पोस्ट्स

शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील - कृषिमंत्री

इमेज
● कृषी प्रश्नावर किसान सभा व कृषी मंत्री यांच्यात सखोल चर्चा शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील - कृषिमंत्री परळी / प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून त्यांना तातडीने दिलासा देण्यासंदर्भात किसान सभेच्या शिष्ट मंडळाने राज्याचे कृषी मंत्री यांची भेट घेत विविध मागण्यांसाठी सखोल चर्चा केली यावेळी कृषिमंत्री यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून लवकरच प्रश्न निकाली काढू असे आश्वासित केले. अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आपणास निवेदन करण्यात येते की, सन 2020 च्या पिक विमा पासून ते मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापर्यंत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यात भर म्हणून की काय यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पुरता हातचा गेलेला आहे तर रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती लागेल याची सूतराम शक्यता नाही. पावसा अभावी जिल्ह्यातील पीक परिस्थितीच नाही तर एकंदर पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंत सर्वच स्थिती बिकट आहे. उत्तरोत्तर परिस्थिती आणखी दाहक होत जाणार आहे. म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशा स्थित...

राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश, पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम

इमेज
व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्राची कोअर टीम जाहीर ! परळीला बहुमान: सुकेशनी नाईकवाडे यांचा समावेश राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश, पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात आघाडीची पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या महाराष्ट्रातील कोअर टीमची घोषणा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केली आहे. या टीममध्ये राज्यातील सर्वच विभागांमधील नामवंत पत्रकारांचा समावेश केला आहे. ही टीम राज्यात अनेक उपक्रम, कृतिशील कार्यक्रम आणि संघटनेतील एकूण रूपरेषा ठरवण्यासाठी कार्यरत असणार आहे. या कोअर टीमचे प्रमुख अनिल म्हस्के आणि बालाजी मारगुडे असतील. त्यांनी घोषित केलेले उर्वरित लीड करणारे मुख्य पदाधिकारी, प्रमुख याप्रमाणे असतील. मुंबईमधून विलास बर्ड, फराह खान, शैलेजा जोगल, सुरेश उमके हे असतील. पुणे विभागातून राजश्री आगाम, ज्ञानेश्वर चौतमल जयपाल गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड येथून प्रवीण कोळआपटे, ठाणे येथून अरुण ठोंबरे, सचिन मोहिते (सांगली), यांचा समावेश आहे. आजीत कुंकूलोळ (सोलापूर) यांच्या नावांची घोषणा केली आहे. मराठवाडयातून विजय चोरडिया (औरं...

परळी अंनिसच्या विकास वाघमारे यांचा क्रांतिकारी उपक्रम

इमेज
  स्मशानभूमीत झाड लावून आणि नाश्ता करून रात्री साजरा करण्यात आला वाढदिवस परळी अंनिसच्या विकास वाघमारे यांचा क्रांतिकारी उपक्रम परळी / प्रतिनिधी   माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाचे भूत प्रेतामध्ये रूपांतर होते, स्मशानभूमीत रात्री जाणे धोक्याचे असते अशा प्रकारच्या अंधश्रद्धा संपवण्यासाठी चक्क स्मशानभूमीतच रात्री वडाचे झाड लावून आणि सामुदायिक नाश्ता करून परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव व युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा अनोखा क्रांतिकारी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे विशेष उपस्थिती होती. या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.    परळी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव व युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा वाढदिवस काल रात्री 10  वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे वैशिष्ट म्हणजे रात्री घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजात वैज्ञानिक जनजागृती निर्माण व्हावी, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, प्रेतात्मा, भूत प्रेत याबद्दलची भीती नष्ट व्हावी, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह न...

धनंजय मुंडेंनी काकडहिरा येथे जाऊन तावरे कुटुंबियांचे केले सांत्वन

इमेज
  देशसेवेत प्राणार्पण केलेले शहीद जवान पांडुरंग तावरे अमर झाले - धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी काकडहिरा येथे जाऊन तावरे कुटुंबियांचे केले सांत्वन बीड (दि.09) - देशसेवेत कर्तव्यावर असताना अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत प्राणार्पण केलेले शहीद जवान स्व.पांडुरंग तावरे अमर झाले आहेत. त्यांचे बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल, असे वक्तव्य पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  सिक्कीम येथे देशसेवेत कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद स्व.पांडुरंग तावरे यांच्या कुटुंबियांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज काकडहिरा येथे भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या सुपुत्राने आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचावेत यादृष्टीने मदत करताना आपले प्राणार्पण केले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी स्व.पांडुरंग अमर असल्याची भावना व्यक्त केली.  सोमवारी सकाळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांसमवेत बीड जिल्ह्यातील विविध विषयी महत्वाची बैठक आयोजित असल्याने रविवारी रात्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काकडहिरा येथे भेट देऊन तावरे कुटुंबियांचे सांत्वन केले. आपण तावरे कुटुंब...

कार्याचा गौरव.........

इमेज
  रक्तदान शिबीरांचे सातत्यपूर्ण आयोजन: बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाचा डाॅ.भालचंद्र रक्तपेढी लातूर च्या वतीने गौरव परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            रक्तदान शिबीरांचे सातत्यपूर्ण आयोजन केल्याबद्दल व या उदात्त कार्याचे ऋणनिर्देश व्यक्त करत बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाचा डाॅ.भालचंद्र रक्तपेढी लातूर च्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला आहे.              डाॅ.भालचंद्र रक्तपेढी,लातूर द्वारा "रक्तदान शिबीर आयोजक" यांचा कृतज्ञता सोहळा  लातूर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने ॲड.प्रताप धर्माधिकारी यांनी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला.गेल्या १५ वर्षांपासून बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने परळीत  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.या शिबिरात दरवर्षीच विक्रमी संख्येत  रक्तदान होते. अनेक रुग्णांना यामाध्यमातून जीवनदान प्राप्त झालेले आहे. या आयोजनाबद्दल हा गौरव करण्यात ...

सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे !

इमेज
  आगळंवेगळं: अक्षदा-पानाच्या विड्यासह मुळपत्रिका: सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे ! परळी वैजनाथ(प्रतिनिधी):- सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असुन विविध माध्यमातून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने सभेचे निमंत्रण देणारी 'मुळपत्रिका' सध्या मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होत आहे.       सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा ऐतिहासिक होणार असुन इतिहासात नोंद होणा-या या सभेचे साक्षीदार होऊन या सभेस सहकुटुंब हजेरी लावावी असे आवाहन गावागावांत विविध माध्यमातून केले जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागिल अनेक वर्षांपासून समाज बांधव विविध मार्गाने अंदोलने संपूर्ण राज्यात करत आहे. आता कुठेतरी मनोज जरांगे यांनी राज्य सरकाराला धारेवर धरत आपल्या अंदोलनाचा लढा सराटी अं...

सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा

इमेज
  सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा कर्तव्यावर असलेले जवान पांडुरंग वामन तावरे या पुरामध्ये वाहून गेले. यामध्ये ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिस्ता नदीला मोठा पूर: सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे उभी असलेली सैन्य दलाची वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे (वय 36) हे बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह आढळून आला. Click - ● *आगळंवेगळं:*■ *_अक्षदा-पानाच्या विड्यासह मुळपत्रिका_* _सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने ये...