MB NEWS- *एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर*

 एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर




*परळी/प्रतिनिधी*

शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर मराठी माणसांच्या भल्याचा विचार करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यासोबत देशभरात पोहचविण्याचे काम करण्यात आले असून एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच केली आहे. येणारा काळ त्यांना या कृतीचा पश्चाताप करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने शिवसेना नावासोबतच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले असून शिवसेनेचा विचार व प्रभाव इतिहास जमा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीमुळे घडला आहे. ज्या पक्षात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या पक्षाने आपल्याला पद आणि प्रतिष्ठा दिली त्या पक्षाला मुठमाती देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप अभयकुमार ठक्कर यांनी केला आहे. वास्तविक पाहता शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून राज्यभरात रक्त वाहिन्यांसारखे शिवसेनेचे जाळे पसरले आहे. तुम्ही मनातून शिवसेनेतून बाहेर पडला असलात तरी लाखो नागरिक आणि शिवसैनिकांच्या मनात अजूनही शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव कायमच राहील असे सांगत तुमच्या कृतीचा हिशोब येणारा काळ करेल तेंव्हा तुम्ही सैरभैर झाला असेल असा टोलाही अभयकुमार ठक्कर यांनी लगावला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार