पोस्ट्स

MB NEWS-अज्ञात कारण: 30शेळ्या दगावल्या तर 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध

इमेज
  अज्ञात कारण: 30शेळ्या दगावल्या तर 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अज्ञात कारणाने आतापर्यंत 30शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी  उघडकीस आली आहे. अचानक झालेल्या या घटनेने व कारण अज्ञात असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.       घाटनांदूर येथे रस्त्याच्या कडेला या शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. या व्यतिरिक्त अन्य 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध अवस्थेत असून त्या देखील दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासर्व शेळ्या शंकर दगडू वैद्य यांच्या मालकीच्या असून या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या शेळ्या कशामुळे दगावल्या यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्याने परिसरातील शेतकऱ्यात दहशत पसरली आहे.

MB NEWS- डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

इमेज
 डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजाराम मुंडे  वतीने सत्कार करण्यात आला.                शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना सामाजिक, आरोग्य, दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल डॉ. संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजाराम मुंडे वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ह भ प गोविंद महाराज केंद्रे व  इतर उपस्थितीत होते.

MB NEWS- *एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर*

इमेज
 एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर *परळी/प्रतिनिधी* शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर मराठी माणसांच्या भल्याचा विचार करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यासोबत देशभरात पोहचविण्याचे काम करण्यात आले असून एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच केली आहे. येणारा काळ त्यांना या कृतीचा पश्चाताप करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने शिवसेना नावासोबतच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले असून शिवसेनेचा विचार व प्रभाव इतिहास जमा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीमुळे घडला आहे. ज्या पक्षात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या पक्षाने आपल्याला पद आणि प्रतिष्ठा दिली त्या पक्षाला मुठमाती देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप अभयकुमार ठक्कर यांनी केला आहे. वास्तविक पाहता शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून राज्यभरात रक्त वाहिन्यांसारखे शिवसेनेचे जाळे पसरले आहे. तुम्ही मनातून...

MB NEWS- *जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवानगडावर नतमस्तक...*

इमेज
  जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवानगडावर नतमस्तक... अनेक दिवसांची इच्छा धनंजय मुंडेंमुळे आज पूर्ण झाली, मन प्रसन्न झाले - जयंत पाटील महंत नामदेव शास्त्रींचेही घेतले आशीर्वाद पाथर्डी (दि. 09) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील तसेच माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज श्री क्षेत्र भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.   गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शनही घेतले. मागील अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र भगवानगड येथे येऊन दर्शन घेण्याची इच्छा आज आमचे सहकारी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली;असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.दरम्यान उभय नेत्यांनी गडाचे द्वितीय महंत ह.भ.प. भीमसिंह बाबांच्याही समधीचे दर्शन घेतले. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी गडाच्या वतीने स्वागत करून आशीर्वाद दिले. तसेच संत भगवानबाबा यांचे वस्तू संग्रहालय, गडावरील ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था व गडावर सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.  यावेळी आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब काका आजबे, युवा आघाडीचे महेबूब शेख, सती...

MB NEWS- *सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या बॅचचे स्नेहमिलन ; तब्बल 30 वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र*

इमेज
 सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या बॅचचे स्नेहमिलन ; तब्बल 30 वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मैत्रीची ही अशी नाती हा उजाळा त्यावरती, सुर्य-चंद्र ही बघुनी प्रकाश टाकतो या मैत्रीचा सुवास दरवळण्यासाठी  आपण सरस्वती विद्यालयाचे वर्गमित्र 30 वर्षांनंतर पुन्हा भेट झाली.परळीत स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.         सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या 10 वीच्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन दि.9 ऑक्टोबर 2022 रोजी गंगाखेड रोड, मकरंद नरवणे यांच्या शेतात (महादेव मंदिर) येथे उत्साहात दिवसभर नव्या जुन्या विद्याल्यीन जिवनातील गोष्टींना उजाळा देत संपन्न झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्र यांनी अथक परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वी केला. या वेळी उपस्थितीत सरस्वती विद्यालयातील 1991-92 बॅचचे 10 वी विभागातील वर्गमित्र  बहुसंख्येने उपस्थित होते.

MB NEWS-त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार

इमेज
  त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार परळी वैजनाथ /प्रतिनिधी    स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुरा राज्याने पहिला क्रमांक पटकावला त्यानिमित्त दिल्ली येथे आयोजित समारंभात महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री.मनोजकुमार देब यांच्यासह प्रभू वैद्यनाथाच्या परळी तालुक्यातील सुपुत्र सध्या त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिवपदी कार्यरत असलेले श्री.किरण गित्ते[IAS]यांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या निवास स्थानी श्री.किरण गित्ते यांचा सौंदळे परीवार तसेच श्री.संदीपशेठ टाक,श्री.बालाजी गायकवाड,श्री.राजेश ताटिपामल व मित्र परीवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार

इमेज
  दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार लवकरच देशभरातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करणार आहे. सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा १२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार १७ आणि १८ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उशीर का होतोय? योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२व्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, पी...