MB NEWS-अज्ञात कारण: 30शेळ्या दगावल्या तर 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध

 अज्ञात कारण: 30शेळ्या दगावल्या तर 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध










अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अज्ञात कारणाने आतापर्यंत 30शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी  उघडकीस आली आहे. अचानक झालेल्या या घटनेने व कारण अज्ञात असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

      घाटनांदूर येथे रस्त्याच्या कडेला या शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. या व्यतिरिक्त अन्य 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध अवस्थेत असून त्या देखील दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.यासर्व शेळ्या शंकर दगडू वैद्य यांच्या मालकीच्या असून या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या शेळ्या कशामुळे दगावल्या यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्याने परिसरातील शेतकऱ्यात दहशत पसरली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !