ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती..

इमेज
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती बीड दि. २० --- जिल्हयात काल आणि परवा गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली. बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यालाही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचे तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली पिके भिजल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश देऊन शासनाच्या संबंधित विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ...

विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा

19 कोटी रुपयांचे  टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू 




विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा 

 परळी (प्रतिनिधी)...

    परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना  डी.पी.डी.सी.2025-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे यावे व संबंधित एजन्सी ला ब्लॅकलिस्ट करावे या मागणीसाठी  नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले.या उपोषणाला विविध पक्ष व संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला.

        श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत .शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. तरीही  संबंधित एजन्सीला १९ कोटी रुपयांच्या  कामांचे टेंडर देण्यात आले. श्रीनाथ इंजिनियर लातूर यांचा यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत कामातील परळीकरांना आलेला वाईट अनुभव लक्षात घेता सध्या काढण्यात आलेले 19 कोटी रुपयांची कामे टेंडर रद्द करून  व  चांगल्या दर्जाची कामे व्हावेत याकरिता परत टेंडर काढावे अशी मागणी करण्यात आली आहे.उपोषणाला पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रानबा गायकवा, धीरज जंगले, शहराध्यक्ष शेख मुकरम, उपाध्यक्ष बाबा शेख  उपोषणाला बसले आहेत.

   या उपोषणाला शिवसेना नेते तथा नगरसेवक व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख वैजनाथ माने, कामगार नेते गौतम आगळे, अश्विन मोगरकर, नगरसेवक नितीन बागवाले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, प्रसेनजित रोडे, राजेश सरवदे, कांग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रसूल खान, सामाजिक कार्यकर्ते राहुल घोबाळे,प्रा.विलास रोडे,  संपादक ज्ञानोबा सुरवसे, इंजिनियर भगवान साकसमुद्रे,  भगिरथ बददर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, माजी  नगरसेवक केशव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश फड, कामगार संघटनेचे शेख जमीर याबरोबरच संपादक संपादक बालासाहेब कडबाने, गणेश आदोडे, संपादक रामप्रसाद गरड, संपादक शिवशंकर झाडे, संपादक मोहन व्हावळे, पत्रकार धनंजय आढाव, संपादक कैलास डुमणे,प्रा प्रविण  फुटके,संजीव रॉय, महादेव शिंदे,  माणिक कोकाटे,  सुमीत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!