पोस्ट्स

एप्रिल १२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक लेख: ॲड. भानुदास शौचे,नाशिक

इमेज
  श्री भगवान परशुराम : ब्राह्म तेज व क्षात्र तेज यांचा अपूर्व संगम     श्री भगवान परशुरामांनी ब्राह्म तेजाचे, क्षात्र तेजाचे, ज्ञानाचे, वेदांचे संवर्धन संगोपन केले, तसेच ज्ञानाचे, वेदांचे संवर्धन - संगोपन करणार्‍या ऋषीमुनींचे ही संरक्षण केले. ब्राह्मण कुळात जन्मलेले श्री भगवान परशुराम की ज्यांचे मुखात चार वेद आहेत, पाठीवर बाणा बाणासह धनुष्य आहे, हातात परशू आहे म्हणजेच ज्यांचेत अद्वितीय असे ब्राह्म तेज आणि महापराक्रमी क्षात्र तेज आहे असे राम शाप देऊन किंवा बाण/परशू ने दुर्जनांचा नाश करतील.  श्री भगवान परशुराम हे सप्त चिरंजीव यांचे पैकी एक मानले जातात. भगवान विष्णू च्या नऊ अवतरांपैकी श्री भगवान परशुराम हा सहावा अवतार होय. एकोणिसाव्या त्रेतायुगात, महाभारतानुसार त्रेता आणि द्वापार युगाच्या संधिकालात वैशाख महिन्याच्या तृतीयेला म्हणजे अक्षय्य तृतीयेला सूर्यास्ताच्या संधिकाली महर्षी भृगू ऋषींच्या वंशात आदिती नक्षत्रावर जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. श्री भगवान परशुराम यांचे जन्म निमित्त वै. शु. तृतीयेला श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केल...

आयोजन..... मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
परळीत भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा; संत जगमित्र नागा मंदिर येथे पूजा व कीर्तन   परळी वैजनाथ (प्रतिनिधी):      येथील श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता हा मुख्य जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे अशी माहिती संत जगमित्र नागा मंदिर चे वंशपरंपरागत पुजारी उदय भैय्या औटी यांनी दिली आहे.         या कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळी भगवान परशुराम यांचा विधिवत अभिषेक करण्यात येईल. दुपारी १२ वाजता गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने उदगीर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज श्रीडोळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी या जन्मोत्सव सोहळ्यास आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'सर्व परशुराम भक्त मंडळ' यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
परळीत भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा; भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी):      परळी वैजनाथ येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातून भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, या सोहळ्यात  सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती चा वतीने करण्यात आले आहे.         भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार मानले जातात. त्यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी परळी शहरात उत्साहाचे वातावरण असते. यावर्षी देखील परंपरेनुसार शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचा प्रारंभ सायंकाळी ५ वाजता संत जगमित्रनागा मंदिर येथून होईल. तेथून ही यात्रा राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार, नांदूरवेस, सरकारवाडा या मुख्य मार्गावरून मार्गस्थ होईल. शोभायात्रेचा समारोप आंबेवेस येथील काळाराम मंदिर येथे होईल. या ठिकाणी भगवान परशुरामांची सामूहिक महाआरती करण्यात येईल.   ...

आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

इमेज
लग्नाचे आमिष दाखवून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या केज :- केज तालुक्यात विदर्भातील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत सात महिन्या पासून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एक कुटुंब हे मोल मजुरीसाठी केज तालुक्यातील एका गावात राहत आहे. त्याच गावातील एका तरुणाने त्या कुटुंबातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याशी लग्न करण्याचे अमिष दाखवू त्याच्यावर १ सप्टेंबर २०२५ ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत शेतात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून त्या नराधम तरुणाच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. २०९/२०२६ भा. न्या. सं. ६५(१), ३५२ यासह पोक्सोचे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत. _______________________________ आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या :- पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रक...

पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती,विमा कवच आणि निवृत्ती वेतन देण्याचाही प्रयत्न

इमेज
  जिल्हानिहाय परशुराम भवनची उभारणी: कॅ.आशीष दामले यांची माहिती छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी - राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवनची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये परशुराम भवनसाठी जागा ताब्यात घेतली असून, त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. वेदाध्यन, पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर पौरोहित्य करणाऱ्यांना विमा कवच आणि निवृत्ती वेतनही देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी महामंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज देणारी रमाबाई रानडे बचतगट अर्थसहाय्य योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी येथे दिली. अलिकडच्या काळात जे १७ ते १८ महामंडळे स्थापन झाली त्यातील तातडीने अध्यक्ष मिळालेले आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळालेले परशुराम महामंडळ एकमेव असल्याचा दावाही कॅ. दामले यांनी केला. मराठवाडा दौऱ्यावर आलेले कॅ. दामले यांचा शुक्रवारी सकाळी पिसादेवी येथे सकल ब्राह्मण वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आणि नंतर माध्यमा...
इमेज
  परतवाडा शोषण प्रकरणाचा जमाअत-ए-इस्लामी हिंद कडून निषेध न्याय आणि उत्तरदायित्वाची महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांची मागणी परळी वैजनाथ : प्रतिनिधी.... जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा (अचलपूर) येथील तरुणींशी संबंधित कथित लैंगिक शोषण आणि सायबर ब्लॅकमेल प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे परतवाडा (अचलपूर), अमरावती येथील तरुणींशी संबंधित कथित लैंगिक शोषण आणि सायबर ब्लॅकमेल प्रकरणाबाबत समोर आलेले तपशील अत्यंत गंभीर आहेत आणि जर हे आरोप सत्य ठरले, तर ते कायदा, नैतिकता आणि मानवी प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन ठरतील. अशा प्रकारच्या शोषण, अत्याचार किंवा दबावाचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांनी सांगितले की,तरुणींना जाळ्यात अडकवणे, त्यांच्या खाजगी सामग्रीचे चित्रीकरण करणे आणि त्याचा ब्लॅकमेलसाठी वापर करणे ही अत्यंत घृणास्पद कृती आहे, जी न्याय्य आणि नैतिक समाजाच्या मूलभूत तत्त्वांना हादरवणारी आहे. इस्लाम मान, सन्मान आणि गोपनीयतेच्या संरक्षणाला सर्वोच्च महत्त्व देतो आणि अशा प्रकारच्या कृत्यांना पूर्णपणे अस्व...
इमेज
  मिशन कर्मयोगी' मध्ये महाराष्ट्राचा डंका राष्ट्रीय स्तरावर 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' पुरस्काराने गौरव नवी दिल्ली, 17: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मिशन कर्मयोगी' उपक्रमांतर्गत  महाराष्ट्र राज्याने प्रशासकीय प्रशिक्षणात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. साधना सप्ताह २०२६ निमित्त आयोजित विशेष सोहळ्यात महाराष्ट्राला 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' (उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य) या बहुमानाने सन्मानित करण्यात आले.कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तथा कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते साधना सप्ताह 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मंत्रालय, विभाग आणि राज्यांचा सन्मान करण्यात आला. याच सोहळ्यात महाराष्ट्रातील 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी' (यशदा) या सं...

‘निरामय बीड अभियान’ वर सविस्तर चर्चा

इमेज
आरोग्य -‌ सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार - स्वानंद सोनार जिल्ह्यातील २5 स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठक ‘निरामय बीड अभियान’ वर सविस्तर चर्चा बीड , दि. ११७ एप्रिल : जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, रुग्णालये व स्वयंसेवी संघटनांनी एकत्रितपणे कार्य केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचू शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद अरुण सोनार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभाग्रहात आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील समन्वयासाठी आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मा.जिल्हाधिकारी विवेक जॉनसन , निवासी जिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी , डॉ. अजित विसपुते उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक, युवराज महाजन, संस्था समन्वयक,  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बीड येथील वैद्यकीय अधिकारी  डॉ. कागदे चैतन्य , राहुल चव्हाण व गणेश गिराम  जिल्हा समन्वयक आणि जिल्ह्यातील २५  स्वयंसेवी संस्था व प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थ...

परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन...

इमेज
लातूरमध्ये गृहउद्योग प्रदर्शनीचे परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'ब्रँडिंग' आवश्यक - नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी लातूर: प्रतिनिधी...        महिलांमध्ये उपजतच उत्तम व्यवस्थापन कौशल्य असते. त्यांच्या घरगुती उत्पादनांना जर योग्य बाजारपेठ आणि ब्रँडिंगची जोड मिळाली, तर त्या जागतिक स्तरावर आपले नाव कोरू शकतात. अशा प्रदर्शनांमुळे महिलांच्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने बळ मिळते असे प्रतिपादन परळी वैजनाथ नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.        परशुराम जन्मोत्सव समिती-२०२६ आणि बीबीएन महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने औसा रोडवरील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित 'गृहउद्योग प्रदर्शनी'च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. शुक्रवारी मोठ्या उत्साहात या प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले. सौ पद्मश्रीताई. धर्माधिकारी यांनी पुढे बोलतांना सांगितले की, केवळ चूल आणि मूल यात न अडकता महिलांनी आपल्या छंदाचे रूपांतर व्यवसायात के...

समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार

इमेज
अतिक्रमण हटाव मोहिम : परळीतील व्यापाऱ्यांचा बैठकीत सकारात्मक प्रतिसाद ! नगर परिषद प्रशासन आणि व्यापारी यांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार परळी वैजनाथ | प्रतिनिधी        परळी नगर परिषदेकडून शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर मोंढा मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.      अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढते, ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होते, अपघातांचा धोका वाढतो तसेच मान्सूनपूर्व नालेसफाईत अडथळे निर्माण होतात. याशिवाय शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मत सर्वच उपस्थितांनी मांडले.चर्चेदरम्यान वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका हा व्यापाऱ्यांनाच बसत असल्याचेही बैठकीत अधोरेखित झाले. ...

नुकसान भरपाईची मागणी ...

इमेज
  महावितरणचा हलगर्जीपणा भोवला; र्लोंबणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श; चालता ट्रक पेटला ; पशुखाद्य जळून खाक परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा:- तालुक्यातील सेलू येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महावितरणच्या लोंबणाऱ्या  विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ट्रकमधील संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून, पशुपालक शेतकरी विलास राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.            मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास राठोड हे आपल्या ट्रकमधून जनावरांसाठी कडबा घेऊन जात होते. सेलू परिसरातून जात असताना रस्त्यावरील महावितरणच्या विद्युत तारा खाली लोमकळत होत्या. या तारांचा स्पर्श ट्रकला झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या परळी परिसरात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उष्णतेमुळे ही आग वेगाने पसरली. सेलू येथील युवक नेते  बाळू फड प्रसंगावधान राखून परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला.औष्णिक क...
इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंकजा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन नाव उज्ज्वल करावे -नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'पंकजा फाउंडेशन'च्या वतीने गरजूवंत विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले.           मंगळवार, १४ एप्रिल रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हा बाबासाहेबांचा विचार कृतीत आणण्यासाठी फाउंडेशनने हा पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, रिपाई नेते सचिन कागदे, नगरसेवक वैजनाथ सोळंके, केशव नागरगोजे, सोपान ताटे, अश्विन मोगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ...

वाहतुकीची दररोज प्रचंड कोंडी....नागरिक हैराण

इमेज
  परळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मुख्य रस्त्यावरच विळखा- रहदारीचा रोज खोळंबा ; बसस्थानका समोरील 'त्या' अनाधिकृत थांब्यांमुळे नागरिक त्रस्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी):           येथील  बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्यांवर अक्षरशः विळखा घातला असून, बसस्थानकासमोरच असलेल्या अनधिकृत थांब्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.           परळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. एसटी महामंडळाच्या बसला आत शिरताना आणि बाहेर पडताना या खासगी गाड्यांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.अनेकदा यातून प्रवाशांसोबत, नागरिकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घड...

भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे

इमेज
  कै.शिवाजीराव खाडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त दोन दिवस कांदेवाडी येथे होणार हरिनामाचा गजर *श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे रविवार, १९ एप्रिल रात्री ९ ते ११ होणार किर्तन *भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सोमवार २० एप्रिल सकाळी ११ ते १ होणार किर्तन* *भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे* धारूर (प्रतिनिधी) :-  कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री गोरक्षनाथ आखाडा पीलखेडा सिंदखेडचे ह.भ.प.श्री. योगी दत्तनाथजी महाराज यांचे रविवार, १९ एप्रिल रात्री ९ ते ११  व भागवताचार्य ह.भ.प.श्री. माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे सोमवार २० एप्रिल सकाळी ११ ते १ यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा  धनंज...
इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय एकात्मतेचे शिल्पकार - रामेश्वर बचाटे पाटील   वडगाव स्टे : भारतातील विद्वान व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगभरात आहे आणि त्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते, भारतातील विविधता बघता या विविधतेत एकात्मता निर्माण करणे हे अवघड होते, भारतीय एकात्मतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व विविधतेला एकतेत आणले. असे मत रामेश्वर बचाटे पाटील यांनी व्यक्त केले.  सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टे. येथे भीम नगर भागात मागील चार वर्षांपासून विविध उपक्रमांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, यावर्षी 135 जयंती निमित्त पूर्ण आकृती पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच मान वंदना घेण्यात आली,  पंचशील धवजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना रामेश्वर बचाटे पाटील यांनी महामानवांनी जगातील संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी खूप सारे काम केलेले आहे, आणि त्यांच्या कष्टामधून पुढच्या पिढ्यांना चा...

नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

इमेज
परळी वैजनाथ मध्ये १४ वर्षांवरील मुलींसाठी मोफत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिम सुरू  नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी): भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरत आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV) लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२६ पासून परळी वैजनाथ येथे या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथील वैद्यकीय अधीक्षकांनी यासंदर्भात माहिती दिली. या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र ज्या अद्याप १५ वर्षांच्या झालेल्या नाहीत, अशा किशोरवयीन मुलींना या लसीचा एक डोस दिला जाणार आहे. हे लसीकरण परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण विभागात दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी पात्र मुलींनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, अ...

शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन..

इमेज
२४ पासून गुरुकुलात मुलांसाठी निवासी "मानवता संस्कार शिबिर"       परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.१७                    शहरी प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक व सामाजिक विकास व्हावा आणि त्यांच्या अंगी मानवतेचे संस्कार रुजावेत, या पवित्र उद्देशाने महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व येथील आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमामध्ये येत्या २४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान मुलांसाठी *"मानवता संस्कार व आर्य वीर प्रशिक्षण" शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून  आरोग्यसंपन्न, सक्षम , सभ्य, प्रामाणिक, नीतिसंपन्न, कर्तव्यदक्ष व संस्कारशील पिढीची निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे.        आठवडाभर चालणाऱ्या या निवासी संस्कार शिबिरात पहाटेपासून ते रात्रीपर्यंतच्या व्यस्त दिनचर्येत सकाळी व संध्याकाळी व्यायाम, योगासने, प्राणायाम, विविध खेळ यांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधला जाईल. तर सकाळी संध्या, अग्निह...
इमेज
  विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वे पोलीस जवानाची  गळफास घेऊन आत्महत्या परळी वैजनाथ:- परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका तरुण रेल्वे पोलीस जवानाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दिनांक 17 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.नितीन पंडित ढगे (रा. लोहारा, जि. धाराशिव) असे या मृत जवानाचे नाव आहे. आत्ता आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.     नितीन ढगे हे लोहारा (जि. धाराशिव) येथील रहिवासी होते आणि सध्या परळी वैजनाथ येथे लोहमार्ग पोलीस (GRP) दलात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये  ते नोकरीस लागले होते. त्यांनी परळीतील माधवबाग परिसरातील एका 'प्ले रूम'मध्ये (खेळायची खोली) गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.       नितीन यांचा विवाह अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता. ७ मे रोजी त्यांचा विवाह संपन्न होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण ...
इमेज
  परळीकरांना मिळणार अस्सल दाक्षिणात्य चव; ‘स्वामीज् सांबर’चा रविवारी होणार शुभारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळीतील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात 'अस्सल साऊथ इंडियन' चवीचा नजराणा घेऊन 'स्वामीज् सांबर' हे नवीन उपहारगृह सज्ज झाले आहे. या उपहारगृहाचा शुभारंभ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, रविवारी १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपन्न होणार आहे. या उपहारगृहाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. भालचंद्र वाचनालय कॉम्प्लेक्स, फाऊंडेशन शाळेच्या बाजूला, परळी वैजनाथ या मध्यवर्ती ठिकाणी हे हॉटेल सुरू होत आहे.या उद्घाटन समारंभाला परळीकरांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकांत घनशामजी तोतला आणि नरेश ज्ञानेश्वर (माऊली) चिकणे यांनी केले आहे.

आजपासून डेमो क्लासेसचा शुभारंभ......

इमेज
‘कोटा पॅटर्न’ चे सुप्रसिद्ध ‘मोशन एज्युकेशन’ आता परळीत उपलब्ध परळी वैजनाथ (प्रतिनिधी): वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देशात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथील प्रसिद्ध ‘मोशन एज्युकेशन’ आता परळीकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. यामुळे आता इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्सेससाठी घराबाहेर न जाता शहरातच दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची भक्कम पायाभरणी करण्यासाठी ‘मोशन’ने परळीत पाऊल ठेवले आहे.        इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यावर येथे भर दिला जाणार आहे. जेणेकरून भविष्यातील NEET, JEE, CA आणि NDA यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक मानसिकता आणि अभ्यासाची शिस्त निर्माण होईल. कोटाच्या अनुभवी फॅकल्टीचे मार्गदर्शन या कोचिंग सेंटरमध्ये मिळणार आहे. केवळ बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास न घेता, विद्यार्थ्यांची लॉजिकल थिंकिंग (तार्किक विचार), समस...

मुंबईत घेणार आढावा बैठक

इमेज
थर्ड पार्टी मॉनिटरिंगच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करणार – ना.पंकजा मुंडे विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती ; मुंबईत घेणार आढावा बैठक चंद्रपूर दि. १६ -- जिल्ह्यातील प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेसह विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आज चंद्रपूर जिल्ह्यात सविस्तर प्रदूषण पाहणी दौरा केला. या दौऱ्यामुळे चंद्रपूरच्या प्रदूषण प्रश्नावर राज्य सरकारची ठोस भूमिका आणि पुढील कारवाईची दिशा स्पष्ट झाली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आ मुनगंटीवार यांच्या सह ऊर्जानगर वसाहत परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड आणि चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र  यांच्या कोळसा हाताळणी प्रकल्प  व कोळसा बंकरमुळे निर्माण होणारे प्रदूषण प्रत्यक्ष पाहिले. उघड्यावरून वाहून नेला जाणारा कोळसा, हवेत उडणारी राख व धूर यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निरीक्षण केल...

सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

इमेज
कु.आर्या भातंब्रेकर हिचे दहावीत ९१ टक्के गुणांसह घवघवीत यश सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घोषित केलेल्या दहावीच्या निकालानुसार छत्रपती संभाजीनगर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु.आर्या अनिरुद्ध भातंब्रेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. आर्याच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.         कु.आर्या ही निवृत्त गटशिक्षणाधिकारी कै.अशोकराव भातंब्रेकर  यांची नात असून, तिला सुरुवाती पासूनच अभ्यासाची गोडी आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिने नव्वदीचा टप्पा पार केला आहे. आर्याच्या या यशाबद्दल  कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.आर्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आणि शिक्षकांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक तसेच नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पारंपारिक वेशभूषा अन् ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत

