केले.       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी महात्मा फुलेंनी स्...

ग्राहक पंचायतीचे अनिल बोर्डे यांची पत्राद्वारे पंतप्रधान यांच्याकडे मागणी

इमेज
  बीड जिल्ह्याला दत्तक  घेऊन विकास करावा व जिल्ह्यातील ठेवीदाराची रक्कम तात्काळ परत करावी ग्राहक पंचायतीचे अनिल बोर्डे यांची पत्राद्वारे  पंतप्रधान यांच्याकडे मागणी गेवराई ( प्रतिनिधी) सन 1974 मध्ये मराठवाडा विकास आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले कार्यकर्ते व विविध संस्थेचे पदाधिकारी तथा ग्राहक पंचायत चे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी "मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे" व बीडला रेल्वे आली पाहिजे" हे मुख्य ब्रीद वाक्य होते. परंतु अद्याप पर्यंत परळी व बीड ला नियमितपणे रेल्वे सुरू झालेली  नाही. तसेच बीडचा विकास देखील मोठ्या प्रमाणात झालेला नाही. इतर जिल्ह्याच्या मानाने आपण विकासापासून वंचित आहोत. तरी जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मा. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच मल्टीस्टेट व मल्टिपल निधी इतर गुंतवणूकदाराची रक्कम प्राप्त होण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे विनंती केलेली आहे.  बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाच...
इमेज
  महात्मा फुलेंच्या संकल्पने नुसार आजच्या पिढीला दर्जेदार, चिकित्सक आणि जागतिक पातळीचे शिक्षण मिळावे - व्याख्याते अभिषेक सोळुंके या देशात म.फुलेंनी खऱ्या अर्थाने समता स्थापित केली - उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार परळी | प्रतिनिधी....    महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औष्णिक विद्युत केंद्र, परळी येथे आयोजित कार्यक्रमात "महात्मा फुलेंच्या शाळेप्रमाणेच आजच्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते अभिषेक सोळुंके यांनी केले. दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार हे होते. मंचावर सहायक कल्याण अधिकारी शरद राठोड, सौ. अनिता सुनील इंगळे, सौ. मनीषा हिम्मतराव अवचार, कोमलताई मस्के मॅडम आणि डॉ. ओंकार हिंदूळे,नगरसेविका अर्चना रोडे, जयश्री वडमारे, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे आणि डी. एस. डोंगरे  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार साहेब म्हणाले की, महात्मा जोति...
इमेज
  गणेशपार डीपीच्या देखभालीकडे महावितरण चे दुर्लक्ष; परळीत 'आम आदमी पार्टी'चा आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरातील गणेशपार भागातील विद्युत डीपीच्या देखभालीसाठी वारंवार विनंती करूनही महावितरण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत गणेशपार डीपीचे मेंटेनन्स न झाल्यास व्यापारी व नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशपार भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महावितरण कार्यालयाला लेखी अर्ज देऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. थकीत वीजबिल असल्यास तातडीने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणला ग्राहकांच्या समस्यांचे सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे. "वारंवार वीज गेल्यामुळे होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाची भरपाई महावितरण देणार का?" असा सवाल विजय जोशी यांनी उपस्थित ...
इमेज
  नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना : सावत्र पित्याचा १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार  केज :- सावत्र पित्याने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक आणि नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना केज शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.  केज शहरात वास्तव्यास असलेल्या पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईने दोन मुली झाल्या नंतर  पती सोबत जमत नसल्या वरून नऊ वर्षां पूर्वी वेगळे झाली. त्या नंतर आठ वर्षा पूर्वी आरोपी सोबत दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पती पासून तिला एक मुलगा झाला. पीडित मुलगी ही आई व आईने केलेल्या दुसऱ्या पती सोबत एकत्र राहतात. तिची आई ही ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता माहेरी गेली. तर पीडित मुलगी ही एकटीच घरी होती. दुपारी १२.३० सावत्र पित्याने घरी येऊन पीडित मुलीला आई कुठे गेली? अशी विचारणा केली. तिने गावाकडे गेलेल्या आईला फोन करून कधी येणार आहेस. असे विचारले. मात्र आईने वेळ लागेल असे सांगितले. हीच संधी साधून सावत्र पित्याने साडेतीन वर्षाच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसविले. पीडित मुलीला कॉटवर बस...

लक्षवेधी शोभायात्रा.....

