मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS- *एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर*

 एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर




*परळी/प्रतिनिधी*

शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर मराठी माणसांच्या भल्याचा विचार करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यासोबत देशभरात पोहचविण्याचे काम करण्यात आले असून एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच केली आहे. येणारा काळ त्यांना या कृतीचा पश्चाताप करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने शिवसेना नावासोबतच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले असून शिवसेनेचा विचार व प्रभाव इतिहास जमा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीमुळे घडला आहे. ज्या पक्षात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या पक्षाने आपल्याला पद आणि प्रतिष्ठा दिली त्या पक्षाला मुठमाती देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप अभयकुमार ठक्कर यांनी केला आहे. वास्तविक पाहता शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून राज्यभरात रक्त वाहिन्यांसारखे शिवसेनेचे जाळे पसरले आहे. तुम्ही मनातून शिवसेनेतून बाहेर पडला असलात तरी लाखो नागरिक आणि शिवसैनिकांच्या मनात अजूनही शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव कायमच राहील असे सांगत तुमच्या कृतीचा हिशोब येणारा काळ करेल तेंव्हा तुम्ही सैरभैर झाला असेल असा टोलाही अभयकुमार ठक्कर यांनी लगावला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....