इमेज
भर उन्हात 42 डिग्री तापमानात ना. पंकजाताई मुंडेंचा चंद्रपुरात झंझावात प्रदूषणमुक्त चंद्रपुरसाठी कटीबध्द; नागरिकांना विश्वास प्रदूषणाचे निकष न पाळणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाईचे दिले आदेश चंद्रपूर दि. १६ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भर उन्हात ४२ डिग्री तापमानात आज त्यांनी चंद्रपूरमधील प्रदूषणाची पाहणी केली. प्रदूषणाचे निकष न पाळणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना देत असतानाच प्रदूषणमुक्त चंद्रपुरसाठी आपण कटीबध्द असल्याचा विश्वास नागरिकांना दिला.       ना. पंकजाताई मुंडे यांनी आज चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन आणि दुर्गापूर परिसरातील प्रदूषणाची प्रत्यक्ष ग्राउंड झिरो वर  जाऊन  पाहणी केली. माजी मंत्री तथा भाजपा नेते आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी त्यांच्यासोबत होते. हवेतील उडणारी राख आणि झरपट नदीत मिसळणारे दूषित पाणी याची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यवाहीबाबत प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी कडक सूचना दिल्या.चंद्रपूरकरांना प्रदूषणमुक्त वातावरण मि...

डिवायएफआय चे बेमुदत ठिय्या आंदोलन

इमेज
  रस्ता दुरुस्तीप्रश्नी रखरखत्या उन्हात युवकांचे आंदोलन डिवायएफआय चे बेमुदत ठिय्या आंदोलन  परळी / प्रतिनिधी...      अंबाजोगाई - मोहा - सिरसाळा व परळी - नागापूर - बोधेगाव - मोहा - सर्फराजपूर या दोन रस्त्यांचे तात्काळ अद्यवतीकरण करा या मागणीसाठी भारताच्या लोकशाहीवादी युवक संघटनेने रखरखत्या उन्हात म्हतारगाव फाटा कान्नापूर या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून वारंवार निवेदने देऊन ही काम होत नसल्याने परिसरातील युवकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे पाऊल उचलले आहे. परळी तालुक्यातील मोहा गावाला अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही तालुक्याला जोडणा-या राज्य महामार्गाची अतिवृष्टीमुळे चाळणी होऊन या मार्गावरील पूल देखील खचले गेले आहेत. आरोग्य, शिक्षण, व्यापार आदी विविध कारणाने या मार्गावरुन हजारो नागरिकांची वर्दळ असताना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागत असून मागील 3 वर्षापासून अनेक वेळा प्रयत्न करून ही आश्वासन शिवाय काहीच पदरी पडत नसल्याने मोहा गाव परिसरातील शेकडो विद्यार्थी, युवकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे दि 20 जानेवारी रोजी ठिय्या करत तीव्र निदर्शन...

आता चक्क बँकांनाच "नोटांची तंगी"....!!!!

इमेज
बीड जिल्ह्यात रोख रकमेचा तुटवडा ; बँकांबरोबरच ग्राहकही हैराण; उपाययोजनांची गरज बीड: ऑनलाईन व्यवहार वाढत असले तरी अनेकदा रोख रकमेची गरज पडते. त्यातही मोठी रक्कम हवी असेल तर किमान पाचशेच्या नोटा हव्या असतात, परंतु गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. यातही पाचशे आणि दोनशेच्या नोटाच बँकांमध्ये उपलब्ध नसल्याने बँकेचे अधिकारी आणि ग्राहकही हैराण झाले आहेत.या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी आता केली जात आहे.    बीड जिल्ह्यात नागपूर येथील रिझर्व बँकेच्या कार्यालयाकडून रोख रकम पुरवली जाते. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून त्या ठिकाणाहून रोख रकम मिळण्यात अडचणी येत आहेत. परळीत एसबीआयच्या शाखेतून बँकांना रोखा रक्कम दिली जाते, परंतु त्या ठिकाणीच कॅश उपलब्ध नसल्याने अन्य बँकांना अडचण जाणवत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर सर्व शहरांमध्ये देखील आहे.यामुळे मोठ्या स्वरुपात रोख रकमेची मागणी केल्यास बँक व्यवस्थापनाकडून संबंधीत ग्राहकास ऑनलाईन व्यवहाराविषयी विचारणा केली जात आहे.अथवा एकूण रकमेच्या काही मयदित रोख रकम दिली जात आहे. अनेक बँका तर त्यांच्या इतर ठिका...
इमेज
  परळीत सुर्य कोपला! पुढील १५ दिवस पारा ४४ अंशांवर; प्रशासनाकडून 'अलर्ट' जारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरात पुढील १५ दिवसांत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्णतेचे संभाव्य परिणाम: १. आरोग्यावर परिणाम: अतिउष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि त्वचेचे विकार होण्याचा धोका वाढतो. २. पाणीटंचाई: बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीसाठ्यात घट होऊन पाणीटंचाई जाणवू शकते. ३. शेतीवर परिणाम: कडाक्याच्या उन्हामुळे पिकांना जादा पाण्याची गरज भासेल आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नागरिकांसाठी उपाययोजना आणि सल्ले: भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही नियमितपणे पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, आणि लस्सी यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या ...