इमेज
लक्षवेधी शोभायात्रा  : म.ज्योतिराव फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी म.ज्योतिराव फुले यांनी  सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली - माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):           क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचा शुभारंभ करून अभिवादन केले.     माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अंजली माळी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केल्यानंतर बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी विषमतेविरुद्ध लढा देऊन बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. आजही त्यांचे सत्यशोधक व...
इमेज
समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळयास परळीत सुरुवात  परळी प्रतिनिधी.     प्रसिद्ध खंजिरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवन महाराज दवंडे यांच्या शिव, फुले ,शाहू, आंबेडकर समाज प्रबोधन कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. परळी शहरातील शिवाजीनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त जयंती सोहळ्यास काल दिनांक 11 एप्रिल पासून सुरुवात झाली.    क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 199 जयंती 11 एप्रिल रोजी तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात येत आहे .या निमित्ताने शिवाजीनगर परळी येथे संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. रात्री 8  वाजता लुंबिनी बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिव्यांग विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अजयकुम...
इमेज
स्वामी श्रध्दानंद गुरूकुल येथे वैद्य व आचार्यजी फक्त आदेश न देता काम करतात - विलास ताटे  परळी वै. प्रतिनिधी -     स्वामी श्रध्दानंद गुरूकुल येथे वैद्य व आचार्यजी फक्त आदेश न देता काम करतात असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांनी केले आहे.  नंदागौळ रोडवरील परळी आर्यसमाज अंतर्गत स्वामी श्रध्दानंद गुरुकुल येथे विद्यार्थ्यांना शिक्षण, भारतीय संस्कृतीचे धडे, व्यायाम, आहारविहार विषयी मार्गदर्शन केल्या जाते. शिवाय या ठिकाणी स्त्री-पुरुष यांच्यावर चांगल्या प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात पंचकर्म केले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेकांचा ओढा दिसुन येतो. विशेष म्हणजे आजही विज्ञानमुनी नाडी परिक्षा करुन अनेकांना योग्य ते मार्गदर्शन करतात. येथील सत्येंद्रजी आचार्यजी विद्यार्थ्यांना केवळ आदेशच न देता स्वतःही काम करतात या गुरुकुलवर पूर्ण नियंत्रण आर्यसमाजचे प्रधान जुगलकिशोर लोहिया यांचे व त्यांचे सर्व सहकारी इत्यादींचे असते. हे येथील वाखण्याजोगी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडवतात त्यामुळे येथुन बाहेर निघणारा विद्यार्थी निव्यर्सनी, सुसंस्कारीत व आरोग्य संपन्न अ...

जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम

इमेज
 ' जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम विचारांच्या सामर्थ्यातूनच राष्ट्रहित आणि विश्वशांती शक्य – नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब -डॉ. सौ. प्रतिमा संखे परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       विचारांचे सामर्थ्य मोठे असते. सकारात्मक आणि राष्ट्रहित जपणाऱ्या विचारांतूनच आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. डॉ. सौ. प्रतिमा संखे यांचे मार्गदर्शन परळीकरांसाठी वैचारिक मेजवानी ठरले असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतानाव सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या शिष्या डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन केले.           परळी वैजनाथ येथील आर्यसमाज मंदिरात जीवनविद्या मिशन, मुंबई शाखा परळी वैजनाथ  यांच्या वतीने आयोजित 'विचारांचे सामर्थ्य मोठे' या विषयावरील प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. थोर समाज सुधारक सद्गुरू वामनराव पै यांच्या शिष्या आणि २०२२ च्या युपी...

Motivational story......जिद्दीने मिळवले यश

इमेज
घरची हलाखीची परिस्थिती, पितृछत्र हरपले तरी जिद्दीने मिळवले यश; दर्शन निले पालघर पोलीस दलात दाखल  घाटनांदूर | प्रतिनिधी : जीवनात कितीही संकटं आली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यावर मात करता येते, याचं उदाहरण घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील चि. दर्शन शंकर निले याने दाखवून दिलं आहे. वडिलांचं अकाली निधन, घरची हलाखीची परिस्थिती आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या अशा अडचणींमध्येही त्याने पालघर पोलीस भरतीत १३२ गुण मिळवत यश मिळवलं आहे. दर्शनचे वडील स्व. शंकर निले हे कपड्याचे छोटे व्यापारी व आईचा शिवणकाम चा व्यवसाय होता. कै.शंकर आप्पा नीले यांच्या व्यवसायावरच कुटुंब चालत होतं. मात्र, त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर मोठं संकट आलं.  आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, घराचा आधारच हरपला. अशा परिस्थितीत अनेकजण खचून जातात, पण दर्शनने धीर सोडला नाही. वडिलांचं “मुलगा पोलीस व्हावा” हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्याने केला आणि त्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत राहिला. पोलीस भरतीची तयारी करताना त्याने स्वतःला शिस्त लावली. पहाटे उठून धावणे, मैदानी सराव, शारीरिक चाचण्यांची तयारी आणि त्यानंतर अभ्यास असा...

हमालवाडी झाली पोरकी....भावपूर्ण श्रद्धांजली....