नारी शक्ती : मूलभूत सन्मानापासून स्वतःचे अवकाश

इमेज
नारी शक्ती : मूलभूत सन्मानापासून स्वतःचे अवकाश "स्त्रियांना फक्त गृहिणी म्हणून पाहण्याचे दिवस गेले; आता त्यांना राष्ट्रनिर्माते म्हणून पाहण्याची गरज आहे." : पंतप्रधान  नरेंद्र मोदी        भारतातील एखाद्या गावातील तिशीतली स्त्री डोळ्यासमोर आणा. काही वर्षांपूर्वी ती पहाटे अंधारात, भीतीच्या छायेत घराबाहेर जाऊन नैसर्गिक विधी आटोपत असे. घरातील सर्वांसाठी पाणी दूरवरून आणणे, लाकडाच्या धुरात स्वयंपाक करणे, स्वतःच्या नावावर घर नसणे, बँक खाते नसणे—अशा अनेक मर्यादांमध्ये तिचे आयुष्य अडकलेले होते. पण आज ही परिस्थिती बदलली आहे. या परिवर्तनाला नाव आहे—“नारी शक्ती”. गेल्या काही वर्षांत महिलांच्या जीवनातील प्रत्येक पैलू एकमेकांशी जोडून बदल घडविण्याचा प्रयत्न झाला आहे. सन्मानाला प्राधान्य : महिलांच्या सन्मानाची सुरुवात मूलभूत गरजांपासून झाली. स्वच्छ भारत अभियानातून कोट्यवधी शौचालयांची निर्मिती झाली आणि ग्रामीण भारत खुले शौचालयमुक्त झाला. यामुळे महिलांची सुरक्षितता वाढली. जल जीवन मिशनमुळे घराघरात नळजोडणी झाली आणि पाण्यासाठी होणारी दररोजची कसरत कमी झाली. उज्ज्वला योजनेतून महिलांच...
इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश परळी  (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दहावीतील ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. परळी तालुक्यातून सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत यशराज बेंबलगे(९८%) या विद्यार्थ्याने प्रथम येऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदरील परीक्षेत शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळविले आहेत. यामध्ये यशराज बेंबलगे(९८%), रुद्राक्ष गुट्टे(९६%), वैष्णवी जाधव(९६%), तेजस्विनी गुट्टे(९५.६०%), श्रेयश बळवंत(९५.२०%),तन्मय बेंबलगे(९३.८०%), अमरनाथ कराड(९३.६०%), प्रथमेश लहाने(९२.८०%), अनुष्का नागरगोजे(९२.४०%), कपिल सावंत (९२.२०%), सार्थक केंद्रे (९१.८०%), वैष्णवी मुंडे(९१.४०%), अभिलाषा दहिवाळ (९१.२०%), नंदिनी चाटे (९०.६०%), आकांक्षा गुट्टे (९०.२०%)यांचा समावेश आहे. तसेच ८०% ते ९०% यादरम्यान२७ व ७०%  ते ८०% यादरम्या...