इमेज
  परळीतील ज्येष्ठ नेते,माजी नगरसेवक केशव बळवंत यांचे  निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) "हमालवाडी"चे सर्वेसर्वा, अनेक वर्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले, महादेव कोळी समाजाचे मराठवाडय़ातील जेष्ठ नेते, माजी नगरसेवक केशवभाऊ विश्वनाथराव बळवंत यांचे शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजण्याचे सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 79 वर्ष होते.        केशव भाऊ बळवंत हे गेल्या पन्नास वर्षांपासून शहरातील राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत. ते अनेकदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तर आता ते सांगतील तो नगरसेवक निवडून येत असे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने राजकारणापासुन अलिप्त झाले असले तरी समाजाच्या कामात कायम आघाडीवर राहिले आहेत. "हमालवाडी" हा भाग केशवभाऊ बळवंत यांचा "गड" म्हणून ओळखल्या जात होता. शनिवार दि. 11 एप्रिल रोजी रात्री 11.30 वागण्याचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार      कै. केशवभाऊ बळवंत यांच्या पार्थिवावर आज रविवा...
इमेज
अत्यंत सुंदर, सुरमयी प्रवास थांबला ! ना.पंकजा मुंडे यांनी आशा भोसले यांना वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई दि. १२ --- ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने अत्यंत सुंदर, सुरमयी आणि रोमांचक प्रवास आज थांबला अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ना. पंकजाताईंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आशाताईंच्या आठवणी जागवल्या. त्या म्हणाल्या,अत्यंत हरहुन्नरी कलाकार, आपल्या कलेमध्ये विविधता आणि सातत्याने नाविन्य जपून ठेवणाऱ्या, प्रत्येक सुरामध्ये एक ऊर्जा देणाऱ्या, अत्यंत आनंदी अशा व्यक्तिमत्वाच्या धनी, आमच्या आशाताई.. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.  त्यांची अजरामर गाणी, त्यांचा सूर त्यांनी दिलेल्या प्रत्येक मुलाखती या सदैव भावी पिढीला प्रभावित करतील. एक अत्यंत सुंदर, सुरमयी आणि रोमांचक प्रवास आज थांबला आहे. आशाताईंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली !! ••••
इमेज
  ठेकेदाराचा हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर; पाटोदा पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा          पाटोदा ते जामखेड रोडवर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून २५ वर्षीय शुभम प्रभाकर नेटके (रा. आसरडोह, ता. धारुर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.            धनगर जवळका येथे बी.आर.एन. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत पुलाचे काम सुरू आहे, मात्र तिथे कोणत्याही प्रकारचे सुरक्षा फलक, बॅरिकेटींग किंवा रिफ्लेक्टर लावलेले नव्हते. २३ मार्च रोजी पहाटे शुभम आपल्या दुचाकीवरून जात असताना अंधारात खड्डा न दिसल्याने तो थेट खड्ड्यात कोसळला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. कंपनीचे गुत्तेदार संजयकुमार गुप्ता आणि लवकुश चौधरी यांना धोक्याची कल्पना असूनही त्यांनी सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका ठेवत अक्षय नेटके यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. 
इमेज
अंबाजोगाईत भीषण अपघात: शिवाई बसच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच अंत.. अंबाजोगाई: तालुक्यातील धानोरा खुर्द येथील २० वर्षीय तरुण अथर्व महादेव ढगे याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.     धानोरा येथून अंबाजोगाईकडे येत असताना लोखंडी सावरगाव नजीक अथर्व आणि समोरून येणाऱ्या अंबाजोगाई - संभाजीनगर शिवाई बसची (क्रमांक एमएच ४९ बीझे ९५८१) जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की गंभीर दुखापतीमुळे अथर्वचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ऐन तारुण्यात अथर्वचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण धानोरा खुर्द परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
  संघर्षाचा वारसा आलेल्या किसान सभेचे सिरसाळ्यात जिल्हा अधिवेशन डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती परळी / प्रतिनिधी....      आस्मानी आणि सुलतानी संकटाविरुद्ध दोन हात करणाऱ्या कष्टकरी, ऊसतोड कामगार आणि जिद्दी शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या श्रमाला मोल मिळवून देणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेचे 24 वे जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी बुधवार दि 15 रोजी संपन्न होणार असून या अधिवेशनास डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांच्यासह अनेक लढवय्या शेतकरी नेत्यांची उपस्थिती असणार आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी सातत्याने सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मातीला संघर्षाचा मोठा वारसा आहे.क्रांतिसिंह नाना पाटील, कॉ.गंगाधरआप्पा बुरांडे, कॉ. बापूसाहेब आण्णा देशमुख, कॉ गुंडा आप्पा जिरगे , कॉ. हमीद हुसेन, कॉ. नानासाहेब पोकळे, कॉ. यशवंत माने, कॉ. निर्मळ, कॉ. सी. एम. शेख, कॉ. नारायण शेप कॉ मा.म.साखरे, कॉ.बाळनाथ शेळके यांसारख्या नेत्यांनी किसान सभेच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांना संघटित करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. तोच संघर्षाचा वारसा आज...
इमेज
परळीत भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू;  ट्रक चालकावर गुन्हा दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       परळी ते गंगाखेड रोडवरील उड्डाणपुल परिसरात शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सुधाकर सटाले (वय २९, रा. तडोळी, ता. परळी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी  माणिक रामकृष्ण सटाले यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास परळी ते गंगाखेड रोडवरील एकमिना चौक ते उड्डाणपुल दरम्यान हा अपघात घडला. आरोपी ट्रक चालक दाऊद मोहम्मद शेख (रा. मलीकपुरा, परळी) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH44 U 0619) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. या ट्रकने सचिन याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे सचिनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर  पोलिसांनीट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ...

चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड

इमेज
  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, आठ दशकांपासूनचा चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट